शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कांदा ७० रुपये किलो, सीताफळाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:52 IST

किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.

ठळक मुद्दे कांदा ७० रुपये किलो, सीताफळाची आवक वाढली भाजीपाला स्थिर, पण कडधान्य तेजीत

कोल्हापूर : परतीच्या पावसाने नवीन कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याने कांद्याने कमालीची उसळी खाल्ली आहे. किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.गेले वर्षभर कांदा २० ते २५ रुपये किलो राहिला. मध्यंतरी कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली होती. गेले पंधरा-वीस दिवस परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली असून, कोल्हापूर बाजार समितीत ५४७० पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे दराने उसळी खाल्ली असून, घाऊक बाजारात १५ ते ५५ रुपयांपर्यंत कांद्याचा दर आहे. पण किरकोळ बाजारात ४० ते ७० रुपये दर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात सरासरी ३० रुपये किलोचा दर होता. त्यामध्ये दुपटीने वाढ झाली असली तरी कांदाही ग्राहकांना दुय्यम प्रतीचा घ्यावा लागत आहे. बटाट्याचा दर प्रतिकिलो २५ रुपयांवर स्थिर असला तरी लसणाने मात्र भरारी घेतली आहे. घाऊक बाजारात ९० ते १८० रुपये किलोपर्यंत लसणाचा दर पोहोचला आहे.पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. भाजीपाला खराब झाला असला तरी आवक बऱ्यापैकी आहे. त्यामुळे दरात फारशी चढउतार दिसत नाही. वांगी ६० रुपये, टोमॅटो ३०, तर ढब्बू ४० रुपये किलो आहे. गवार, भेंडी, कारली, दोडक्याच्या दरात फारसा फरक दिसत नाही. फ्लॉवर व कोबीही ग्राहकांच्या आवाक्यात आहे. मेथीचे दरही वाढले असून, २० रुपये पेंढी आहे.फळमार्केटमध्ये सध्या सीताफळाची आवक वाढली आहे. दरातही घसरण झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलोपर्यंत दर आहे. सफरचंदबरोबर संत्री व मोसंबीची आवक चांगली आहे. दिवाळीनंतर वास्तविक कडधान्य मार्केट स्थिर राहणे अपेक्षित होते; पण मूग, मटकी, चवळी, काळा वाटाणा व पांढरा वाटाणाच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे.

नवीन ज्वारी बाजारात आली असली तरी तीही दुय्यम प्रतीची आहे. एरव्ही २० रुपये असणारी ज्वारी ३० रुपये किलो आहे. सरकी तेल, तूरडाळ व हरभरा डाळीचे दर तुलनेत स्थिर राहिले असून, साखरेचा दर ४० रुपयांवर कायम राहिला आहे.कोथिंबीरची पेंढी ७० रुपये!पावसामुळे कोथिंबीरचे नुकसान झाले असून, तिच्या आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे एकदम उसळी घेतली असून किरकोळ बाजारात ७० रुपये पेंढीचा दर झाला आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर