शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या

By admin | Updated: September 23, 2016 00:36 IST

जतमध्ये घेतला गळफास : आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली, मृत उटगी येथील

जत : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण द्यावे’, असे लिहिले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.उटगी येथे बाळासाहेब चव्हाण व त्यांचा लहान भाऊ दिलीप (३५) यांची वडिलोपार्जित १५ एकर जिरायत शेतजमीन आहे. बाळासाहेब यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले होते. पत्नी वैशाली, आई सुसाबाई, दोन मुले राघवेंद्र (८ वर्षे) व लक्ष्मण (१२) यांच्यासोबत ते भावापासून विभक्त राहत होते. त्यांच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. उटगीपासून दीड किलोमीटरवर त्यांची शेतजमीन आहे. तीन दिवसांपूर्वी, नातेवाइकांना भेटायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे त्यांची बहीण आहे. बहिणीजवळ त्यांनी एक दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आणखी काही नातेवाइकांना भेटण्यासाठी ते गेले होते. बुधवारी सायंकाळी, उटगीला जात असल्याचे सांगून ते नातेवाइकांच्या घरातून बाहेर पडले होते. रात्री ते जतला आले. त्यानंतर जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी जतमधील काही लोक मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये चव्हाण गळफासाने लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लोकांनी जत पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून याची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चव्हाण यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. चव्हाण यांच्या पिशवीतील साहित्यामध्ये त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली.या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आक्रोश करीत आले. जत आणि वळसंगमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चव्हाण कुटुंबप्रमुख होते, पण त्यांनीच आत्महत्या केल्याने या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन तपासणी करुन दुपारी चव्हाण यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मच्छिंद्र बाबर यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (वार्ताहर)आरक्षण द्यावेचव्हाण यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात चिठ्ठी लिहिली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, पत्नी व मुलांचा व्यवस्थित सांभाळ करावा’, असा मजकूर चिठ्ठीत आहे. चव्हाण यांचा मुलगा राघवेंद्र पाचवीत, तर लक्ष्मण आठवीत शिकत आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. रात्री उशिरा उटगी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पहिलीच घटना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. गेल्या पंधरवड्यापासून तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढले जात आहेत. सोलापुरात बुधवारीच मोर्चा काढला होता. चव्हाण बुधवारी सोलापुरातच होते, अशी माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे. सांगलीत २७ सप्टेंबरला मोर्चा निघणार आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी केलेली आत्महत्या, ही राज्यातील पहिलीच घटना आहे.