शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

वाढे सारे तोडणाऱ्याला, शेतकऱ्याला धतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST

शरद यादव कोल्हापूर : ऊस तोडल्यानंतर ५० टक्के वाढे शेतकऱ्यांना द्यावे, असा मार्गदर्शक नियम आहे; पण या नियमाला कात्रजचा ...

शरद यादव

कोल्हापूर : ऊस तोडल्यानंतर ५० टक्के वाढे शेतकऱ्यांना द्यावे, असा मार्गदर्शक नियम आहे; पण या नियमाला कात्रजचा घाट केव्हाच दाखवण्यात आला आहे. तोड सुरू असताना शेतकरी वाढे मागायला गेला तर केवळ ५ पेंढ्या देऊन बाकीचे सर्व वाढे विकले जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्याच फडातील वाढे विकत घेतो. एकूणच प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना नागवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अन्यायाचे हे दुष्टचक्र असेच सुरू राहणार आहे. याविरोधात वेळीच आवाज उठविला नाही तर साखर उद्योगच मोडून पडण्यास वेळ लागणार नाही.

साखर कारखाने लक्ष देत नाहीत, चिटबॉयचे कोणी ऐकत नाही, टॅक्टरमालक व मजूर म्हणतील तो दर व तोच तोडणीचा कार्यक्रम, चालकाची एन्ट्री वाढत जाणार असा सारा अंधा कानून सुरू असल्याने अल्पभूधारक शेतकरी पुरता हरला आहे. यावर मार्ग परदेशातून कोणी मसिहा येऊन काढणार नसून आता शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन जोरदार आवाज उठविण्याची वेळ आली आहे.

................

संचालक करतात काय?

कोल्हापूर जिल्ह्यात एका गावाआड कोणत्या तरी कारखान्याचा संचालक आहे. ऊसतोडणी यंत्रणेचा बोजवार उडाला असताना संचालकांनी यात हस्तक्षेप करून शिस्त लावण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक गावात बैठका घेऊन ऊसतोडीसाठी पैसे देणार नाही, क्रमपाळीनुसारच तोडणी होईल, चालकाला रुपयाही मिळणार नाही, असा ठराव ते का करत नाहीत. केवळ कारखान्याच्या मासिक मीटिंगला जाऊन चहा-बिस्कीट खाण्यासाठी संचालक झाला आहात काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.

..........

...तर कोल्हापुरी हातात घ्या

कोल्हापूर जिल्हा आजपर्यंत राज्याला दिशा देण्याचे काम करत आला आहे. हेल्मेट सक्ती विरोधातील आंदोलन आठवा, ऊस, दूध दराचे आंदोलन, टोल हटाव मोर्चा हे सारे काेल्हापुरातच घडले. मग अशा क्रांतिकारी भूमीत कोणीतरी टॅक्टरवाला तोडीसाठी पैसे मागतो, चिटबॉय त्याला प्रोत्साहन देतो, त्यावेळी हातात कोल्हापुरी घेऊन जाब विचारण्याची तयारी ठेवा. साखर कारखान्याच्या संचालकाला दरडाऊन सांगा, यात बदल झाला नाही तर तर पुढील निवडणुकीत दारात उभे करून घेणार नाही. लक्षात ठेवा ही लूट थांबवली नाही तर आज एकराला पाच हजाराचा दर उद्या खेपेला २ टन असा होईल. त्यावेळी ऊस शेती परवडत नाही म्हणून विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे साखरपट्ट्यात आत्महत्या होतील. राजांनो ती वेळ येऊ देऊ नका.

............

कोट...

आम्ही कारखान्यांकडून पत्रे घेऊन ५० टक्के वाढे शेतकऱ्यांना द्यायला लावले आहे, तसेच शिरोळ तालुक्यात एकही रुपया न देता ऊसतोडणीचा कार्यक्रम राबवत आहोत. शेतकऱ्यांनीही तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. तसेच गावागावांत कार्यकर्ते तयार झाले व त्यांनी याविरोधात आवाज उठविला तरच हा प्रश्न निकालात निघेल.

-धनाजी चुडमुंगे,

आंदोलन, अकुंश संघटना

............

कोट....

ऊसतोडणीसाठी पैसे मागणे आता सर्रास झाले आहे. वाढे मागितले तर ते मोळ्यांच्या खाली टाकून देतात. यावर तक्रार केली तर जाणीवपूर्वक वाड्यात चार कांंड्या ऊस धरून तसेच जमिनीलगत ऊस न तोडता नुकसान करण्याचे काम सुरू आहे. साखर कारखान्यांनी यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

-शाहू गायकवाड,

शेतकरी, हुपरी (ता. हातकणंगले)