शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

एकही मूल प्रेम, स्नेहापासून वंचित राहू नये : संभाजीराजे -जिजाऊ संस्थेतर्फे मायेचे पंख अन संस्काराची सावली उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 20:26 IST

कोल्हापूर : संस्थेत राहणाºया मुलांना दैनंदिन गरजांसाठी लागणाºया वस्तू, खाऊ यांपेक्षाही मायेच्या ओलाव्याची गरज असते. अन्य मुलांप्रमाणे आपल्याशीही प्रेमाने बोलणारे पालक आहेत, ही भावना त्यांचे आयुष्य बदलून टाकते.

कोल्हापूर : संस्थेत राहणाºया मुलांना दैनंदिन गरजांसाठी लागणाºया वस्तू, खाऊ यांपेक्षाही मायेच्या ओलाव्याची गरज असते. अन्य मुलांप्रमाणे आपल्याशीही प्रेमाने बोलणारे पालक आहेत, ही भावना त्यांचे आयुष्य बदलून टाकते. पालकांविना जगणारे एकही मूल प्रेम आणि स्नेहापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी ‘जिजाऊ’ संस्थेने सुरू केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे, असे उद्गार खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी काढले.

आपल्या मायेच्या पंखांखाली रयतेला सामावून घेतलेल्या जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून संयोगिताराजे छत्रपतींच्या संकल्पनेतून ' जिजाऊ... मायेचे पंख अन् संस्कारांची सावली’ ही चळवळ बालकल्याण संकुलामध्ये सुरू करण्यात आली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संयोगिताराजे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील, नंदिनी पटोडिया, उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, बालकल्याण समितीच्या प्रिया चोरगे उपस्थित होत्या.

ते म्हणाले, काही कारणांमुळे लहान मुलांच्या डोक्यावरून पालकांच्या मायेचे छत्र हरवते. आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण आपण त्या मुलांशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब देऊ शकतो. त्यामुळे मुलांतील वंचिततेची भावना कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. या उपक्रमांतर्गत नावनोंदणी केलेल्या पालकांनी, व्यक्तींना मुलांना प्रेम द्यावे. बालकल्याण संकुलाला आमच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.संयोगिताराजे म्हणाल्या, अनेक लोक संस्थेत येऊन वाढदिवस साजरा करतात.

मुलांना कपडे, खाऊचे वाटप करतात; पण ते स्वीकारताना मुलांच्या मनात आपल्यावर कोणीतरी उपकार करीत असल्याची भावना निर्माण होते. येथे गरज आहे ती मनाच्या श्रीमंतीची. पुढाकार घेतलेल्या पालकांनी आपल्याला जमेल त्यावेळी आठवड्यातून एकदा संस्थेत येऊन मुलांसोबत फक्त वेळ घालवायचा आहे. त्यांच्या भावना समजून घेत आई-वडिलांप्रमाणे स्नेह आणि प्रेम द्यायचे आहे. ही चळवळ एक दिवस किंवा कोल्हापूरपुरती मर्यादित न ठेवता राज्यभरात तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

धैर्यशील माने यांनी आपल्या मनोगतात बालकल्याण संकुलामध्ये राहणाºया मुलांमध्ये खरी धर्मनिरपेक्षता पाहायला मिळते, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या कार्याची माहिती दिली. ‘जिजाऊ’ या चळवळीत आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.सुरेश शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. पद्मजा तिवले यांनी आभार मानले.कोल्हापुरात ‘जिजाऊ’ या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मायेचे पंख’ उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी बालकल्याण संकुलामध्ये संयोगिताराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी धैर्यशील माने, डॉ. अमर आडके, पद्मजा तिवले, प्रिया चोरगे, व्ही. बी. पाटील, खासदार संभाजीराजे उपस्थित होते.