शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

एकही मूल प्रेम, स्नेहापासून वंचित राहू नये : संभाजीराजे -जिजाऊ संस्थेतर्फे मायेचे पंख अन संस्काराची सावली उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 20:26 IST

कोल्हापूर : संस्थेत राहणाºया मुलांना दैनंदिन गरजांसाठी लागणाºया वस्तू, खाऊ यांपेक्षाही मायेच्या ओलाव्याची गरज असते. अन्य मुलांप्रमाणे आपल्याशीही प्रेमाने बोलणारे पालक आहेत, ही भावना त्यांचे आयुष्य बदलून टाकते.

कोल्हापूर : संस्थेत राहणाºया मुलांना दैनंदिन गरजांसाठी लागणाºया वस्तू, खाऊ यांपेक्षाही मायेच्या ओलाव्याची गरज असते. अन्य मुलांप्रमाणे आपल्याशीही प्रेमाने बोलणारे पालक आहेत, ही भावना त्यांचे आयुष्य बदलून टाकते. पालकांविना जगणारे एकही मूल प्रेम आणि स्नेहापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी ‘जिजाऊ’ संस्थेने सुरू केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे, असे उद्गार खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी काढले.

आपल्या मायेच्या पंखांखाली रयतेला सामावून घेतलेल्या जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून संयोगिताराजे छत्रपतींच्या संकल्पनेतून ' जिजाऊ... मायेचे पंख अन् संस्कारांची सावली’ ही चळवळ बालकल्याण संकुलामध्ये सुरू करण्यात आली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संयोगिताराजे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील, नंदिनी पटोडिया, उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, बालकल्याण समितीच्या प्रिया चोरगे उपस्थित होत्या.

ते म्हणाले, काही कारणांमुळे लहान मुलांच्या डोक्यावरून पालकांच्या मायेचे छत्र हरवते. आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण आपण त्या मुलांशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब देऊ शकतो. त्यामुळे मुलांतील वंचिततेची भावना कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. या उपक्रमांतर्गत नावनोंदणी केलेल्या पालकांनी, व्यक्तींना मुलांना प्रेम द्यावे. बालकल्याण संकुलाला आमच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.संयोगिताराजे म्हणाल्या, अनेक लोक संस्थेत येऊन वाढदिवस साजरा करतात.

मुलांना कपडे, खाऊचे वाटप करतात; पण ते स्वीकारताना मुलांच्या मनात आपल्यावर कोणीतरी उपकार करीत असल्याची भावना निर्माण होते. येथे गरज आहे ती मनाच्या श्रीमंतीची. पुढाकार घेतलेल्या पालकांनी आपल्याला जमेल त्यावेळी आठवड्यातून एकदा संस्थेत येऊन मुलांसोबत फक्त वेळ घालवायचा आहे. त्यांच्या भावना समजून घेत आई-वडिलांप्रमाणे स्नेह आणि प्रेम द्यायचे आहे. ही चळवळ एक दिवस किंवा कोल्हापूरपुरती मर्यादित न ठेवता राज्यभरात तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

धैर्यशील माने यांनी आपल्या मनोगतात बालकल्याण संकुलामध्ये राहणाºया मुलांमध्ये खरी धर्मनिरपेक्षता पाहायला मिळते, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या कार्याची माहिती दिली. ‘जिजाऊ’ या चळवळीत आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.सुरेश शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. पद्मजा तिवले यांनी आभार मानले.कोल्हापुरात ‘जिजाऊ’ या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मायेचे पंख’ उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी बालकल्याण संकुलामध्ये संयोगिताराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी धैर्यशील माने, डॉ. अमर आडके, पद्मजा तिवले, प्रिया चोरगे, व्ही. बी. पाटील, खासदार संभाजीराजे उपस्थित होते.