शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

एका क्षणी आम्ही बुडून मरणार असंच वाटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘अर्धवट झोपलेलो असताना अचानक गाडी थांबली. बाहेर डोकावून बघितले तर रात्रीचा अंधार, बसमधील लाईटमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘अर्धवट झोपलेलो असताना अचानक गाडी थांबली. बाहेर डोकावून बघितले तर रात्रीचा अंधार, बसमधील लाईटमुळे आजूबाजूला पाणी असल्याचे पहायला मिळाले. वाहक, चालक फोनवर संपर्क साधत होते. त्यांच्या बोलण्यातून आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो असल्याची जाणीव झाली. भितीने अक्षरश: गाळण उडाली. वाचण्याची आशा काही दिसत नव्हती. एका क्षणी तर आम्ही आता मरणारच असं वाटलं आणि हातपाय गळाले.’ अंगावर शहारे आणणारी ही हकीकत आहे, करवीर तालुक्यातील रजपूतवाडीजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांची.

दोन दिवस झाले. २२ प्रवासी व वाहक, चालक सध्या कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डींग येथील निवारा केंद्रात वास्तव्यास आहेत. शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी घडलेली सर्व हकिकत सांगितली. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता विजापूरहून बस रत्नागिरीस निघाली होती. रात्री दीड वाजता ही बस करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे आली. चालकाला अंदाज न आल्याने बस पाण्यात गेली. थोडे अंतरावर गेल्यावर पाण्यातच गाडी बंद पडली. झोपी गेलेले प्रवासी जागे झाले. बाहेर डोकावून बघितले तर चारीबाजूने पाणी होते. त्यात बस बंद पडली. त्यामुळे प्रवासी घाबरले.

चालक श्रीशाल बाेळेगाव यांनी मोबाईलवरून कंट्रोल रुमला फोन केला. त्यांनी दोन क्रमांक दिले आणि त्यावर फोन करा असे सांगितले. त्यानंतर फोन झाले. तासाभराने तीन व्यक्ती पाण्यातून चालत आल्या. त्यांनी परिस्थिती पाहून बोट मागवून घेतली. त्यातून सात महिला, सहा मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पहाटे चार वाजता एक बोट आली. तोपर्यंत नऊ पुरुष बसमध्येच थांबून होते. तोपर्यंत बसमध्ये पाणी शिरले. जवळपास सर्व सीट पाण्यात बुडाल्या. सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. आता आपण काही जगत नाही, मरणार अशीच सर्वांची धारणा झाली. तोच बोट आली. सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आल.

बस वाहक आब्बास आली मुल्ला यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले आहेत, आमच्या कर्नाटकात सुध्दा इतक्या रात्री मदत मिळाली नसती, ती कोल्हापुरात मिळाली. आम्ही को्ल्हापूरकरांचे उपकार कधीही विसरू शकणार नाही, असे मुल्ला म्हणाले.