शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एका क्षणी आम्ही बुडून मरणार असंच वाटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘अर्धवट झोपलेलो असताना अचानक गाडी थांबली. बाहेर डोकावून बघितले तर रात्रीचा अंधार, बसमधील लाईटमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘अर्धवट झोपलेलो असताना अचानक गाडी थांबली. बाहेर डोकावून बघितले तर रात्रीचा अंधार, बसमधील लाईटमुळे आजूबाजूला पाणी असल्याचे पहायला मिळाले. वाहक, चालक फोनवर संपर्क साधत होते. त्यांच्या बोलण्यातून आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो असल्याची जाणीव झाली. भितीने अक्षरश: गाळण उडाली. वाचण्याची आशा काही दिसत नव्हती. एका क्षणी तर आम्ही आता मरणारच असं वाटलं आणि हातपाय गळाले.’ अंगावर शहारे आणणारी ही हकीकत आहे, करवीर तालुक्यातील रजपूतवाडीजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांची.

दोन दिवस झाले. २२ प्रवासी व वाहक, चालक सध्या कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डींग येथील निवारा केंद्रात वास्तव्यास आहेत. शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी घडलेली सर्व हकिकत सांगितली. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता विजापूरहून बस रत्नागिरीस निघाली होती. रात्री दीड वाजता ही बस करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे आली. चालकाला अंदाज न आल्याने बस पाण्यात गेली. थोडे अंतरावर गेल्यावर पाण्यातच गाडी बंद पडली. झोपी गेलेले प्रवासी जागे झाले. बाहेर डोकावून बघितले तर चारीबाजूने पाणी होते. त्यात बस बंद पडली. त्यामुळे प्रवासी घाबरले.

चालक श्रीशाल बाेळेगाव यांनी मोबाईलवरून कंट्रोल रुमला फोन केला. त्यांनी दोन क्रमांक दिले आणि त्यावर फोन करा असे सांगितले. त्यानंतर फोन झाले. तासाभराने तीन व्यक्ती पाण्यातून चालत आल्या. त्यांनी परिस्थिती पाहून बोट मागवून घेतली. त्यातून सात महिला, सहा मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पहाटे चार वाजता एक बोट आली. तोपर्यंत नऊ पुरुष बसमध्येच थांबून होते. तोपर्यंत बसमध्ये पाणी शिरले. जवळपास सर्व सीट पाण्यात बुडाल्या. सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. आता आपण काही जगत नाही, मरणार अशीच सर्वांची धारणा झाली. तोच बोट आली. सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आल.

बस वाहक आब्बास आली मुल्ला यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले आहेत, आमच्या कर्नाटकात सुध्दा इतक्या रात्री मदत मिळाली नसती, ती कोल्हापुरात मिळाली. आम्ही को्ल्हापूरकरांचे उपकार कधीही विसरू शकणार नाही, असे मुल्ला म्हणाले.