शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर विभागात एक कोटी टन उसाचे गाळप

By admin | Updated: January 16, 2016 00:50 IST

गाळपात वारणा, जवाहर आघाडीवर : साखर उताऱ्यात गुरुदत्त टाकळी, बिद्री ‘लय भारी’

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) एकूण ३८ साखर कारखान्यांनी गेल्या अडीच महिन्यांत एक कोटी ७ लाख २६ हजार ९७७ मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून, ११.८३च्या सरासरी साखर उताऱ्यास एक कोटी ३२ लाख १२ हजार ४९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. ४१ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन सहकारी दौलत व इंदिरा महिला कारखाने, तर सांगली जिल्ह्यातील तासगांव सहकारी कारखाना हे बंद आहेत.साखरेचे दर गडगडल्याने एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देता येणे शक्य नाही. एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना एकतर शासनाने आर्थिक मदत करावी अथवा दोन टप्प्यांत एफआरपी देण्याची मुभा द्यावी, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली. यामुळे हंगाम २०१५/१६ सुरूहोण्याबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती; पण खासदार राजू शेट्टी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री यांनी तोडगा काढत अगोदर कारखाने सुरू व किमान एफआरपी तरी देण्याची कायदेशीर बंधने घालू. त्यासाठी ६ डिसेंबरची मुदत कारखानदारांना देण्यात आली; मात्र साखरेच्या दरात सुधारणा होत नसल्यामुळे एफआरपी रकमेपैकी किमान ८० टक्के रक्कम पहिला हप्ता व २० टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यापोटी देण्याचे सूत्र ठरले. याला मान्यता कारखानदारांनीही दिल्याने या हंगामात कोणताच अडथळा आला नाही. मागील वर्षी पावसाची घटलेली टक्केवारी पाहता शेतीतील उभा ऊस ठेवणे शेतकऱ्यांसाठीही जिकिरीचे झाले आहे. सर्वच मोठ्या धरणांतील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागानेही शेतीच्या पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या लवकरात लवकर कारखाने कसा ऊस तोडून नेतील या विवंचणेत शेतकरी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गुरुदत्त’ने १२.८१ टक्के उतारा घेत प्रथम, तर दूधगंगा वेदगंगा बिद्री कारखान्यांने १२.४१चा सरासरी साखर उतारा मिळवीत विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्यापाठोपाठ दत्त दालमिया १२.४४ उतारा मिळवीत तिसरा क्रमांक मिळविला आहे.सांगलीच्या माणगंगा कारखान्याने आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा साखर कारखान्याने ६ लाख ९२ हजार ८०० मे. टन उसाचे गाळप करीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, ६८ लाख ३८ हजार १०५ मे. टन उसाचे गाळप करीत १२.०६च्या सरासरी उताऱ्यासह ८० लाख ३० हजार ६७० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सांगली जिल्ह्यातील १८ पैकी एक साखर कारखाना बंद असून, १७ साखर कारखान्यांनी ३८ लाख ८८ हजार ८७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५१ लाख ८१ हजार ३७९ क्विंटल साखर ११.८६च्या सरासरी उताऱ्याने उत्पादन केले आहे.दृष्टीक्षेपात कोल्हापूर विभागाचा गाळप हंगामसांगलीकारखाने- १८चालू- १७बंद- ०१उसाचे गाळप- ३८ लाख ८८ ह. ८७२ मे. टनसाखर उत्पादन- ५१ लाख ८१ ह. ३७९ क्विंटलसरासरी उतारा- ११.८६कोल्हापूर कारखाने- २३चालू- २१बंद- ०२ऊस गाळप- ६८ लाख ३८ ह. १०५ मेट्रिक टनसाखर उत्पादन- ८० लाख ३० ह.६७० क्विंटलसरासरी उतारा- १२.०६