शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागात एक कोटी टन उसाचे गाळप

By admin | Updated: January 16, 2016 00:50 IST

गाळपात वारणा, जवाहर आघाडीवर : साखर उताऱ्यात गुरुदत्त टाकळी, बिद्री ‘लय भारी’

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) एकूण ३८ साखर कारखान्यांनी गेल्या अडीच महिन्यांत एक कोटी ७ लाख २६ हजार ९७७ मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून, ११.८३च्या सरासरी साखर उताऱ्यास एक कोटी ३२ लाख १२ हजार ४९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. ४१ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन सहकारी दौलत व इंदिरा महिला कारखाने, तर सांगली जिल्ह्यातील तासगांव सहकारी कारखाना हे बंद आहेत.साखरेचे दर गडगडल्याने एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देता येणे शक्य नाही. एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना एकतर शासनाने आर्थिक मदत करावी अथवा दोन टप्प्यांत एफआरपी देण्याची मुभा द्यावी, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली. यामुळे हंगाम २०१५/१६ सुरूहोण्याबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती; पण खासदार राजू शेट्टी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री यांनी तोडगा काढत अगोदर कारखाने सुरू व किमान एफआरपी तरी देण्याची कायदेशीर बंधने घालू. त्यासाठी ६ डिसेंबरची मुदत कारखानदारांना देण्यात आली; मात्र साखरेच्या दरात सुधारणा होत नसल्यामुळे एफआरपी रकमेपैकी किमान ८० टक्के रक्कम पहिला हप्ता व २० टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यापोटी देण्याचे सूत्र ठरले. याला मान्यता कारखानदारांनीही दिल्याने या हंगामात कोणताच अडथळा आला नाही. मागील वर्षी पावसाची घटलेली टक्केवारी पाहता शेतीतील उभा ऊस ठेवणे शेतकऱ्यांसाठीही जिकिरीचे झाले आहे. सर्वच मोठ्या धरणांतील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागानेही शेतीच्या पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या लवकरात लवकर कारखाने कसा ऊस तोडून नेतील या विवंचणेत शेतकरी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गुरुदत्त’ने १२.८१ टक्के उतारा घेत प्रथम, तर दूधगंगा वेदगंगा बिद्री कारखान्यांने १२.४१चा सरासरी साखर उतारा मिळवीत विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्यापाठोपाठ दत्त दालमिया १२.४४ उतारा मिळवीत तिसरा क्रमांक मिळविला आहे.सांगलीच्या माणगंगा कारखान्याने आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा साखर कारखान्याने ६ लाख ९२ हजार ८०० मे. टन उसाचे गाळप करीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, ६८ लाख ३८ हजार १०५ मे. टन उसाचे गाळप करीत १२.०६च्या सरासरी उताऱ्यासह ८० लाख ३० हजार ६७० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सांगली जिल्ह्यातील १८ पैकी एक साखर कारखाना बंद असून, १७ साखर कारखान्यांनी ३८ लाख ८८ हजार ८७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५१ लाख ८१ हजार ३७९ क्विंटल साखर ११.८६च्या सरासरी उताऱ्याने उत्पादन केले आहे.दृष्टीक्षेपात कोल्हापूर विभागाचा गाळप हंगामसांगलीकारखाने- १८चालू- १७बंद- ०१उसाचे गाळप- ३८ लाख ८८ ह. ८७२ मे. टनसाखर उत्पादन- ५१ लाख ८१ ह. ३७९ क्विंटलसरासरी उतारा- ११.८६कोल्हापूर कारखाने- २३चालू- २१बंद- ०२ऊस गाळप- ६८ लाख ३८ ह. १०५ मेट्रिक टनसाखर उत्पादन- ८० लाख ३० ह.६७० क्विंटलसरासरी उतारा- १२.०६