शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

'वन' जमिनीचे महिन्यात हस्तांतरण

By admin | Updated: May 30, 2015 00:46 IST

चंद्रकांतदादा पाटील : कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत सरकारची सकारात्मक भूमिका

कोल्हापूर : कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. ‘एअर इंडिया’ने कोल्हापुरातून सेवा पुरविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. याबाबत त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी चर्चा केली.केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले, विमानतळाबाबत मुंबईत पालक सचिव आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण, एमआयडीसीचे अधिकारी यांच्या बैठकीला मला काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. मात्र, या बैठकीत ‘एअर इंडिया’ने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. यात एअर इंडियाने विमानसेवा पुरवीत असताना काही तोटा झाल्यास त्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी अट घातली आहे. सेवा पुरविण्यातील अडथळे दूर करण्यासह कंपनीने घातलेल्या अटींबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. सैनी यांच्याशी विमानसेवा आणि विस्तारीकरण याबाबत चर्चा केली. प्रारंभी डॉ. सैनी यांनी मुंबईतील बैठकीची माहिती देत विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या वन विभागाच्या जमीन हस्तांतरणाबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी प्रस्ताव सादर झाल्यानंतर शासन पातळीवरील विविध स्वरूपांतील मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करून महिन्याभरात प्राधिकरणाकडे संबंधित जमिनीचे हस्तांतरण केले जाईल. तसेच विस्तारीकरण आणि अन्य सुविधांच्या पूर्ततेबाबत दिल्ली येथे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)नितीन गडकरी यांचे स्वागत...खास विमानाने दिल्ली येथून सकाळी पावणेबाराच्या सुमारास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. याठिकाणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, राहुल चिकोडे, विजय जाधव, आदी उपस्थित होते. विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यक्रमासाठी गेले. सायंकाळी पाच वाजता ते विमानतळावर आले. तेथून विमानाने ते मुंबईला रवाना झाले.