शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
3
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
4
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
5
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
6
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
7
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
8
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
9
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
10
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
11
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
12
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
13
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
14
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
15
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
16
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
17
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
18
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
19
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरास एक दिवसआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:47 IST

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : यंदा चांगला पाऊस झाला असून, जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पंचगंगा नदी बारमाही वाहत आहे. पाण्याची कसलीही टंचाई नाही. तरीही केवळ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणून शहरवासीयांना यापुढे ‘एक दिवसआड’ पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. पाणीवाटपाचे नियोजन फसल्यामुळे त्यातून योग्य मार्ग ...

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : यंदा चांगला पाऊस झाला असून, जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पंचगंगा नदी बारमाही वाहत आहे. पाण्याची कसलीही टंचाई नाही. तरीही केवळ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणून शहरवासीयांना यापुढे ‘एक दिवसआड’ पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. पाणीवाटपाचे नियोजन फसल्यामुळे त्यातून योग्य मार्ग काढण्याऐवजी चक्क ‘एक दिवसआड’ पाणीपुरवठ्याचा पर्याय समोर आणल्यामुळे त्यावर वादविवाद होण्याची दाट शक्यता आहे.कोल्हापूर शहरातील काही भागांत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात तीन ठिकाणी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. स्थायी समितीच्या सभेत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना जाब विचारला गेला. तसेच पाणीपुरवठ्यात तातडीने सुधारणा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. मात्र प्रशासनाने आपल्या चुकांवर पांघरूण घालून शहरवासीयांनाच ‘एक दिवसआड’ पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू केला आहे. ज्या भागात पाण्याचा प्रश्न आहे, तेथील भौगोलिक परिस्थिती, पाण्याची वेळ आणि पाणी न मिळण्याची कारणे शोधण्याचे काम अधिकाºयांनी करायला पाहिजे होते. मात्र तसे न करता थेट ‘एक दिवसआड’ पाणीपुरवठा करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. तसा प्रस्ताव लवकरच महासभेकडे मंजुरीकरिता पाठविला जाणार आहे.जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. नदीत पुरेसे पाणी वाहत आहे. पाण्याची कसलीच टंचाई नाही. पाणी मुबलक असताना ‘एक दिवसआड’चा प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. चुका अधिकारी करीत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना का? असा सवाल या निमित्ताने तयार झाला आहे.अधिकाºयांनी पाणीपुरवठ्यातील चुका, दोष, उणिवा शोधून त्यांवर पर्याय शोधावेत आणि नागरिकांना किमान चार तास पण पुरेशा दाबाने पाणी द्यावे, अशी मागणी नगरसेवकांतून केली जात आहे. काही नगरसेवकांच्या मते ‘एक दिवसआड’मुळे लोकांना पाण्याचा जपून वापर करण्याची सवय लागेल. त्यामुळे तसा कार्यक्रम जाहीर करायला हरकत नाही; पण त्यानंतर तरी पाणीपुरवठा व्यवस्थित होणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जातो.प्रशासनाच्या प्रस्तावावर नगरसेवकांत दोन मतप्रवाह आहेत. आंदोलन केले की पाणीपुरवठा सुरळीत होतो. मग ‘एक दिवसआड’चा पर्याय कशाला पाहिजे, अशी विचारणा साईक्स परिसरातील नगरसेवक संजय मोहिते यांनी केली आहे; तर मंगळवार पेठ परिसरातील नगरसेवक संभाजी जाधव यांनी उपनगरांची संख्या वाढली आहे, त्यांना पाणी द्यायचे असेल तर एक दिवसआड पाणीपुरवठा केल्यास सर्वांना मुबलक पाणी मिळेल, असे सांगितले. अनेक घरांत दोन दिवसांचे पाणी साठवून ठेवण्याची सोय नाही. त्यांची गैरसोय होणार आहे.नगरसेवकांत भांडणे लावण्याचा प्रयत्नपाणीपुरवठा विभागातील अधिकारी जेव्हा नियोजनात कमी पडतात, पाणीपुरवठा सुरळीत करायला कमी पडतात, तेव्हा हेच अधिकारी नगरसेवकांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात, असा काहींचा आक्षेप आहे. चुकीचा माहिती देऊन नगरसेवकांची दिशाभूल केली जाते. नगरसेवक भांडत बसतात आणि अधिकारी नामानिराळे होतात असा अनुभव आहे, असे नगरसेवक सांगतात.