शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘जुनीच पेन्शन’ पाहिजे: नवीन पेन्शन बेभरवशाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:03 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन पाहिजे आहे; कारण ही पेन्शन सुरक्षित असून, संपूर्ण कुटुंबालाही लाभदायी आहे. त्याउलट नवीन पेन्शन योजना ही बेभरवशाची आहे; त्यामुळे जुनीच पेन्शन द्यावी, अशी भावना सरकारी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे; त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे.

ठळक मुद्दे‘जुनीच पेन्शन’ पाहिजे: नवीन पेन्शन बेभरवशाची : सरकारी कर्मचाऱ्यांची भावना : लढा सुरूच

प्रवीण देसाईकोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन पाहिजे आहे; कारण ही पेन्शन सुरक्षित असून, संपूर्ण कुटुंबालाही लाभदायी आहे. त्याउलट नवीन पेन्शन योजना ही बेभरवशाची आहे; त्यामुळे जुनीच पेन्शन द्यावी, अशी भावना सरकारी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे; त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे.राज्य शासनाच्या ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार पाच नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस) लागू केली; त्यामुळे राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या म्हणजेच जुन्या कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशदायीकरण व जुन्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना याच्या तरतुदी शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ ला किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांना त्यांचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या १0 टक्के इतके मासिक अंशदान द्यावे लागेल. या रकमेएवढेच शासन अंशदान देईल. या योजनेखाली जमणाऱ्या निधीचे व्यवस्थापन व विनिमय करण्यासाठी एक स्वतंत्र विकास प्राधिकरणाची स्थापना सरकारने केली आहे.

एकंदरीत या पेन्शन योजनेवरच कर्मचाऱ्यांचा भरवसाच राहिलेला नाही. यात गुतंवलेल्या निधीची सुरक्षितता कर्मचाऱ्यांना वाटत नाही, तसेच २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, फॅमिली पेन्शन नाही, प्रॉव्हिडंड फंड नाही, कर्मचारी मृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील कोणालाच नोकरीची हमी नाही; त्यामुळे पेन्शनला विरोध करत गेल्या १४ वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली आहे.

जिल्'ातील १५ हजार कर्मचारी नवीन पेन्शनवालेजिल्'ातील सुमारे १५ हजार सरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ नंतरची नवीन पेन्शन योजना लागू आहे, तर ४२ हजार कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वीची जुनी पेन्शन लागू आहे.

जुन्या पेन्शनचे फायदे१) जुन्या पेन्शनसाठी सर्व पैसे शासन भरते.२) कर्मचारी मृत झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना ‘फॅमिली पेन्शन’चा लाभ.

जुनीच पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. नवीन पेन्शन योजना बेभरवशाची असून, ती कर्मचाऱ्यांना मंजूर नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून याविरोधात आंदोलन सुरू आहे. जुन्या पेन्शनसाठी इथून पुढेही लढा सुरूच राहील.- अनिल लवेकर, निमंत्रक,शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर