शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बंदोबस्तावरील जवानांचा रंगला कौतुक सोहळा जुना बुधवार पेठेने व्यक्त केली कृतज्ञता : पुष्पगुच्छ आणि कोल्हापुरी भगवा फेटा प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:45 IST

कोल्हापूर : गेले १५ दिवस सिद्धार्थनगरात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) जवानांचा सत्कार जुना बुधवार तालीमने बुधवारी (दि .१७) रात्री पुष्पगुच्छ व कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून केला.

कोल्हापूर : गेले १५ दिवस सिद्धार्थनगरात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) जवानांचा सत्कार जुना बुधवार तालीमने बुधवारी (दि .१७) रात्री पुष्पगुच्छ व कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून केला.पंधरा दिवस ज्या जवानांनी डोळ्यात तेल घालून याठिकाणी बंदोबस्त केला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय परिसरातील माजी नगरसेवक धनंजय सावंत, तालमीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, रणजित पाटील, संजय पाटील, सुनील शिंदे, रमेश गवळी सुशील भांदिगरे आदींनी घेतला. त्यानुसार तालमीच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व जवानांना रात्री कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद देऊन पाहुणचार केला.यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील उपस्थित होते.यावेळी प्रशांत अमृतकर म्हणाले,आम्ही पोलिस रात्री घरी जाऊ शकतो. कुटुंबात थोडा वेळ देऊ शकतो. पण हजारो किलो मीटर अंतरावरुन येऊन राज्य पोलिस दलाचे कर्मचारी बंदोबस्त करतात.त्यांचा कामाची दखल जुना बुधवार तालीमने घेतली. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.दरम्यान,तालमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी राज्य राखीव जवानांनी अनेक तणावाच्या ठिकाणी आम्ही काम केले.यावेळी काम करताना आमच्यावर ताण येत होता. मात्र, तालमीच्या परिसरात पहिल्या दिवसापासून नागरिकांनी सहकार्य केले, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दादासो मोरे, प्रताप उर्फ बापू घोरपडे, दिलीप गवळी, दिलीप दिंडे, रमेश पुरेकर,आनंदा वरेकर, सुशांत महाडिक, किसन पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.कोरेगांव-भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन जानेवारीला कोल्हापूर बंद होते. दिवसभर झालेल्या तणावामुळे राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी बोलविण्यात आली होती. त्यानंतर जुना बुधवार तालीमकडून सिद्धार्थनगरकडे जाणाºया रस्त्यावर जवानांचा बंदोबस्त होता. पण जुना बुधवार पेठ आणि सिद्धार्थनगरातील भावनिक नात्यामुळे तीन तारखेच्या घटनेनंतर कोणताही वाद झाला नाही. तरीही जुना बुधवार पेठ व सिद्धार्थनगरातील लोकांना राज्य राखीव पोलिस दलाचा आधार होता. हळूहळू परिसरातील लोकांचा या जवानांबरोबर परिचय होऊ लागला. नागरिक त्यांना चहा पाणी, नाष्टा देऊ लागले व वातारवरण निवळू लागले.संक्रातीच्या सणाला महिलांनी भोगीला बाजरीची भाकरी, संक्रांतीला पोळ्याचे जेवण दिले. तिळगुळ देऊन काहींनी आभार मानले. नागरिकांच्या आपुलकीमुळे पोलिस भारावले.कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळाने बंदोबस्तासाठी सिद्धार्थनगर येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा सत्कार बुधवारी पुष्पगुच्छ देऊन भगवा फेटा बांधून करण्यात आला. याप्रसंगी शहर पोलीस उपअधीक्षकडॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह जवान उपस्थित होते.