शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अधिकाºयांना फिरविले चिखलातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:31 IST

सांगली : गेल्या दोन दिवसात सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शामरावनगर परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील दहा ते पंधरा घरात पावसाचे पाणी शिरले असून, गटारी तुंडुंब भरल्या आहेत.

ठळक मुद्दे नगरसेवकांसह नागरिकांचा ठिय्या : शामरावनगरातील घरांमध्ये पाणी शिरलेबहुतांश घरांना पाण्याने वेढा दिला आहे. मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचून आहे. पवार यांना दलदलीत फिरवून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेल्या दोन दिवसात सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शामरावनगर परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील दहा ते पंधरा घरात पावसाचे पाणी शिरले असून, गटारी तुंडुंब भरल्या आहेत.याविरोधात गुरुवारी संतप्त नागरिकांनी नगरसेवकांसह चिखलात ठिय्या मारला. महापालिकेच्या अधिकाºयांनीही तातडीने या परिसराला भेट देऊन पाहणी केली. तब्बल तीन ते चार किलोमीटर अंतर अधिकाºयांना चिखलातून फिरविले. महापालिकेच्या निषेधाच्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.

शामरावनगर परिसरातील ज्ञानेश्वर कॉलनी, मॉडर्न कॉलनी, झहीर मस्जीद परिसर, फिरदोस मोहल्ला, जनता बँक कॉलनी, महादेव मंदिर परिसर, सोनार सोसायटी, महसूल कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, दुर्वांकुर सोसायटी परिसरात दलदल, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डुकरांचा वावर आणि खुल्या भूखंडांमध्ये सांडपाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याने दहा ते बारा घरात पाणी शिरले आहे. तेथील कुटुंबांवर स्थलांतराची वेळ आली आहे. बहुतांश घरांना पाण्याने वेढा दिला आहे. मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचून आहे.

याविरोधात राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महिलांसह नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी या दलदलीतच ठिय्या मारला. नगरसेवक राजू गवळी, बाळासाहेब गोंधळी, अलका पवार, माजी नगरसेवक हणमंत पवार यांनीही आंदोलनात भाग घेतला.शाखा अभियंता आर. डी. सूर्यवंशी यांना प्रशासनाच्यावतीने आंदोलनस्थळी पाठविण्यात आले. नागरिकांनी सूर्यवंशी यांना सिद्धिविनायक कॉलनी परिसरात पाण्यातच उभे केले. नागरिकांनी थेट उपायुक्त, आयुक्तांना संपर्क साधला. तुम्ही येऊन परिस्थिती पाहा, आम्ही काय नरकयातना भोगतो, हे पाहून उपाययोजना सुरू करा, त्याशिवाय सूर्यवंशी यांना सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी उपायुक्त सुनील पवार यांना शामरावनगरला पाठविले. पवार यांना दलदलीत फिरवून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर गवळी, गोंधळे यांच्यासह अधिकाºयांनी ड्रेनेज ठेकेदारावर आगपाखड करीत मुरुम टाकण्याचे आदेश दिले. तात्काळ दोन जेसीबी, दोन डंपरच्या साहाय्याने मुरुमीकरण सुरू करण्यात आले. नाल्याचे सांडपाणी बाहेर काढणे, तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा काढण्यासही प्रारंभ झाला.

आंदोलनावेळी सुधा हेगडे, शफिरा मकानदार, जन्नतबी मकानदार काशिबाई आडसुळे, सविता भंडारे, वर्षा क्षीरसागर, अलका तिवडे, मीना वारे, रहिना शेख, वंदना कांबळे, वैशाली काळे, शशिकला ओतारी, जुबेर मुल्ला, विनोद हेगडे, हणमंत कांबळे, तम्मा कांबळे, अरुण आडसुळे, विजय आडसुळे, राजू अळगुडगीकर, दत्ता माळगे आदी उपस्थित होते.पाण्यात सापांचा वावर, मृत डुकरेशामरावनगर परिसरात घाणीचे साम्राज्य आणि अडगळीमुळे डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशातच गुरुवारी अनेक ठिकाणी डुकरे मरून पडली होती. सुमारे शंभरहून अधिक डुकरे पाण्यात पडून दुर्गंधी पसरली होती. महापालिका प्रशासनाने तत्काळ दोन डंपर भरून ही डुकरे हटविली. अधिकाºयांच्या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सापही दिसले. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. महिलांनी तर महापालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिव्यांची लाखोली वाहिली.