शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विभागीय कार्यालयात अधिकारी हजर.. पण तक्रारदारच गैरहजर; कोल्हापूर शहरातील समस्याच संपल्या की काय?

By पोपट केशव पवार | Updated: September 17, 2025 13:48 IST

सहाय्यक आयुक्त नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून तत्काळ कार्यवाही करणार

पोपट पवारकोल्हापूर : महानगरपालिका विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्तांना पूर्णवेळ बसवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम निर्णय स्तुत्य असला तरी अजूनही या उपक्रमाला नागरिकांचा तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. प्रत्येक मंगळवारी सहाय्यक आयुक्त दोन तास नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून तत्काळ कार्यवाही करणार आहेत. मात्र, चारही विभागांमध्ये मंगळवारी प्रत्येकी पाच ते सहा तक्रारींवर एकही तक्रार आली नसल्याने नेमकी या उपक्रमाबाबत जागृती नाही की शहरातील समस्याच संपल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयुक्तांना प्रदान केलेले अधिकार त्यांनी प्रभाग स्तरावर विकेंद्रित करुन सहाय्यक आयुक्तांना ते अधिकार दिले आहेत. त्यामुळे चारही विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्तांना पूर्णवेळ बसण्यास सांगितले आहे. या चार विभागीय कार्यालयांमार्फत नागरिकांना अधिक वेगाने व कार्यक्षमतेने महापालिकेच्या सेवा मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रशासकांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती शहरातील अनेक नागरिकांना नाही. अजूनही झाडाच्या फांद्या तोडणे, कचरा, ड्रेनेज, अतिक्रमणाच्या तक्रारी महापालिकेच्या मुख्यालयातच जात आहेत. त्यामुळे प्रभाग क्षेत्र कार्यालयात बसणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना रिकामे बसण्याची वेळ आली आहे.

नगर रचनाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळेनाविभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक मंगळवारी नागरिकांच्या भेटीवेळी पाणीपुरवठा, अतिक्रमण, बांधकाम, नगररचना, आरोग्य यासह प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आहेत. मात्र, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांनी नेमक्या तक्रारी करायच्या कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या मंगळवारी काही विभागीय कार्यालयात नगर रचनाचे संबंधित अधिकारी आलेच नसल्याचे दिसून आले.यंत्रणाही अपुरी, काम होईल का याबाबत शंकासहाय्यक आयुक्तांना विभागीय स्तरावर अधिकार दिले असले तरी येथे यंत्रणा मात्र अपुरीच आहे. ड्रेनेज किंवा तत्सम कामासाठी एखादा जेसीबी, टिप्पर हवा असेल तर तोही मुख्य कार्यालयाकडूनच गॅरेजमधूनच मागवून घ्यावा लागतो. त्यामुळे तक्रारीनंतर तत्काळ समस्या सोडविण्यासाठीही मर्यादा येत आहेत.

कोणत्या प्रभागात किती तक्रारीविभाग  - तक्रार

  • विभागीय कार्यालय क्र.१ गांधी मैदान :  ५
  • विभागीय कार्यालय क्र.२ छत्रपती शिवाजी मार्केट : - १
  • विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपुरी :   -  ४       
  • विभागीय कार्यालय क्र.४ ताराराणी मार्केट :  ०१

मंगळवारी दुपारपर्यंत माझ्याकडे अतिक्रमणाबाबत एक तक्रार आली आहे. पण नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाल्यानंतर ते स्वत:हून तक्रार घेऊन येतील. - कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त, ताराराणी मार्केट विभाग कार्यालय