शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय कार्यालयात अधिकारी हजर.. पण तक्रारदारच गैरहजर; कोल्हापूर शहरातील समस्याच संपल्या की काय?

By पोपट केशव पवार | Updated: September 17, 2025 13:48 IST

सहाय्यक आयुक्त नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून तत्काळ कार्यवाही करणार

पोपट पवारकोल्हापूर : महानगरपालिका विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्तांना पूर्णवेळ बसवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम निर्णय स्तुत्य असला तरी अजूनही या उपक्रमाला नागरिकांचा तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. प्रत्येक मंगळवारी सहाय्यक आयुक्त दोन तास नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून तत्काळ कार्यवाही करणार आहेत. मात्र, चारही विभागांमध्ये मंगळवारी प्रत्येकी पाच ते सहा तक्रारींवर एकही तक्रार आली नसल्याने नेमकी या उपक्रमाबाबत जागृती नाही की शहरातील समस्याच संपल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयुक्तांना प्रदान केलेले अधिकार त्यांनी प्रभाग स्तरावर विकेंद्रित करुन सहाय्यक आयुक्तांना ते अधिकार दिले आहेत. त्यामुळे चारही विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्तांना पूर्णवेळ बसण्यास सांगितले आहे. या चार विभागीय कार्यालयांमार्फत नागरिकांना अधिक वेगाने व कार्यक्षमतेने महापालिकेच्या सेवा मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रशासकांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती शहरातील अनेक नागरिकांना नाही. अजूनही झाडाच्या फांद्या तोडणे, कचरा, ड्रेनेज, अतिक्रमणाच्या तक्रारी महापालिकेच्या मुख्यालयातच जात आहेत. त्यामुळे प्रभाग क्षेत्र कार्यालयात बसणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना रिकामे बसण्याची वेळ आली आहे.

नगर रचनाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळेनाविभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक मंगळवारी नागरिकांच्या भेटीवेळी पाणीपुरवठा, अतिक्रमण, बांधकाम, नगररचना, आरोग्य यासह प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आहेत. मात्र, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांनी नेमक्या तक्रारी करायच्या कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या मंगळवारी काही विभागीय कार्यालयात नगर रचनाचे संबंधित अधिकारी आलेच नसल्याचे दिसून आले.यंत्रणाही अपुरी, काम होईल का याबाबत शंकासहाय्यक आयुक्तांना विभागीय स्तरावर अधिकार दिले असले तरी येथे यंत्रणा मात्र अपुरीच आहे. ड्रेनेज किंवा तत्सम कामासाठी एखादा जेसीबी, टिप्पर हवा असेल तर तोही मुख्य कार्यालयाकडूनच गॅरेजमधूनच मागवून घ्यावा लागतो. त्यामुळे तक्रारीनंतर तत्काळ समस्या सोडविण्यासाठीही मर्यादा येत आहेत.

कोणत्या प्रभागात किती तक्रारीविभाग  - तक्रार

  • विभागीय कार्यालय क्र.१ गांधी मैदान :  ५
  • विभागीय कार्यालय क्र.२ छत्रपती शिवाजी मार्केट : - १
  • विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपुरी :   -  ४       
  • विभागीय कार्यालय क्र.४ ताराराणी मार्केट :  ०१

मंगळवारी दुपारपर्यंत माझ्याकडे अतिक्रमणाबाबत एक तक्रार आली आहे. पण नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाल्यानंतर ते स्वत:हून तक्रार घेऊन येतील. - कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त, ताराराणी मार्केट विभाग कार्यालय