शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

ओडिशाचे राजकारण एका व्यक्तीच्या भोवती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 01:05 IST

वसंत भोसले देशातील काही राज्यांना गरिबीचा शापच आहे. त्यात ओडिशा राज्याचाही समावेश आहे. प्रचंड खनिज संपत्ती, जंगल आणि डोंगराळ ...

वसंत भोसलेदेशातील काही राज्यांना गरिबीचा शापच आहे. त्यात ओडिशा राज्याचाही समावेश आहे. प्रचंड खनिज संपत्ती, जंगल आणि डोंगराळ प्रदेशात विस्तारित ओडिशामध्ये दारिद्र्य प्रचंड आहे. औद्योगिकीरणाचा अभाव, मागास शेती आणि ग्रामविकासाकडे दुर्लक्ष झाल्याने ओडिशाने प्रगतीची पहाट पाहिलेलीच नाही. या दारिद्र्याच्या समस्येकडे लक्ष न दिल्याने एकेकाळी भारतीय काँग्रेसचा प्रभाव असलेले राज्य पुढे विरोधी पक्षांकडे गेले. तेथे गेली वीस वर्षे काँग्रेस सत्तेबाहेर आहे. पूर्वी या राज्याचे नाव खासगी हवाई क्षेत्रातील वैमानिक विजयानंद ऊर्फ बिजू पटनायक यांच्याशी जोडले गेले होते. त्यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये वैमानिक म्हणून काम केले. स्वतंत्र भारतात त्यांनी काँग्रेसच्यामार्फत राष्ट्रीय राजकारणात सहभाग घेतला. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद झाल्याने ते विरोधी पक्षाची भूमिका बजावू लागले. बिजू पटनायक हीच गेल्या पन्नास वर्षांत ओडिशात काँग्रेसविरोधातील शक्ती म्हणून ओळखली गेली. त्यांच्या निधनानंतर (१७ एप्रिल १९९७) जनता दलातील त्यांच्या ओडिशातील समर्थकांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चिरंजीव नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बिजू यांच्या नावानेच जनता दलाची स्थापना करण्यात आली. (२६ डिसेंबर १९९७) तीच ओडिशाची अस्मिता ठरली.काँग्रेसविरोधात बिजू जनता दलाने प्रथम भाजपशी आघाडी करून १९९८ ची निवडणूक लढविली. राज्यातील २१ पैकी नऊ जागा जिंकल्या. पुढे १९९९ मध्ये दहा जागा जिंकल्या. नवीन पटनायक यांची अस्का मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे खनिज संपत्ती मंत्रिपद दिले गेले. मार्च २००० मध्ये राज्य विधानसभेची निवडणूक झाली. भाजपशी युती करून त्यांनी ती जिंकली. मग त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून गेले. २००४ मध्ये त्यांनी लोकसभेबरोबर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यातही बहुमत मिळविले. हे यश नवीन पटनायकांना मिळत असले तरी भाजपशी सुप्तपणे राजकीय संघर्ष चालू होता. भाजपला प्रमुख पक्ष होण्याची घाई होती. या राज्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती.अशा अवस्थेत भाजपने बजरंग दलाच्या आडून ख्रिश्चन मिशनरी विरुद्ध हिंसात्मक मार्ग स्वीकारून हल्ले केले. परिणामी २००७ मधील हिंसाचाराने देशभर वादळ उमटले. नवीन पटनायक हे आधुनिक विचारांचे आहेत. त्यांचे बहुतांश वास्तव्य ओडिशाच्या बाहेरच झाल्याने त्यांना ओडिया भाषा येत नाही. हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषा त्यांना उत्तम येतात. ते इंग्रजीमध्ये लिखाण करतात. संगीत ऐकतात. त्यांची जीवनपद्धती ही युरोपीयन आहे. रोमनमध्ये लिहिलेली ओडिया भाषेतील भाषणे ते वाचून दाखवितात.मात्र, त्यांच्या सरकारच्या अनेक योजना या सर्व समाज घटकांना सामावून घेणाºया आहेत. शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर, ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्याच्या सुविधा देणे, रस्ते बांधणी, आदी कार्यक्रम त्यांनी प्राधान्याने राबविले. भाजपच्या प्रयत्नांपासून ते सावध होते. ख्रिश्चनांवरील हल्ल्यानंतर त्यांनी भाजपशी आघाडी तोडली आणि २००९ तसेच २०१४ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या. त्यामध्ये बिजू जनता दलाला प्रचंड यश मिळाले.