शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा अध्यादेश प्राप्त

By admin | Updated: June 25, 2017 00:58 IST

दोन वर्षांत कामे पूर्ण करावी लागणार : मुख्यमंत्र्यांसमोरील सादरीकरणानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संपूर्ण देशभरात ख्याती असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्यातील सर्व शुक्लकाष्ठ आता दूर झाले असून, एक औपचारिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्याचे सादरीकरण झाल्यानंतर ६८ कोटी ७० लाख रुपयांच्या या आराखड्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होईल. दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून त्याबाबतचा अध्यादेश निघाला असून, त्याची प्रत महानगरपालिकेच्या प्रशासनास प्राप्त झाली. पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण करावयाची आहेत. गेली अनेक वर्षे राज्यकर्त्यांची आश्वासने, अधिकाऱ्यांच्या तांत्रिक त्रुटी आणि समाजातून येणाऱ्या सूचना यांच्या अनिष्ट फेऱ्यांत अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आराखडा अडकला होता. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारच्या काळात १० कोटींचा निधी मंजूर होऊनही तो खर्च झाला नाही. कामेच न झाल्याने निधी परत गेला होता. त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत, अनेक टप्पे ओलांडत या आराखड्यास उच्चाधिकार समितीची अंतिम मंजुरी मिळाली. बदललेले नियोजन आणि कामांनुसार हा आराखडा ६८ कोटी ७० लाख रुपये खर्चाचा आहे. मुंबईत मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या उपस्थितीत दि. ९ जूनला झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजुरी दिली गेली. त्या संदर्भातील इतिवृत्त आणि मंजुरीचा सरकारी अध्यादेश दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या प्रशासनास प्राप्त झाला. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. अंतिम सादरीकरण ही केवळ औपचारिकता आहे. मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने आराखड्यास अंतिम मंजुरी दिल्यामुळे आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. हा ६८.७० कोटी रुपयांचा आराखडा पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तयार केला गेला आहे. पुढील दोन वर्षांत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यांतील कामे केली जाणार आहेत. अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे तसेच त्याचा सरकारी अध्यादेश निघाल्यामुळे आता मंदिर परिसराच्या विकासकामांना गती मिळणार आहे.