शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
4
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
5
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
6
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
7
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
9
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
10
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
11
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
12
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
13
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
14
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
15
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
16
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
17
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
18
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
19
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
20
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड

अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. ज्यांच्या सेवेला ३ वर्षे व ६ वर्षांचा कालावधी ...

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. ज्यांच्या सेवेला ३ वर्षे व ६ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, ते सध्या बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या पदानुसार व कार्यकालानुसार सदर तीन वर्षांनी बदली होत असते. दरवर्षी एप्रिल व मेमध्ये या सर्वसाधारण बदल्या होत असतात. मात्र, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने बदलीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. बदलीसाठी ३१ जुलै २०२० पर्यंत दिलेली मुदत ऑगस्टपर्यंत वाढली. त्यानंतर आता नवीन वर्ष सुरू होऊन सहा महिने झाले तरी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. शासनाने ३० जूनपर्यंत या बदल्या करण्याचे जाहीर केले होते; मात्र अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता एकाच पद्धतीचे काम करून कर्मचारी कंटाळले आहेत. दुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेषत: महिलांनाही जेथे गैरसोयींची सामना लागत आहेत. त्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आता बदलीचे वेध लागले आहेत.

--

प्रवास, सोयीचा विचार व्हावा

बदली करताना कार्यालयात जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, याचा विचार केला जावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोन टोकाचे तालुके असले तरी प्रवास खर्च, येण्या-जाण्याचा वेळ, दुर्गम भाग असेल तर तिथे जाता-येतानाच्या अडचणी, कौटुंबिक स्थिती असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे सगळंच गैरसोयीचं ठरत असेल तर कार्यक्षमतादेखील कमी होते. त्यामुळे राहत असलेल्या तालुक्यापासून जवळच्या तालुक्यात बदली व्हावी, असे कर्मचाऱ्यांचे मत आहे.