शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

स्थूलपणाचा भारतीयांना धोका

By admin | Updated: January 9, 2017 01:01 IST

‘सीपीआर’मध्ये जनजागृती कार्यशाळा : लठ्ठपणात जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक

कोल्हापूर : स्थूलपणा व त्याचा शरीरावर होणाऱ्या गंभीर परिणामांमुळे जागतिक समस्या निर्माण झाली आहे. स्थूलपणामध्ये भारत सध्या जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आजारावर प्रत्येकाने जर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तसे न झाल्यास तिसऱ्या क्रमांकावरून भारत पहिल्या क्रमांकावर जाण्यास फार उशीर लागणार नाही, असा चिंतेचा सूर स्थूलता जनजागृती कार्यशाळा उमटला.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे रविवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) आॅडिटोरियम सभागृहात ही जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. टी. बोरसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी रामानंद यांनी, स्थूलपणाचे वाढते प्रमाण किती आणि कशा प्रकारे त्रासदायक आहे, याविषयी मार्गदर्शन केले.स्थूलपणाचे प्रमाण मागील दोन दशकांमध्ये फक्त मोठ्या वयोगटात दिसत होते; परंतु सध्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध गटापर्यंत तसेच समाजातील सर्व प्रकारच्या गटांमध्ये स्थूलपणाचा आजार दिसून येतो. स्थूलपणा फक्त शरीरातील चरबीच्या प्रमाणाशी निगडित असून त्याच्यामुळे शरीरात वेगवेगळ्या अवयवांचे गुंतागुंतीचे आजार होत असतात.(उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, लकवा, इत्यादी), आदी मते विविध डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केली.डॉ. मोहन राऊत यांनी, जगामध्ये व भारतामध्ये असलेल्या प्रमाणाविषयी; तर डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी, स्थूलपणामुळे विविध अवयवांवर होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी, लहान मुलांमध्ये होणाऱ्या स्थूलपणाविषयी सांगितले.दुपारच्या सत्रात डॉ. मारुती पवार यांनी स्थूल व्यक्तींवर करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांवेळी तसेच भूल देताना घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. ए. एम. झेंडे, डॉ. अनिता परितेकर, डॉ. एम. व्ही. बनसोडे, डॉ. रश्मी पाटील, डॉ. राहुल बडे, डॉ. मानसिंग आडनाईक, आदींनी मार्गदर्शन केले. डॉ. सागर पाटील व डॉ. रेणू भरणे यांनी सूत्रसंचालन; तर डॉ. ए. के. वाईकर यांनी स्वागत केले. कार्यशाळेला डॉ. व्ही. ए. देशमुख, डॉ. सरवदे, डॉ. कारंडे, डॉ. सुदेश गंधम यांच्यासह ३५० हून अधिक डॉक्टर उपस्थित होते. डॉ. जी. व्ही. पाटील यांनी आभार मानले.लठ्ठपणाला सध्याची जीवनशैली, तणावयुक्त जीवनमान, व्यायामाचा अभाव व सदोष आहार जबाबदार. फक्त पोटाचा घेर वाढणे हेच स्थूलपणाचे लक्षण नसून वेगवेगळ्या अवयवांमध्ये होणाऱ्या गुंतागुंतीमुळे रुग्णाला विविध प्रकारचा त्रास होतो.सांध्याचा व हाडांचा त्रास स्थूल व्यक्तींत जास्त दिसून येतो व वजन घटविल्यास तो कमी होऊ शकतो.