शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

पावसाळ्यात कोसळणाऱ्या झाडांचे प्रमाण चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

अमर पाटील : कळंबा गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष ...

अमर पाटील : कळंबा

गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही अथवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही. गतवर्षीही अंबाई तलावानजीक भर नागरी वस्तीत चार, साळोखेनगरात नागरी वस्तीत रिक्षावर, तर कळंबा-गारगोटी मार्गावर दोन महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते.

बऱ्याचदा ही झाडे विजेच्या खांबांवर व तारांवर कोसळल्याने अघटित घटना घडण्याची शक्यता आहे.

धोकादायक वृक्षांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असूनही बऱ्याचदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ही बाब नागरिकांच्या जिवावर बेतल्यावर प्रशासन जागे होणार काय? असा संतप्त सवाल आज होत आहे.

उपनगरांसह ग्रामीण भागात झाडांच्या मुळावर बांधकाम केले जाते. बऱ्याचदा झाडांच्या मुळावर पेव्हिंग ब्लॉक बसवले जातात. झाडालगत केबल टाकणे, रस्ते, गटारी, पदपथ विकसित करण्यासाठी खुदाई केली जाते. एकदा खुदाई केली की, पुन्हा पोकळ माती भरली जाते ज्यामुळे पावसाळ्यात पोकळी निर्माण होते. पावसाळ्यात मुळात पाणी असल्याने हवा जात नाही, परिणामी मुळे कुजून झाडे उन्मळून पडतात.

बऱ्याचदा पावसाळीपूर्व कामे करताना, शास्त्रोक्त पद्धतीने फांद्या न तोडता घाईगडबडीत कशाही फांद्या तोडल्या जातात, ज्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य शासनाच्या २००९ च्या नियमांन्वये वृक्ष प्राधिकरण समिती नेमत सार्वजनिक वनीकरण स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून धोकादायक वृक्षांची छाटणी अपेक्षित असते. किमान यंदा तरी हे काम परिणामकारक व्हावे, ही मागणी जोर धरत आहे.

धोकादायक झाडांसाठी शासकीय नियमावली

२००९ च्या नियमांन्वये व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक व रस्ता रुंदीकरण करताना अडथळे ठरणारे वृक्ष काढण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. ज्यात संबंधित प्रशासनाने सर्वेक्षण करत एक झाड तोडल्यास पाच झाडे लावून संवर्धन करणे बंधनकारक आहे. धोकादायक झाडाखाली उभे राहू नये, यासाठी नोटीस व धोकादायक चिन्हे लावणे बंधनकारक आहे.