शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाळ्यात कोसळणाऱ्या झाडांचे प्रमाण चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

अमर पाटील : कळंबा गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष ...

अमर पाटील : कळंबा

गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही अथवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही. गतवर्षीही अंबाई तलावानजीक भर नागरी वस्तीत चार, साळोखेनगरात नागरी वस्तीत रिक्षावर, तर कळंबा-गारगोटी मार्गावर दोन महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते.

बऱ्याचदा ही झाडे विजेच्या खांबांवर व तारांवर कोसळल्याने अघटित घटना घडण्याची शक्यता आहे.

धोकादायक वृक्षांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असूनही बऱ्याचदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ही बाब नागरिकांच्या जिवावर बेतल्यावर प्रशासन जागे होणार काय? असा संतप्त सवाल आज होत आहे.

उपनगरांसह ग्रामीण भागात झाडांच्या मुळावर बांधकाम केले जाते. बऱ्याचदा झाडांच्या मुळावर पेव्हिंग ब्लॉक बसवले जातात. झाडालगत केबल टाकणे, रस्ते, गटारी, पदपथ विकसित करण्यासाठी खुदाई केली जाते. एकदा खुदाई केली की, पुन्हा पोकळ माती भरली जाते ज्यामुळे पावसाळ्यात पोकळी निर्माण होते. पावसाळ्यात मुळात पाणी असल्याने हवा जात नाही, परिणामी मुळे कुजून झाडे उन्मळून पडतात.

बऱ्याचदा पावसाळीपूर्व कामे करताना, शास्त्रोक्त पद्धतीने फांद्या न तोडता घाईगडबडीत कशाही फांद्या तोडल्या जातात, ज्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य शासनाच्या २००९ च्या नियमांन्वये वृक्ष प्राधिकरण समिती नेमत सार्वजनिक वनीकरण स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून धोकादायक वृक्षांची छाटणी अपेक्षित असते. किमान यंदा तरी हे काम परिणामकारक व्हावे, ही मागणी जोर धरत आहे.

धोकादायक झाडांसाठी शासकीय नियमावली

२००९ च्या नियमांन्वये व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक व रस्ता रुंदीकरण करताना अडथळे ठरणारे वृक्ष काढण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. ज्यात संबंधित प्रशासनाने सर्वेक्षण करत एक झाड तोडल्यास पाच झाडे लावून संवर्धन करणे बंधनकारक आहे. धोकादायक झाडाखाली उभे राहू नये, यासाठी नोटीस व धोकादायक चिन्हे लावणे बंधनकारक आहे.