शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात कोसळणाऱ्या झाडांचे प्रमाण चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

अमर पाटील : कळंबा गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष ...

अमर पाटील : कळंबा

गत आठवड्यात झालेल्या वादळी मुसळधार पावसात रंकाळा तलाव, संभाजीनगर, रंकाळा खणविहार परिसर येथे महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही अथवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही. गतवर्षीही अंबाई तलावानजीक भर नागरी वस्तीत चार, साळोखेनगरात नागरी वस्तीत रिक्षावर, तर कळंबा-गारगोटी मार्गावर दोन महाकाय वृक्ष उन्मळून पडले होते.

बऱ्याचदा ही झाडे विजेच्या खांबांवर व तारांवर कोसळल्याने अघटित घटना घडण्याची शक्यता आहे.

धोकादायक वृक्षांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असूनही बऱ्याचदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ही बाब नागरिकांच्या जिवावर बेतल्यावर प्रशासन जागे होणार काय? असा संतप्त सवाल आज होत आहे.

उपनगरांसह ग्रामीण भागात झाडांच्या मुळावर बांधकाम केले जाते. बऱ्याचदा झाडांच्या मुळावर पेव्हिंग ब्लॉक बसवले जातात. झाडालगत केबल टाकणे, रस्ते, गटारी, पदपथ विकसित करण्यासाठी खुदाई केली जाते. एकदा खुदाई केली की, पुन्हा पोकळ माती भरली जाते ज्यामुळे पावसाळ्यात पोकळी निर्माण होते. पावसाळ्यात मुळात पाणी असल्याने हवा जात नाही, परिणामी मुळे कुजून झाडे उन्मळून पडतात.

बऱ्याचदा पावसाळीपूर्व कामे करताना, शास्त्रोक्त पद्धतीने फांद्या न तोडता घाईगडबडीत कशाही फांद्या तोडल्या जातात, ज्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य शासनाच्या २००९ च्या नियमांन्वये वृक्ष प्राधिकरण समिती नेमत सार्वजनिक वनीकरण स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून धोकादायक वृक्षांची छाटणी अपेक्षित असते. किमान यंदा तरी हे काम परिणामकारक व्हावे, ही मागणी जोर धरत आहे.

धोकादायक झाडांसाठी शासकीय नियमावली

२००९ च्या नियमांन्वये व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक व रस्ता रुंदीकरण करताना अडथळे ठरणारे वृक्ष काढण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. ज्यात संबंधित प्रशासनाने सर्वेक्षण करत एक झाड तोडल्यास पाच झाडे लावून संवर्धन करणे बंधनकारक आहे. धोकादायक झाडाखाली उभे राहू नये, यासाठी नोटीस व धोकादायक चिन्हे लावणे बंधनकारक आहे.