शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’ रुग्णालयांची संख्या वाढणार

By admin | Updated: July 27, 2016 00:34 IST

राजीव गांधी आरोग्य योजना : लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ : दीडशेहून अधिक रुग्णालयांचे अर्ज

गणेश शिंदे --कोल्हापूर --राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत लाभार्थ्यांची (रुग्ण) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या योजनेत समाविष्ट होण्यासाठी जिल्ह्यातील दीडशेहून अधिक रुग्णालयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी ३४ रुग्णालयांची प्रक्रिया आजअखेर पूर्ण झाली असून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीकडून सात रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या ३० वरून आणखी वाढणार आहे. रुग्णालयांची संख्या वाढल्याने ठरावीक रुग्णालयांची मक्तेदारी मोडण्यास मदत होणार आहे. राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने प्रथम जुलै २०१२ मध्ये आठ जिल्ह्यांत तर २० नोव्हेंबर २०१३ ला उर्वरित जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास अडीच वर्षांत लाभार्थ्यांची संख्या कमालीची वाढली असून राज्यात पहिल्या तीनमध्ये जिल्ह्याची कामगिरी आहे. यापूर्वी ३२ रुग्णालये या योजनेत समाविष्ट होती. दोन महिन्यांपूर्वी या योजनेतील करार, अटी व शर्र्थींचा भंग केल्याप्रकरणी दोन रुग्णालयांना ‘बाहेरचा रस्ता’ दाखविण्यात आला. त्यामुळे ती ३० झाली आहे पण, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील दीडशेहून अधिक रुग्णालयांनी योजनेत समाविष्ट होण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यासाठी त्या रुग्णालयाचे दिल्लीतील नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड आॅफ हॉस्पिटल (एनएबीएच) मानांकन असणे गरजेचे आहे. त्यापैकी ३४ रुग्णालयांची प्रक्रिया पूर्ण झाली असून सात रुग्णालयांची तपासणी केली आहे. रुग्णालयांची संख्या वाढल्याने साहजिकच त्याचा फायदा रुग्णांना होणार असल्याने या योजनेत काही ठरावीक रुग्णालयांची असणारी मक्तेदारी मोडण्यास मदत होणार आहे. ‘अशी राहते प्रक्रिया...राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व एम. डी. इंडियाचे प्रमुख स्वत: रुग्णालयांत जाऊन तपासणी करतात. रुग्णांना ज्या मूलभूत सेवा व सुविधा आहेत. त्या रुग्णालयात प्राप्त आहेत का ? याची खातरजमा करतात. ही समिती याचा अहवाल योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय सचिव, एम. डी. इंडियाचे अधिकारी व नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एनआयसी)चे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सादर करतात. जिल्हालाभार्थी रुग्ण खर्च १) अहमदनगर१८ हजार ११९५३ कोटी १४ लाख ३९ हजार १७२ रुपये२) औरंगाबाद२१ हजार ४९०५३ कोटी तीन लाख ५९ हजार ४५० रुपये३) कोल्हापूर१७ हजार २०२४८ कोटी ७३ लाख २६ हजार ९५ रुपये४) मुंबई व उपनगर१५ हजार ३३४७ कोटी ६५ लाख ३५ हजार १६० रुपये ५) नाशिक१८ हजार ३७३४६ कोटी ७७ लाख ५७ हजार ८४२ रुपयेया योजनेत सुमारे ११०० आजारांवर मोफत उपचार मिळत असल्याने ही योजना सामान्य माणसाला आधार वाटत आहे. लाभार्थ्यांची संख्या पाहता नवीन रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. -डॉ.अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.