शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएसएस’चा आरोग्याचा जागर

By admin | Updated: July 19, 2016 00:50 IST

शहरात उद्यापासून जनजागृती : पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रवीण देसाई-- कोल्हापूर --पावसाळ्यात विशेषत: पुरानंतर डेंग्यू, मलेरिया, डायरिया साथीचे आजार पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्याचा जागर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांच्या मार्फत कोल्हापूर शहरात घराघरांत जाऊन प्रबोधन केले जाणार आहे. उद्या, बुधवार ते शुक्रवार या कालावधीत ही मोहीम सुरूराहणार आहे.यंदा झालेल्या पावसाने पुराचे संकट ओढवले होते. हे पुराचे पाणी ओसरत चालले आहे; परंतु हे पाणी ओसरत असतानाच त्या परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन प्रसंगी साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील नागरिकांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्यासाठी मोहीम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांकडून हे प्रबोधन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार उद्या, बुधवारपासून शहरात ही मोहीम राबविली जाणार आहे. ‘कीटकजन्य व जलजन्य रोगनियंत्रण जनजागरण’ असे या मोहिमेचे नाव आहे.शहरातील सर्व महाविद्यालयांच्या ‘एनएसएस’चे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसोबत ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी, महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी, मुकादम असणार आहेत.सकाळी ९ ते ११ या वेळेत सुरू राहणाऱ्या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान ५० घरांत जाऊन शहरवासीयांचे आरोग्यविषयक प्रबोधन करायचे आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डांत हे विद्यार्थी जाणार आहेत. प्रत्येक कॉलेजवर वॉर्डांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणेकडून ही मोहीम कशी राबवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महापालिकेचे अधिकारी, सर्व महाविद्यालयांतील ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी ही मोहीम राबविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरनंतर ही मोहीम इचलकरंजी येथेही राबविण्यात येणार आहे. असा होणार जागरपावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, डायरिया असे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या आजारांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत हे विद्यार्थी घराघरांत जाऊन प्रबोधनपर माहितीपत्रक वाटणार आहेत. त्याचबरोबर घरात कोणी आजारी आहे का, याची माहितीही ते घेणार आहेत. पावसाळ्यात उघड्यावरील भांड्यात तसेच टायरमध्ये पाणी साठले आहे का ? याची पाहणीही ते करतील. टायर किंवा अशा भांड्यांमध्येच साथीचे आजार पसरविणाऱ्या डासांची निर्मिती होते. शहरवासीयांना हे विद्यार्थी पटवून देतील. दरम्यान, ठिकठिकाणी हे विद्यार्थी आरोग्य प्रबोधनपर पथनाट्यही सादर करणार आहेत.