शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

‘एनएसएस’चा आरोग्याचा जागर

By admin | Updated: July 19, 2016 00:50 IST

शहरात उद्यापासून जनजागृती : पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रवीण देसाई-- कोल्हापूर --पावसाळ्यात विशेषत: पुरानंतर डेंग्यू, मलेरिया, डायरिया साथीचे आजार पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्याचा जागर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांच्या मार्फत कोल्हापूर शहरात घराघरांत जाऊन प्रबोधन केले जाणार आहे. उद्या, बुधवार ते शुक्रवार या कालावधीत ही मोहीम सुरूराहणार आहे.यंदा झालेल्या पावसाने पुराचे संकट ओढवले होते. हे पुराचे पाणी ओसरत चालले आहे; परंतु हे पाणी ओसरत असतानाच त्या परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन प्रसंगी साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील नागरिकांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्यासाठी मोहीम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांकडून हे प्रबोधन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार उद्या, बुधवारपासून शहरात ही मोहीम राबविली जाणार आहे. ‘कीटकजन्य व जलजन्य रोगनियंत्रण जनजागरण’ असे या मोहिमेचे नाव आहे.शहरातील सर्व महाविद्यालयांच्या ‘एनएसएस’चे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसोबत ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी, महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी, मुकादम असणार आहेत.सकाळी ९ ते ११ या वेळेत सुरू राहणाऱ्या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान ५० घरांत जाऊन शहरवासीयांचे आरोग्यविषयक प्रबोधन करायचे आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डांत हे विद्यार्थी जाणार आहेत. प्रत्येक कॉलेजवर वॉर्डांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणेकडून ही मोहीम कशी राबवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महापालिकेचे अधिकारी, सर्व महाविद्यालयांतील ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी ही मोहीम राबविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरनंतर ही मोहीम इचलकरंजी येथेही राबविण्यात येणार आहे. असा होणार जागरपावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, डायरिया असे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या आजारांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत हे विद्यार्थी घराघरांत जाऊन प्रबोधनपर माहितीपत्रक वाटणार आहेत. त्याचबरोबर घरात कोणी आजारी आहे का, याची माहितीही ते घेणार आहेत. पावसाळ्यात उघड्यावरील भांड्यात तसेच टायरमध्ये पाणी साठले आहे का ? याची पाहणीही ते करतील. टायर किंवा अशा भांड्यांमध्येच साथीचे आजार पसरविणाऱ्या डासांची निर्मिती होते. शहरवासीयांना हे विद्यार्थी पटवून देतील. दरम्यान, ठिकठिकाणी हे विद्यार्थी आरोग्य प्रबोधनपर पथनाट्यही सादर करणार आहेत.