शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

‘एनएसएस’चा आरोग्याचा जागर

By admin | Updated: July 19, 2016 00:50 IST

शहरात उद्यापासून जनजागृती : पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रवीण देसाई-- कोल्हापूर --पावसाळ्यात विशेषत: पुरानंतर डेंग्यू, मलेरिया, डायरिया साथीचे आजार पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्याचा जागर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांच्या मार्फत कोल्हापूर शहरात घराघरांत जाऊन प्रबोधन केले जाणार आहे. उद्या, बुधवार ते शुक्रवार या कालावधीत ही मोहीम सुरूराहणार आहे.यंदा झालेल्या पावसाने पुराचे संकट ओढवले होते. हे पुराचे पाणी ओसरत चालले आहे; परंतु हे पाणी ओसरत असतानाच त्या परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन प्रसंगी साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील नागरिकांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्यासाठी मोहीम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांकडून हे प्रबोधन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार उद्या, बुधवारपासून शहरात ही मोहीम राबविली जाणार आहे. ‘कीटकजन्य व जलजन्य रोगनियंत्रण जनजागरण’ असे या मोहिमेचे नाव आहे.शहरातील सर्व महाविद्यालयांच्या ‘एनएसएस’चे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसोबत ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी, महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी, मुकादम असणार आहेत.सकाळी ९ ते ११ या वेळेत सुरू राहणाऱ्या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान ५० घरांत जाऊन शहरवासीयांचे आरोग्यविषयक प्रबोधन करायचे आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डांत हे विद्यार्थी जाणार आहेत. प्रत्येक कॉलेजवर वॉर्डांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणेकडून ही मोहीम कशी राबवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महापालिकेचे अधिकारी, सर्व महाविद्यालयांतील ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी ही मोहीम राबविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरनंतर ही मोहीम इचलकरंजी येथेही राबविण्यात येणार आहे. असा होणार जागरपावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, डायरिया असे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या आजारांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत हे विद्यार्थी घराघरांत जाऊन प्रबोधनपर माहितीपत्रक वाटणार आहेत. त्याचबरोबर घरात कोणी आजारी आहे का, याची माहितीही ते घेणार आहेत. पावसाळ्यात उघड्यावरील भांड्यात तसेच टायरमध्ये पाणी साठले आहे का ? याची पाहणीही ते करतील. टायर किंवा अशा भांड्यांमध्येच साथीचे आजार पसरविणाऱ्या डासांची निर्मिती होते. शहरवासीयांना हे विद्यार्थी पटवून देतील. दरम्यान, ठिकठिकाणी हे विद्यार्थी आरोग्य प्रबोधनपर पथनाट्यही सादर करणार आहेत.