शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

आता साधे पेट्रोल शंभरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:31 IST

कोल्हापूर : कराचा बोजा कोणाची जबाबदारी म्हणत राज्य व केंद्राने ‘तू तू-मैं मैं’चा खेळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ...

कोल्हापूर : कराचा बोजा कोणाची जबाबदारी म्हणत राज्य व केंद्राने ‘तू तू-मैं मैं’चा खेळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुरुवारी किंवा शुक्रवारी साधे पेट्रोल शंभरीपार होईल. प्रिमियम पेट्रोलने तर केव्हाच शंभरी पार केली आहे. त्यामुळे वाहनधारकांचा कल सीएनजी अथवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचीही शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

चार फेब्रुवारीला पेट्रोलचा भाव ९३ रुपये ११ पैसे होता. डिझेलचा भाव ८२.३८ पैसे होता. बुधवारी हेच दर अनुक्रमे ९७ रुपये २१ पैसे व ८७ रुपये ०३ पैसे इतके होते. वीस दिवसांमध्ये पेट्रोल ४ रुपये १० पैशांनी, तर डिझेल ४ रुपये ६५ पैशांनी वाढले आहे. विशेष म्हणजे प्रिमियम पेट्रोल राज्यातील काही शहरांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुपये लिटर झाले आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्यात झाला आहे.

प्रतिदिन ५ लाख लिटर पेट्रोल ..६ लाख लिटर डिझेल..

भाव वाढूनही जिल्ह्याला दिवसाकाठी पेट्रोल ५ लाख ३० हजार लिटर, तर डिझेल ६ लाख २० हजार लिटर इतके लागत आहे. तितका साठा डेपोंमधून रोज उचलला जात आहे. सामान्य माणूस कितीही संतप्त झाला असला तरी इंधनाची गरज त्याला लागतेच.

सीएनजीसह इलेक्ट्रिक पर्यायाकडे धाव

रिक्षा, चारचाकीमध्ये सीएनजी गॅसचा वापर बहुतांशी ठिकाणी वाढला आहे. हा गॅस प्रतिकिलो ६५ रुपये मिळत आहे. यावर त्या वाहनास दुप्पट मायलेज मिळत आहे. कराचा बोजा कमी केला तर हाच गॅस ५० रुपये प्रतिकिलो मिळेल. काही कंपन्यांच्या दुचाकीही आता सीएनजीवर चालणाऱ्या येऊ लागल्या आहेत, तर इलेक्ट्रिक चारचाकी, दुचाकी बाजारातील विक्रीचा टक्काही वाढू लागला आहे. या पर्यायांकडेही लोकांचा ओढा वाढला आहे. त्याची चौकशीही सातत्याने लोक करीत आहेत.

कोट

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ नसल्याने कराचा बोजा पेट्रोल आणि डिझेलवर वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वाहनधारकांवर होत आहे. इंधन ही बाब चैनीची न होता गरजेची बाब बनली आहे.

- गजकुमार माणगावे,

अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल असोसिएशन.