शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

शेतीसाठी आतापासूनच उपसा

By admin | Updated: September 5, 2015 00:10 IST

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट : गतवर्षीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात दुष्काळाची छाया गडद होत असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातही दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणांतून एप्रिल, मे महिन्यांपर्यंत पुरेल एवढे पाणीसाठे उपलब्ध असले तरी सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा आतापासूनच करावा लागत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर मात्र ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची दाट शक्यता असून, जलसंपदा विभाग आतापासूनच नियोजनात व्यस्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये थोडा पाऊस झाला. त्यातून राधानगरी, कडवी, कोदे, घटप्रभा, कासारी ही पाच धरणे १०० टक्के भरली आहेत; तर अन्य महत्त्वाची धरणे ७५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे राधानगरी धरण पूर्ण भरले असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. आजची परिस्थिती पाहता जिल्ह्यात पाण्याची कमतरता नसली तरी आणखी चार-पाच महिन्यांनी मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा अंदाज आहे. त्याला कारण पावसाने दिलेली ओढ हे ठरू शकते. यंदा कोल्हापूरकरांना पावसाळा जाणवलाच नाही, असा पाऊस झाला. गेल्या वर्षी १ सप्टेंबरला १७७२.३९ मिलिमीटर पाऊस झाला होता, तो यावर्षी याच तारखेला १०९५.२१ मिलिमीटर इतका नोंदला गेला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी पडला आहे. पावसाची ओढ कायम राहिली तर मात्र कोल्हापूरची सुद्धा काही खैर नाही. सर्वसाधारण कोल्हापूर जिल्ह्यात १५ आॅक्टोबरनंतर नदीतील पाण्याचा उपसा करण्याची गरज शेतकऱ्यांना भासते. परंतु, यंदा पाऊस कमी झाल्याने दीड महिना आधीच पाणी उपसा करावा लागत आहे. सर्वच नद्यांवर मोटारी सुरू झाल्या आहेत. यावेळी नदीतून लवकर उपसा सुरू झाल्यामुळे पाण्याचा साठा जलदगतीने कमी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात एक-दोनवेळा मोठा पाऊस होण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी सध्या तरी काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगतात. परंतु, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्येही पाऊस झाला नाही, तर भविष्यातील धोका ओळखून नियोजन करावे लागणार आहे.सर्व नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बरगे दरवर्षी पावसाळ्यात काढले जातात. यंदाही ते काढले आहेत, परंतु पाऊस कमी झाल्याने बरगे पूर्ववत बसविले जाणार आहेत. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने आतापासूनच शेतीसाठी नदीतून उपसा सुरू आहे.- बी. एस. घुणकीकर, उपविभागीय अधिकारी दूधगंगा पाटबंधारे उपविभाग