शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आता डिजिटल फलक प्रिंटिंग करणाऱ्यावरच थेट गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST

कोल्हापूर : ज्या डिजिटल फलकांना महापालिका, पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशा फलकांचेच प्रिंटिंग संबंधित प्रिंटिंग व्यावसायिकांना करावे लागणार ...

कोल्हापूर : ज्या डिजिटल फलकांना महापालिका, पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशा फलकांचेच प्रिंटिंग संबंधित प्रिंटिंग व्यावसायिकांना करावे लागणार आहे. परवानगी न घेता फलकाचे प्रिंटिंग केल्यास संबंधित प्रिंटिंग व्यावसायिकांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे. शहरात विनापरवाना फलक लावून शहराचे विद्रुपीकरण होत असल्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेतला आहे. यामुळे विनापरवाना डिजिटल फलक, शुभेच्छा फलक, स्वागत फलक लावणाऱ्यांना चपराक बसणार आहे.

तात्पुरत्या स्वरुपातील जाहिरात फलक, शुभेच्छा फलक तसेच श्रध्दांजली फलक ज्या क्षेत्रामध्ये लावणार आहे, त्या क्षेत्रातील विभागीय कार्यालय यांच्याकडून रितसर परवानगी घेऊन जाहिरात फलक लावावे लागणार आहेत. विनापरवाना, अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यावर महाराष्ट्र मालमत्तेो विद्रुपीकरण अधिनियमाअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

प्रतिक्रिया

फलक लावणाऱ्यांनी प्रथम वाहतूक नियंत्रण शाखा आणि फलक लावणाऱ्या परिसरातील पोलीस ठाण्याची एनओसी घ्यावी लागणार आहे. ही एनओसी दाखवून महापालिकेतील इस्टेट विभागातून रितरस फी भरुन फलक लावण्याची परवानगी घ्यावी लागेल. ही सर्व कागदपत्रे तपासून प्रिंटिंग व्यावसायिकांनी फलकाचे प्रिंटिंग करायचे आहे. परवानगीशिवाय प्रिंटिंग केल्यास सबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

पंडित पोवार, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख महापालिका

प्रिंटिंग मशीन जप्त

फलकावर कोणता मजकूर, छायाचित्र असणार, याची तपासणी पोलीस प्रशासन करणार आहे. यानंतरच एनओसी दिली जाणार आहे. पोलीस प्रशासनाची एनओसी आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय फलक लावला असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित फलकाचे डिझाईन करणारा, प्रिंटिंग करणारा आणि फलक लावणारा यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. केवळ गुन्हा दाखल होऊन हे थांबणार नसून, संबधितांचे प्रिटिंग मशीनच जप्त केले जाणार आहे.

चौक़ट

इच्छुकांना दणका

महापालिका निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक असून, त्यांनी प्रभागात फलक लावणे सुरू केले आहे. येथून पुढेही असे फलक वाढण्याची शक्यता आहे. आता विनापरवाना फलकाचे प्रिंटिंग करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्यामुळे इच्छुकांनाही परवानगी घेऊनच फलक लावावे लागणार आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार असून, शहर विद्रुपीकरण करणारेही वटणीवर येणार आहेत.