शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता सरकार सर्वांना ‘आनंदी’ ठेवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:11 IST

समीर देशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोकºया मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासदीमुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता या सर्व समाजघटकांना सदोदित ‘आनंदी’ ठेवण्याचा निर्णयराज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी लवकरच नवे मंत्रालय सुरू होत असून साहजिकच याची ...

समीर देशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोकºया मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासदीमुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता या सर्व समाजघटकांना सदोदित ‘आनंदी’ ठेवण्याचा निर्णयराज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी लवकरच नवे मंत्रालय सुरू होत असून साहजिकच याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.जगभरामध्ये ‘आनंदाचा निर्देशांक’ ही संकल्पना आता महत्त्वाची मानली जात आहे. एखाद्या देशातील, राज्यातील नागरिक किती आनंदी आहेत यावर हा निर्देशांक काढला जातो. गतवर्षीच्या जागतिक अहवालामध्ये नॉर्वे हा देश यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून भारत १२२ व्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशमध्ये अशाप्रकारे नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी म्हणून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले असून याच धर्तीवर महाराष्ट्रातही असे मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, कनिष्ठ मध्यमवर्गीय हे आपल्या रोजच्या जगण्याच्या संघर्षातच अडकून पडतात. हातावरचे पोट असणाºयांची तर आणखी बिकट परिस्थिती असते.एका ठरावीक वर्तुळाच्या बाहेरचे जग त्यांच्यासाठी अप्रूप असते. पर्यटनस्थळांची सहल, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहणे, एखाद्या मोठ्या संगीतविषयक कार्यक्रमाला जाणेही त्यांच्यासाठी अशक्यप्राय असते. अशांना आनंद देण्यासाठी शासन काय करू शकेल याबाबत हे मंत्रालय काम करणार असून त्याद्वारे निर्णय होऊन तशा उपक्रमांचे आयोजन शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.सध्या याबाबतचे कच्चे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्याला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर अशा पद्धतीने नवीन मंत्रालयाची स्थापना, त्याच्यासाठी निधी, आवश्यक अधिकारी, कर्मचारी वर्ग ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. मात्र, यावर्षी हे नवीन मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे.कोल्हापुरात काम सुरूअशा पद्धतीचे काम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्'ात सुरूही केले आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांत पोलीस उद्यानाचे, शहरातील सर्व दुभाजकांचे सुशोभीकरण, नवरात्रानिमित्त नवउर्जा महोत्सव, भव्य फ्लॉवर फेस्टिव्हल, पाच दिवसांचा कलामहोत्सव आयोजित केला होता. गेल्याच पंधरवड्यात त्यांनी धनगरवाड्यावरील १५० पेक्षा अधिक मुलांना कोल्हापूर दाखवण्यासाठी आणले होते. आता एप्रिलमध्ये माहिती नसलेले कोल्हापूर दाखवण्यासाठी मोफत सहलींचेही आयोजन करण्यात येणार आहे. हेच प्रारूप नंतर महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.

जगण्याच्या संघर्षामध्ये अनेक छोटे-मोठे आनंद घेण्यापासून नागरिक हिरावले जातात. तोच आनंद त्यांना मिळवून देण्यासाठी या विषयासाठी वाहिलेले नवीन मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसनअंतर्गतच ते राहणार असल्याने त्याचा कार्यभारही माझ्याकडे असेल. सामान्याला आनंद देणाºया अनेक बाबी आम्ही या माध्यमातून करू.- चंद्रकांत पाटील,महसूल, मदत पुनर्वसन मंत्री