शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आता प्रत्येक घर ‘एलईडी’ बल्बने उजळणार

By admin | Updated: January 22, 2016 01:03 IST

कोल्हापूर-सांगलीत मोहीम : साधे बल्ब इतिहासजमा होणार; फेब्रुवारीअखेर ४७ लाख बल्बचे उद्दिष्ट

विश्वास पाटील -- कोल्हापूर कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांच्या घरी साध्या व ‘सीएफएल’ऐवजी ‘एलईडी’ बल्ब बसविण्याची मोहीम येत्या चार दिवसांत सुरू होत असल्याची माहिती ‘महावितरण’ कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. कोल्हापूर व सांगलीत मिळून एकूण ११ लाख ८० हजार ७३२ घरगुती वीजग्राहक असून त्यांना फेब्रुवारीअखेरपर्यंत ४७ लाख २३ हजार इतक्या बल्बचे वाटप केले जाणार आहे.केंद्र शासनाच्या ‘एक्झिक्युटिव्ह इफिन्शिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ (इइएसएल) या कंपनीकडून हे काम मुख्यत: होणार असून महावितरण कंपनीकडून त्यांना स्थानिक साहाय्य केले जाणार आहे.केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने वीजबचतीसाठी एलईडी बल्ब बसविण्याचा कार्यक्रम देशभर हाती घेतला आहे. ही पर्यावरणपूरक वीजबचत योजना आहे. त्यासाठी ग्राहकावर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. एका ग्राहकास सरासरी चार बल्ब देण्यात येतील. या बल्बसाठी कंपनीकडून तीन वर्षांची गॅरंटी असेल. पहिल्या टप्प्यात नागपूर अर्बन, भांडुप आणि कल्याण; दुसऱ्या टप्प्यात नागपूर ग्रामीण, औरंगाबाद, अमरावती येथे ही मोहीम यशस्वीपणे राबविली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह पुणे, नाशिक, बारामती, कोकण, लातूर, नांदेड व जळगाव परिमंडळामध्ये ती सुरू होत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत हे बल्ब बसविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.बल्ब घेण्यासाठी ग्राहकांनी काय करायचे...चालू वीज बिलाची झेरॉक्स आणि पॅन कार्ड, वाहन परवाना असे कोणतेही छायाचित्र असलेले ओळखपत्र आवश्यक. विविध कंपन्यांच्या एलईडी बल्बची किंमत सरासरी ३०० रुपये आहे; परंतु केंद्र शासनाचे साहाय्य असल्याने हा बल्ब १०० रुपयांत दिला जाणार आहे. ज्यांना ही रक्कम एकदम भरून घेऊन बल्ब बसविणे शक्य नाही, त्यांना दरमहा दहा रुपये वीज बिलातून देता येतील.कसा असेल हा बल्ब..आता आपण वापरत असलेला साधा बल्ब हा सरासरी ४० ते ६० वॅट क्षमतेचा असतो. त्याची सरासरी किंमत २० रुपये आहे. सीएफएल बल्ब हा १४, १६ व २० व्हॅटचा असतो. त्याची किंमतही जास्त आहे. एलईडी बल्ब हा फक्त सात व्हॅटचा असेल; परंतु तरीही त्याचा प्रकाश हा साध्या ६० वॅटच्या बल्बइतका असेल.या बल्बचा प्रकाश साध्या बल्बपेक्षा अधिक पांढराशुभ्र असेल. तो तापणार नाही. शिवाय पर्यावरणपूरकही असेल.वीजवापर कमी, त्यामुळे बिलही कमी येईल.या बल्बसाठी कंपनीचीच तीन वर्षांची गॅरंटी असेल.बल्ब दुरुस्त करून देणे, बदलून देणे ही जबाबदारीही कंपनीचीच असेल.हे बल्ब महावितरणचे सर्व उपविभाग, शाखा कार्यालये, बिलिंग केंद्रांवर उपलब्ध असतील. बल्ब बसविण्याचे काम फेब्रुवारीअखेर संपविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ते तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही ‘महावितरण’च्या मुख्यालयाशी संपर्कात आहोत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. - शंकर शिंदेमुख्य अभियंता, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ