शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

आता दहावीचे मूल्यमापनही लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST

परीक्षा रद्दचा निर्णय झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील दहावीच्या ५६७४५ विद्यार्थ्यांना मूल्यमापन कसे होणार याची प्रतिक्षा लागली होती. ती ...

परीक्षा रद्दचा निर्णय झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील दहावीच्या ५६७४५ विद्यार्थ्यांना मूल्यमापन कसे होणार याची प्रतिक्षा लागली होती. ती प्रतिक्षा संपली. नववीच्या गुणांची माहिती शाळांमध्ये तयार आहे. बहुतांश शाळांमध्ये दहावीच्या अंतर्गत परीक्षांचे गुण देखील तयार आहेत. त्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करावा. दहावीची तयारी करायची असल्याने काही विद्यार्थी हे इयत्ता नववीमध्ये उत्तीर्ण होण्यापुरते लक्ष देतात. अशा विद्यार्थ्यांची आता मूल्यमापन करताना अडचण होणार आहे. दहावीची परीक्षा झाली नाही. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार असल्याने तेथे गुणवत्तेचा विचार आणि निकष लागणार आहे. त्यामुळे सीईटीबाबत विद्यार्थी, पालक समाधानी आहेत.

शिक्षक काय म्हणतात?

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात नववीच्या परीक्षेतील गुणांचा विचार करण्याचा पर्याय चांगला आहे. मात्र, ज्यांना नववीमध्ये गुण कमी आहेत. अशा विद्यार्थ्यांची काहीशी अडचण होणार आहे.

-राजेश वरक, कोल्हापूर.

कोरोनाची सध्यस्थिती पाहता या मूल्यमापनाबाबत राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. दहावीच्या अंतर्गत परीक्षांतील गुणांचा देखील विचार होणार आहे.

-बी. बी. पाटील, वाकरे.

पालक, विद्यार्थी म्हणतात?

मूल्यमापनाचे धोरण ठरविण्यात शासनाचा बराच वेळ गेला. आता मूल्यमापनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात यावा.

-रेश्मा पठाण, पालक, शाहुपुरी.

अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी घेण्याचा निर्णय चांगला आहे. त्याठिकाणी गुणवत्तेचा विचार होणार आहे.

-शामली जाधव, विद्यार्थीनी, आणजे (राधानगरी)

चौकट

शासन आदेशानुसार सीईटीची तयारी

जिल्ह्यात अकरावीची एकूण १८५ महाविद्यालये आणि त्यातील प्रवेश क्षमता एकूण ४९ हजार ६०० इतकी आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याची तयारी शासन आदेशानुसार करण्यात येईल, असे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.