शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आता दहावीचे मूल्यमापनही लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST

परीक्षा रद्दचा निर्णय झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील दहावीच्या ५६७४५ विद्यार्थ्यांना मूल्यमापन कसे होणार याची प्रतिक्षा लागली होती. ती ...

परीक्षा रद्दचा निर्णय झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील दहावीच्या ५६७४५ विद्यार्थ्यांना मूल्यमापन कसे होणार याची प्रतिक्षा लागली होती. ती प्रतिक्षा संपली. नववीच्या गुणांची माहिती शाळांमध्ये तयार आहे. बहुतांश शाळांमध्ये दहावीच्या अंतर्गत परीक्षांचे गुण देखील तयार आहेत. त्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करावा. दहावीची तयारी करायची असल्याने काही विद्यार्थी हे इयत्ता नववीमध्ये उत्तीर्ण होण्यापुरते लक्ष देतात. अशा विद्यार्थ्यांची आता मूल्यमापन करताना अडचण होणार आहे. दहावीची परीक्षा झाली नाही. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार असल्याने तेथे गुणवत्तेचा विचार आणि निकष लागणार आहे. त्यामुळे सीईटीबाबत विद्यार्थी, पालक समाधानी आहेत.

शिक्षक काय म्हणतात?

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात नववीच्या परीक्षेतील गुणांचा विचार करण्याचा पर्याय चांगला आहे. मात्र, ज्यांना नववीमध्ये गुण कमी आहेत. अशा विद्यार्थ्यांची काहीशी अडचण होणार आहे.

-राजेश वरक, कोल्हापूर.

कोरोनाची सध्यस्थिती पाहता या मूल्यमापनाबाबत राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. दहावीच्या अंतर्गत परीक्षांतील गुणांचा देखील विचार होणार आहे.

-बी. बी. पाटील, वाकरे.

पालक, विद्यार्थी म्हणतात?

मूल्यमापनाचे धोरण ठरविण्यात शासनाचा बराच वेळ गेला. आता मूल्यमापनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात यावा.

-रेश्मा पठाण, पालक, शाहुपुरी.

अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी घेण्याचा निर्णय चांगला आहे. त्याठिकाणी गुणवत्तेचा विचार होणार आहे.

-शामली जाधव, विद्यार्थीनी, आणजे (राधानगरी)

चौकट

शासन आदेशानुसार सीईटीची तयारी

जिल्ह्यात अकरावीची एकूण १८५ महाविद्यालये आणि त्यातील प्रवेश क्षमता एकूण ४९ हजार ६०० इतकी आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याची तयारी शासन आदेशानुसार करण्यात येईल, असे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.