शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रेशन व्यवस्थेतील काळ्याबाजाराला आता चाप

By admin | Updated: March 5, 2015 00:25 IST

‘बायोमेट्रिक’साठी यंत्रणा कामाला : खाबुगिरी होणार बंद, पारदर्शकता येणार

कोल्हापूर : शासनाने रेशन दुकानात बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेमधील काळ्याबाजाराला चाप बसणार आहे. लाभार्थ्याच्या नावावरील धान्यावर दरमहा डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही खाबुगिरी बंद होणार आहे. बायोमेट्रिक बसविण्यासाठी जिल्हा अन्नधान्य वितरण प्रशासन कामाला लागले आहे.संपूर्ण जिल्ह्यात १५६९ रेशन दुकाने आहेत. शासनाकडून दरमहा येणाऱ्या धान्याचे या दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाते. अंत्योदय योजनेतून लाभार्थ्याला दरमहा २० किलो गहू दोन रुपये दराने, तर १५ किलो तांदूळ ३ रुपये दराने दिला जातो. प्राधान्य योजनेतून प्रत्येक व्यक्तीला पाच किलोंप्रमाणे ‘अंत्योदय’च्या दराने धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा सर्वच लाभार्थी रेशनचे धान्य प्रत्येक महिन्याला घेऊन जात नाहीत. परिणामी धान्य शिल्लक राहते. संबंधित धान्य दुकानदार व्यवस्थेतील कर्मचारी,अधिकारी यांना हाताशी धरून कागदोपत्री धान्य घेऊन गेल्याचे दाखवितात. शिल्लक राहिलेले धान्य खुल्या बाजारात विकतात. राजकीय लागेबांधे असल्यामुळे कारवाईही होत नाही. परिणामी अनेक वर्षांपासून गरीब, सर्वसामान्यांसाठी आलेल्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे जगजाहीर आहे. काही दुकानदारांनी तरी लाभार्थ्यांच्या गैरसोयीच्या वेळी दुकान सुरू ठेवून अधिकाधिक धान्य कसे शिल्लक राहील आणि आपल्याला डल्ला कसा मारता येईल यावरच लक्ष केंद्रित केलेले असते. कितीही प्रत्यत्न केले, अधून-मधून कारवाई झाली तरी पूर्णपणे काळ्याबाजाराला चाप बसविण्यात यश येत नव्हते. यामुळे शासनाने शेवटी छत्तीसगड, तमिळनाडू, कर्नाटकच्या धर्तीवर रेशन धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थीचे ‘थंब’ झाल्यानंतरच त्याला धान्य मिळणार आहे. दुकाननिहाय शिल्लक राहिलेल्या धान्याची माहिती नेमकेपणाने मिळणार आहे. त्यात पारदर्शकता येणार आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय ‘प्राधान्य’ व कंसात ‘अंत्योदय’ लाभार्थी तालुनिहाय असे - कोल्हापूर- २४९८८४ (३२५९), करवीर- ३५८६५५ (१९७१), पन्हाळा- १६२७०५(४६५२), हातकणंगले- २९१३९७ (४९९५) , इचलकरंजी - ११३४८६ (४४७०), शिरोळ- २४७०५३ (४६३८), कागल- १६८५६० (४२२४), शाहूवाडी - १२६४३३ (३४६५) गगनबावडा- १८९०२ (८८३), राधानगरी- १३२७८७ (३९६०), गडहिंग्लज- ११७७३१ (६३५०), आजरा- ७३४४३ (४००९), चंदगड- १०७९१८ (६०६९), भुदरगड- ९८८३९ (३५५७).बायोमेट्रिकमुळे रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येणार आहे. काळाबाजार थांबणार आहे. मात्र अंमलबजावणी काटेकोर होणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाचा बायोमेट्रिकचा निर्णय स्वागतार्ह आहे.- चंद्रकात यादव, ‘रेशन बचाव’चे नेतेदुकानांची संख्या अशी सहकारी संस्था८३७वैयक्तिक४५३महिला बचत गट २१७ ग्रामपंचायत४७माजी सैनिक५पुरुष बचत गट१अनुसूचित जाती१इतर८