शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रेशन व्यवस्थेतील काळ्याबाजाराला आता चाप

By admin | Updated: March 5, 2015 00:25 IST

‘बायोमेट्रिक’साठी यंत्रणा कामाला : खाबुगिरी होणार बंद, पारदर्शकता येणार

कोल्हापूर : शासनाने रेशन दुकानात बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेमधील काळ्याबाजाराला चाप बसणार आहे. लाभार्थ्याच्या नावावरील धान्यावर दरमहा डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही खाबुगिरी बंद होणार आहे. बायोमेट्रिक बसविण्यासाठी जिल्हा अन्नधान्य वितरण प्रशासन कामाला लागले आहे.संपूर्ण जिल्ह्यात १५६९ रेशन दुकाने आहेत. शासनाकडून दरमहा येणाऱ्या धान्याचे या दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाते. अंत्योदय योजनेतून लाभार्थ्याला दरमहा २० किलो गहू दोन रुपये दराने, तर १५ किलो तांदूळ ३ रुपये दराने दिला जातो. प्राधान्य योजनेतून प्रत्येक व्यक्तीला पाच किलोंप्रमाणे ‘अंत्योदय’च्या दराने धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा सर्वच लाभार्थी रेशनचे धान्य प्रत्येक महिन्याला घेऊन जात नाहीत. परिणामी धान्य शिल्लक राहते. संबंधित धान्य दुकानदार व्यवस्थेतील कर्मचारी,अधिकारी यांना हाताशी धरून कागदोपत्री धान्य घेऊन गेल्याचे दाखवितात. शिल्लक राहिलेले धान्य खुल्या बाजारात विकतात. राजकीय लागेबांधे असल्यामुळे कारवाईही होत नाही. परिणामी अनेक वर्षांपासून गरीब, सर्वसामान्यांसाठी आलेल्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे जगजाहीर आहे. काही दुकानदारांनी तरी लाभार्थ्यांच्या गैरसोयीच्या वेळी दुकान सुरू ठेवून अधिकाधिक धान्य कसे शिल्लक राहील आणि आपल्याला डल्ला कसा मारता येईल यावरच लक्ष केंद्रित केलेले असते. कितीही प्रत्यत्न केले, अधून-मधून कारवाई झाली तरी पूर्णपणे काळ्याबाजाराला चाप बसविण्यात यश येत नव्हते. यामुळे शासनाने शेवटी छत्तीसगड, तमिळनाडू, कर्नाटकच्या धर्तीवर रेशन धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थीचे ‘थंब’ झाल्यानंतरच त्याला धान्य मिळणार आहे. दुकाननिहाय शिल्लक राहिलेल्या धान्याची माहिती नेमकेपणाने मिळणार आहे. त्यात पारदर्शकता येणार आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय ‘प्राधान्य’ व कंसात ‘अंत्योदय’ लाभार्थी तालुनिहाय असे - कोल्हापूर- २४९८८४ (३२५९), करवीर- ३५८६५५ (१९७१), पन्हाळा- १६२७०५(४६५२), हातकणंगले- २९१३९७ (४९९५) , इचलकरंजी - ११३४८६ (४४७०), शिरोळ- २४७०५३ (४६३८), कागल- १६८५६० (४२२४), शाहूवाडी - १२६४३३ (३४६५) गगनबावडा- १८९०२ (८८३), राधानगरी- १३२७८७ (३९६०), गडहिंग्लज- ११७७३१ (६३५०), आजरा- ७३४४३ (४००९), चंदगड- १०७९१८ (६०६९), भुदरगड- ९८८३९ (३५५७).बायोमेट्रिकमुळे रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येणार आहे. काळाबाजार थांबणार आहे. मात्र अंमलबजावणी काटेकोर होणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाचा बायोमेट्रिकचा निर्णय स्वागतार्ह आहे.- चंद्रकात यादव, ‘रेशन बचाव’चे नेतेदुकानांची संख्या अशी सहकारी संस्था८३७वैयक्तिक४५३महिला बचत गट २१७ ग्रामपंचायत४७माजी सैनिक५पुरुष बचत गट१अनुसूचित जाती१इतर८