शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भूविकास बँकेच्या शेतकºयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिवशक्ती पाणीपुरवठा योजना आकुर्ळे, महादेव पाणीपुरवठा माणगाव, चरणाईदेवी पाणीपुरवठा चरण या तीन पाणीपुरवठा योजनांचे आठ कोटी रुपयांचे कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी शेतकरी गेली पाच वर्षे आंदोलन करीत आहेत. आता तरी आमचा सात-बारा कोरा शासन करणार काय? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिवशक्ती पाणीपुरवठा योजना आकुर्ळे, महादेव पाणीपुरवठा माणगाव, चरणाईदेवी पाणीपुरवठा चरण या तीन पाणीपुरवठा योजनांचे आठ कोटी रुपयांचे कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी शेतकरी गेली पाच वर्षे आंदोलन करीत आहेत. आता तरी आमचा सात-बारा कोरा शासन करणार काय? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शासनाच्या भूविकास बँकेने शेतकºयांच्या जमिनीच्या लिलावाच्या नोटिसा लागू केल्याने तीन गावांतील शेतकºयांत खळबळ उडाली आहे.शेतीला पाणीपुरवठा व्हावा, उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढले जावे यासाठी आकुर्ळे, माणगाव, चरण या गावांतील शेतकºयांनी एकत्र येऊन पाणीपुरवठा योजना स्थापन केल्या. या तीन गावांतील पाणीपुरवठा योजना विश्वास साखर कारखाना पुरस्कृत आहेत. शेतकºयांनी भूविकास बँकेचे कर्ज काढून स्वत:च्या सात-बारा उताºयावर कर्जाचा बोजा नोंद करून संस्था काढल्या. तीन संस्थांचे सहाशे सभासद आहेत. आकुर्ळे, माणगाव, चरण या तीन गावांतील शेतकºयांचे या पाणी योजनेमुळे सुमारे साडेआठशे एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत उसावर पडलेला मावा, उसाला लागलेली हुमणी, कारखान्याने दिलेला कमी दर, अशा अनेक समस्यांनी शेतकरी अडचणीत सापडला. बँकांचे कर्ज वाढत गेले. त्यामुळे भूविकास बँकेने तीन गावांतील शेतकºयांना नोटिसा लागू केल्या आहेत.विश्वास साखर कारखाना पुरस्कृत या पाणीपुरवठा योजना असल्या, तरी सध्या तरी या कर्जाची जबाबदारी कारखाना घेत नाही; ऊस मात्र विश्वास साखर कारखाना घेऊन जातो. सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे. पंधरा दिवसांपूर्वी बँकेने शेतकºयांच्या सात-बारावर कर्जाची नोंद करून जमीन विक्री करणार असल्याची नोटीस लागू केल्यामुळे तीन गावांतील शेतकरी भूमिहीन होणार आहे. शेतीवर उपजीविका असणाºया शेतकºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी शासनाने तीन गावांतीत पाणीपुरवठा योजनांचे कर्ज माफ करून सात-बारा कोरा करण्याची मागणी होत आहे.