शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बँकेच्या शेतकºयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिवशक्ती पाणीपुरवठा योजना आकुर्ळे, महादेव पाणीपुरवठा माणगाव, चरणाईदेवी पाणीपुरवठा चरण या तीन पाणीपुरवठा योजनांचे आठ कोटी रुपयांचे कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी शेतकरी गेली पाच वर्षे आंदोलन करीत आहेत. आता तरी आमचा सात-बारा कोरा शासन करणार काय? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिवशक्ती पाणीपुरवठा योजना आकुर्ळे, महादेव पाणीपुरवठा माणगाव, चरणाईदेवी पाणीपुरवठा चरण या तीन पाणीपुरवठा योजनांचे आठ कोटी रुपयांचे कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी शेतकरी गेली पाच वर्षे आंदोलन करीत आहेत. आता तरी आमचा सात-बारा कोरा शासन करणार काय? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शासनाच्या भूविकास बँकेने शेतकºयांच्या जमिनीच्या लिलावाच्या नोटिसा लागू केल्याने तीन गावांतील शेतकºयांत खळबळ उडाली आहे.शेतीला पाणीपुरवठा व्हावा, उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढले जावे यासाठी आकुर्ळे, माणगाव, चरण या गावांतील शेतकºयांनी एकत्र येऊन पाणीपुरवठा योजना स्थापन केल्या. या तीन गावांतील पाणीपुरवठा योजना विश्वास साखर कारखाना पुरस्कृत आहेत. शेतकºयांनी भूविकास बँकेचे कर्ज काढून स्वत:च्या सात-बारा उताºयावर कर्जाचा बोजा नोंद करून संस्था काढल्या. तीन संस्थांचे सहाशे सभासद आहेत. आकुर्ळे, माणगाव, चरण या तीन गावांतील शेतकºयांचे या पाणी योजनेमुळे सुमारे साडेआठशे एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत उसावर पडलेला मावा, उसाला लागलेली हुमणी, कारखान्याने दिलेला कमी दर, अशा अनेक समस्यांनी शेतकरी अडचणीत सापडला. बँकांचे कर्ज वाढत गेले. त्यामुळे भूविकास बँकेने तीन गावांतील शेतकºयांना नोटिसा लागू केल्या आहेत.विश्वास साखर कारखाना पुरस्कृत या पाणीपुरवठा योजना असल्या, तरी सध्या तरी या कर्जाची जबाबदारी कारखाना घेत नाही; ऊस मात्र विश्वास साखर कारखाना घेऊन जातो. सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे. पंधरा दिवसांपूर्वी बँकेने शेतकºयांच्या सात-बारावर कर्जाची नोंद करून जमीन विक्री करणार असल्याची नोटीस लागू केल्यामुळे तीन गावांतील शेतकरी भूमिहीन होणार आहे. शेतीवर उपजीविका असणाºया शेतकºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी शासनाने तीन गावांतीत पाणीपुरवठा योजनांचे कर्ज माफ करून सात-बारा कोरा करण्याची मागणी होत आहे.