शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

मद्यनिर्मितीच्या २१ कंपन्यांना नोटिसा

By admin | Updated: April 28, 2016 23:12 IST

अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत ५० टक्के पाणी कपात करा, अन्यथा न्यायालयाच्या अवमान समजून कारवाई करण्यात येईल,

अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत ५० टक्के पाणी कपात करा, अन्यथा न्यायालयाच्या अवमान समजून कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील मद्यनिर्मिती करणाऱ्या दहा व आसवनी (बिसरली) च्या ११ घटकांना बजावल्या आहेत़ दरम्यान याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविण्यात आली आहे़मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मद्यनिर्मिती व इतर उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात कपात करून, यामुळे वाचणारे पाणी गरजेनुसार दुष्काळी गावांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, असे आदेश दिले आहेत़ हा आदेश नगर जिल्ह्यातील उद्योगांनाही लागू आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना याबाबतचे आदेश देण्यात आले होते़ जिल्ह्यातील मद्यनिर्मिती व आसवनी घटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत येतात़ या विभागाने जिल्ह्यातील दहा मद्यनिर्मिती करणारे व ११ आसवनीच्या घटकांना, म्हणजे एकूण २१ कंपन्यांना यासंदर्भात बुधवारी रात्री उशिराने नोटिसा बजावल्या आहेत़ पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करून, यामुळे वाचणारे पाणी दुष्काळी भागांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नोटिसाव्दारे करण्यात आल्या असून, याविषयीचा अहवाल कंपन्याकडून मागविण्यात आला आहे़ दैनंदिन पाणी वापराचा अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त झाला नाही़ दरम्यान याविषयी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र बैठक बोलविण्यात आली असून, या बैठकीत कारखान्यांच्या पाणी कपातीबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़(प्रतिनिधी)न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मद्यनिर्मिती करणाऱ्या दहा व आसवनीच्या ११ घटकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ पाणी कपातीबाबत अहवाल सादर करण्याचे त्यांना कळविण्यात आले आहे़-भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क