शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

‘दालमिया’ला दूषित पाण्याबद्दल नोटीस

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

‘प्रदूषण नियंत्रण’चे वरातीमागून घोडे

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया शुगर कंपनी) साखर कारखान्याला दूषित पाण्याची अशास्त्रीय पद्धतीने निर्गत होणारी व्यवस्था तत्काळ थांबवा, अन्यथा कारखान्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ताकीद कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसीद्वारे दिली आहे, म्हणजेच वरातीमागून घोडे नाचविण्याचा प्रकार प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत आहे.साखर कारखान्यांना गळीत हंगामापूर्वी प्रदूषण मंडळाचा परवाना मिळाल्याशिवाय हंगाम सुरू करता येत नाही; मग प्रदूषण मंडळाने प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची निर्गत व्यवस्था न पाहताच कंपनीला कारखाना सुरू करण्याची परवनागी दिलीच कशी, हा प्रश्न कारखाना कार्यक्षेत्रातून विचारला जात आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे मळीमिश्रित पाणी साठविण्याचा प्रश्न आहे. लघूनच्या गळतीमुळे हे पाणी ओढ्याद्वारे कासारी नदीत मिसळते. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते. ही बाब निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली होती. कारखान्याने वन परिक्षेत्राजवळ असणाऱ्या जमिनीत कच्च्या खड्ड्यात दोन ठिकाणी सांडपाणी साठविले असल्याचे आढळून आले. कारखान्याचे प्रक्रिया केलेले दूषित पाणी कच्च्या खड्ड्यात साठवून ते मुरविण्यास प्रदूषण मंडळाचा प्रतिबंध आहे. गत हंगामात प्रदूषण मंडळाने मळीमिश्रित पाणी कासारी नदीत थेट मिसळल्याने कारखाना १५ दिवस बंद ठेवला होता. असा कटू प्रसंग अनुभवला असतानासुद्धा कंपनीने कच्च्या खड्ड्यात सांडपाणी साठविण्याचे धाडस केले.एखाद्या तक्रारदाराने तक्रार केल्यावरच प्रदूषण मंडळ जागे होणार का? हंगाम सुरू करण्यापूर्वी प्रदूषण मंडळाने कारखान्याच्या प्रक्रिया पाण्याची (दूषित), राखेची मळी, आणि हवा प्रदूषित करणाऱ्या धुराची काय व्यवस्था केली आहे, हे न पाहताच परवाना दिलाच कसा? त्यानंतर तक्रारदारांच्या तक्रारीनंतरच कारखान्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना प्रदूषण मंडळाने दूषित पाण्याची व्यवस्था शास्त्रीय पद्धतीने करावी, अन्यथा कारखान्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तक्रार देऊन मंडळाने वरातीमागून घोडे नाचवून तक्रारदारंची बोळवण केली आहे. (वार्ताहर)कारखान्याने प्रक्रिया केलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन लघून (तळी) बांधली आहेत. तीनपैकी पहिल्या व दुसऱ्या लघूनला गळती असून त्यांचे दूषित पाणी तिसऱ्या लघूनमध्ये तीन ठिकाणी उमाळते. ही बाब प्रदूषण मंडळाच्या निर्दशनास दिनकर चौगुले यांनी आणून दिली. त्यानंतरच कंपनीच्या विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचे पाऊल उचलले. कारखान्यातील मळी मिश्रित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मेले. आता माणसे मारणार काय? असा सवाल केला.