शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘दालमिया’ला दूषित पाण्याबद्दल नोटीस

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

‘प्रदूषण नियंत्रण’चे वरातीमागून घोडे

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया शुगर कंपनी) साखर कारखान्याला दूषित पाण्याची अशास्त्रीय पद्धतीने निर्गत होणारी व्यवस्था तत्काळ थांबवा, अन्यथा कारखान्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ताकीद कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसीद्वारे दिली आहे, म्हणजेच वरातीमागून घोडे नाचविण्याचा प्रकार प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत आहे.साखर कारखान्यांना गळीत हंगामापूर्वी प्रदूषण मंडळाचा परवाना मिळाल्याशिवाय हंगाम सुरू करता येत नाही; मग प्रदूषण मंडळाने प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची निर्गत व्यवस्था न पाहताच कंपनीला कारखाना सुरू करण्याची परवनागी दिलीच कशी, हा प्रश्न कारखाना कार्यक्षेत्रातून विचारला जात आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे मळीमिश्रित पाणी साठविण्याचा प्रश्न आहे. लघूनच्या गळतीमुळे हे पाणी ओढ्याद्वारे कासारी नदीत मिसळते. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते. ही बाब निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली होती. कारखान्याने वन परिक्षेत्राजवळ असणाऱ्या जमिनीत कच्च्या खड्ड्यात दोन ठिकाणी सांडपाणी साठविले असल्याचे आढळून आले. कारखान्याचे प्रक्रिया केलेले दूषित पाणी कच्च्या खड्ड्यात साठवून ते मुरविण्यास प्रदूषण मंडळाचा प्रतिबंध आहे. गत हंगामात प्रदूषण मंडळाने मळीमिश्रित पाणी कासारी नदीत थेट मिसळल्याने कारखाना १५ दिवस बंद ठेवला होता. असा कटू प्रसंग अनुभवला असतानासुद्धा कंपनीने कच्च्या खड्ड्यात सांडपाणी साठविण्याचे धाडस केले.एखाद्या तक्रारदाराने तक्रार केल्यावरच प्रदूषण मंडळ जागे होणार का? हंगाम सुरू करण्यापूर्वी प्रदूषण मंडळाने कारखान्याच्या प्रक्रिया पाण्याची (दूषित), राखेची मळी, आणि हवा प्रदूषित करणाऱ्या धुराची काय व्यवस्था केली आहे, हे न पाहताच परवाना दिलाच कसा? त्यानंतर तक्रारदारांच्या तक्रारीनंतरच कारखान्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना प्रदूषण मंडळाने दूषित पाण्याची व्यवस्था शास्त्रीय पद्धतीने करावी, अन्यथा कारखान्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तक्रार देऊन मंडळाने वरातीमागून घोडे नाचवून तक्रारदारंची बोळवण केली आहे. (वार्ताहर)कारखान्याने प्रक्रिया केलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन लघून (तळी) बांधली आहेत. तीनपैकी पहिल्या व दुसऱ्या लघूनला गळती असून त्यांचे दूषित पाणी तिसऱ्या लघूनमध्ये तीन ठिकाणी उमाळते. ही बाब प्रदूषण मंडळाच्या निर्दशनास दिनकर चौगुले यांनी आणून दिली. त्यानंतरच कंपनीच्या विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचे पाऊल उचलले. कारखान्यातील मळी मिश्रित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मेले. आता माणसे मारणार काय? असा सवाल केला.