शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

माती उत्खननप्रकरणी ७६ शेतकऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: June 24, 2017 00:11 IST

वीट व्यावसायिकांमध्ये खळबळ : चिंचवाडमधील शेतकरी एकत्रित लढणार

लोकमत न्यूज नेटवर्क --उदगाव : शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील उदगाव, चिंचवाडमध्ये तब्बल ३३ हजार ब्रास बेकायदेशीर माती उत्खनन झाल्यानंतर अखेर तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. या नोटिसांमुळे वीटभट्टी व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सरासरी ८ ते १५ लाखांपर्यंत दंड ठोठावण्याची शक्यता असून, याबाबत सात दिवसांत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे म्हणणे मांडण्याबाबतची नोटीस शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. उदगाव, चिंचवाड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून वीट व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे कृष्णाकाठ हा पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असून, कृष्णा नदीकाठ बचावासाठी अनेक नागरिकांनी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, मंत्रालय, लोकायुक्त यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. यामध्ये लोकायुक्त यांनी बेकायदेशीरपणे ३३ हजार ब्रास माती उत्खनन झाल्याचे स्पष्ट करून संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून चिंचवाडमधील ३२ व उदगावमधील ४४ शेतकऱ्यांना बेकायदेशीर माती उत्खनन केल्याप्रश्नी सात दिवसांत म्हणणे मांडण्याबाबतच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी रितसर रॉयल्टी भरून माती उत्खनन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात शासकीय अधिकाऱ्यांनी मोजणी न करता मातीचे उत्खनन करण्यास परवानगी दिल्याने माती नेमकी किती ब्रास काढण्यात आली, याचा अंदाज शेतकऱ्यांना आला नाही. त्यामुळे वीट व्यावसायिकांनी प्रत्येक गटात सरासरी १०० ते २ हजार ब्रास मातीचे उत्खनन बेकायदेशीरपणे केले आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींनंतर प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व गट नंबरचा पंचनामा करण्याचा आदेश दिला होता. यानंतर प्रत्येक गटात असा एकूण ३३ हजार ब्रास मातीचे उत्खनन बेकायदेशीरपणे झाल्याचे समोर आले होते. याबाबत मुंबई येथे लोकायुक्त यांच्या सुनावणीमध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ कायद्यानुसार अनधिकृतपणे माती उत्खनन केलेल्या मातीची बाजार भावाने होणाऱ्या रकमेच्या पाचपट दंड वसुलीचा आदेश दिला आहे. रक्कम न भरल्यास शेतकऱ्यांच्या सात/बारा उताऱ्यावर रक्कम चढवून गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. वीट व्यावसायिकांमुळे शेतकरी अडचणीतउदगाव, चिंचवाड परिसरातील बाहेर गावातील वीट व्यावसायिकांनी मातीचे उत्खनन करून वीट व्यवसाय थाटला आहे. मात्र, ह्या व्यावसायिकांनी शासनाला कमी रॉयल्टी भरून जादा मातीचे उत्खनन केले आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांवर लादला जात आहे. जादा मातीचे उत्खनन होत असताना कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी यावेळी काय करीत होते? असा सवाल शेतकरी करीत असून, सर्व शेतकरी एकत्रित येऊन याबाबत तहसीलदारांपुढे म्हणणे मांडणार आहेत.कोट्यवधींची रक्कमचिंचवाड येथील शरद चव्हाण यांच्या तक्रारीनंतर लोकायुक्तांनी शेतकऱ्यांकडून दंड वसुलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३३ ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन झाले असून, यात उदगाव व चिंचवाडमधील ७६ शेतकऱ्यांना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. दंडाची पाचपट रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला असून, ती सहा कोटींच्या घरात जाते. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, व्यावसायिकांनी मात्र काढता पाय घेतला आहे.