शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

माती उत्खननप्रकरणी ७६ शेतकऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: June 24, 2017 00:11 IST

वीट व्यावसायिकांमध्ये खळबळ : चिंचवाडमधील शेतकरी एकत्रित लढणार

लोकमत न्यूज नेटवर्क --उदगाव : शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील उदगाव, चिंचवाडमध्ये तब्बल ३३ हजार ब्रास बेकायदेशीर माती उत्खनन झाल्यानंतर अखेर तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. या नोटिसांमुळे वीटभट्टी व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सरासरी ८ ते १५ लाखांपर्यंत दंड ठोठावण्याची शक्यता असून, याबाबत सात दिवसांत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे म्हणणे मांडण्याबाबतची नोटीस शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. उदगाव, चिंचवाड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून वीट व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे कृष्णाकाठ हा पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असून, कृष्णा नदीकाठ बचावासाठी अनेक नागरिकांनी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, मंत्रालय, लोकायुक्त यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. यामध्ये लोकायुक्त यांनी बेकायदेशीरपणे ३३ हजार ब्रास माती उत्खनन झाल्याचे स्पष्ट करून संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून चिंचवाडमधील ३२ व उदगावमधील ४४ शेतकऱ्यांना बेकायदेशीर माती उत्खनन केल्याप्रश्नी सात दिवसांत म्हणणे मांडण्याबाबतच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी रितसर रॉयल्टी भरून माती उत्खनन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात शासकीय अधिकाऱ्यांनी मोजणी न करता मातीचे उत्खनन करण्यास परवानगी दिल्याने माती नेमकी किती ब्रास काढण्यात आली, याचा अंदाज शेतकऱ्यांना आला नाही. त्यामुळे वीट व्यावसायिकांनी प्रत्येक गटात सरासरी १०० ते २ हजार ब्रास मातीचे उत्खनन बेकायदेशीरपणे केले आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींनंतर प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व गट नंबरचा पंचनामा करण्याचा आदेश दिला होता. यानंतर प्रत्येक गटात असा एकूण ३३ हजार ब्रास मातीचे उत्खनन बेकायदेशीरपणे झाल्याचे समोर आले होते. याबाबत मुंबई येथे लोकायुक्त यांच्या सुनावणीमध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ कायद्यानुसार अनधिकृतपणे माती उत्खनन केलेल्या मातीची बाजार भावाने होणाऱ्या रकमेच्या पाचपट दंड वसुलीचा आदेश दिला आहे. रक्कम न भरल्यास शेतकऱ्यांच्या सात/बारा उताऱ्यावर रक्कम चढवून गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. वीट व्यावसायिकांमुळे शेतकरी अडचणीतउदगाव, चिंचवाड परिसरातील बाहेर गावातील वीट व्यावसायिकांनी मातीचे उत्खनन करून वीट व्यवसाय थाटला आहे. मात्र, ह्या व्यावसायिकांनी शासनाला कमी रॉयल्टी भरून जादा मातीचे उत्खनन केले आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांवर लादला जात आहे. जादा मातीचे उत्खनन होत असताना कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी यावेळी काय करीत होते? असा सवाल शेतकरी करीत असून, सर्व शेतकरी एकत्रित येऊन याबाबत तहसीलदारांपुढे म्हणणे मांडणार आहेत.कोट्यवधींची रक्कमचिंचवाड येथील शरद चव्हाण यांच्या तक्रारीनंतर लोकायुक्तांनी शेतकऱ्यांकडून दंड वसुलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३३ ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन झाले असून, यात उदगाव व चिंचवाडमधील ७६ शेतकऱ्यांना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. दंडाची पाचपट रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला असून, ती सहा कोटींच्या घरात जाते. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, व्यावसायिकांनी मात्र काढता पाय घेतला आहे.