शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पाण्याची गळती नव्हे, राजरोस चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचा जमा-खर्चाच्या बाबतीत मेळ बसत नाही. त्यामुळे हा विभाग आर्थिकदृष्ट्या संकटात ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचा जमा-खर्चाच्या बाबतीत मेळ बसत नाही. त्यामुळे हा विभाग आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. पन्नास टक्के पाण्याची गळती आहे, असे भासविण्याचा प्रयत्न होतो. परंतु याला गळती हेच एकमेव कारण नाही तर पाण्याची होणारी राजरोस चोरी आणि त्याला खतपाणी घालणारे कर्मचारी हेच कारणीभूत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याकरिता बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर येथील उपसा केंद्राद्वारे पंचगंगा नदीतून प्रतिदिन १२० ते १३० द.ल.घ.मी. इतका पाणी उपसा केला जातो. परंतु, यापैकी ६५ द. ल. घ. मी. पाण्याचेच बिलिंग होते. मग बाकीचे पाणी जाते कोठे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

अधिकारी वर्ग शहरातील जुन्या जलवाहिन्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा आणि गळती हेच आर्थिक नुकसानीला प्रमुख कारण असल्याचा दावा करतात. जमिनीखाली पाणी कोठे मुरतंय हे फारसं कोणी पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु पाणीपुरवठा विभाग देत असलेली आकडेवारी पाहता गळतीचे प्रमाण कमी असावे आणि पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत असावी, असा संशय घेतला जात आहे.

शहरात किमान दहा हजार कनेक्शन ही बोगस आहेत तसेच काही हॉटेल्स, व्यवसायाच्या ठिकाणी दोन-दोन कनेक्शन घेतली असल्याचा संशय व्यक्त केला जातो. नागरी कृती समितीच्या सदस्यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. या पाणी चोरीत मीटर रिडर्स यांचा हातभार मोठा असल्याचा आक्षेप कृती समितीने नुकताच घेतला होता.

गळती असेल तर पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता आहे. पण येथे पाण्याची चोरी होते असल्याचे काही आकडे समोर येत आहेत. रोज १३० एमएलडी पाणी उपसा होते. त्यातील पन्नास टक्के म्हणजे ६५ एमएलडी पाणी गळती होत असेल आणि जमिनीत मुरत असेल मग जयंती नाल्यातून रोज ९३ ते ९५ द.ल.घ.मी. सांडपाणी कसे निर्माण होते हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

-गळती, चोरी रोखली तरच नुकसान कमी-

पाण्याची गळती, चोरी रोखली तरच पाणीपुरवठा विभागाचा खर्च कमी होणार आहे. १३० द.ल.घ.मी. पाण्याची किंमत, उपसा करण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्याकरिता येणारा विद्युत खर्च कमी होईल. नुकसान कमी झाल्यास हा विभाग सक्षम होणार आहे.

पॉईंटर -

- पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट - ५० ते ५५ कोटी

- शहरातील गळती काढण्यावर होणारा खर्च - ६० ते ७० लाख

- पाणीपुरवठा विभागाचे वीज बिल खर्च - २३ ते २८ कोटी वार्षिक