शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची गळती नव्हे, राजरोस चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचा जमा-खर्चाच्या बाबतीत मेळ बसत नाही. त्यामुळे हा विभाग आर्थिकदृष्ट्या संकटात ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचा जमा-खर्चाच्या बाबतीत मेळ बसत नाही. त्यामुळे हा विभाग आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. पन्नास टक्के पाण्याची गळती आहे, असे भासविण्याचा प्रयत्न होतो. परंतु याला गळती हेच एकमेव कारण नाही तर पाण्याची होणारी राजरोस चोरी आणि त्याला खतपाणी घालणारे कर्मचारी हेच कारणीभूत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याकरिता बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर येथील उपसा केंद्राद्वारे पंचगंगा नदीतून प्रतिदिन १२० ते १३० द.ल.घ.मी. इतका पाणी उपसा केला जातो. परंतु, यापैकी ६५ द. ल. घ. मी. पाण्याचेच बिलिंग होते. मग बाकीचे पाणी जाते कोठे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

अधिकारी वर्ग शहरातील जुन्या जलवाहिन्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा आणि गळती हेच आर्थिक नुकसानीला प्रमुख कारण असल्याचा दावा करतात. जमिनीखाली पाणी कोठे मुरतंय हे फारसं कोणी पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु पाणीपुरवठा विभाग देत असलेली आकडेवारी पाहता गळतीचे प्रमाण कमी असावे आणि पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत असावी, असा संशय घेतला जात आहे.

शहरात किमान दहा हजार कनेक्शन ही बोगस आहेत तसेच काही हॉटेल्स, व्यवसायाच्या ठिकाणी दोन-दोन कनेक्शन घेतली असल्याचा संशय व्यक्त केला जातो. नागरी कृती समितीच्या सदस्यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. या पाणी चोरीत मीटर रिडर्स यांचा हातभार मोठा असल्याचा आक्षेप कृती समितीने नुकताच घेतला होता.

गळती असेल तर पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता आहे. पण येथे पाण्याची चोरी होते असल्याचे काही आकडे समोर येत आहेत. रोज १३० एमएलडी पाणी उपसा होते. त्यातील पन्नास टक्के म्हणजे ६५ एमएलडी पाणी गळती होत असेल आणि जमिनीत मुरत असेल मग जयंती नाल्यातून रोज ९३ ते ९५ द.ल.घ.मी. सांडपाणी कसे निर्माण होते हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

-गळती, चोरी रोखली तरच नुकसान कमी-

पाण्याची गळती, चोरी रोखली तरच पाणीपुरवठा विभागाचा खर्च कमी होणार आहे. १३० द.ल.घ.मी. पाण्याची किंमत, उपसा करण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्याकरिता येणारा विद्युत खर्च कमी होईल. नुकसान कमी झाल्यास हा विभाग सक्षम होणार आहे.

पॉईंटर -

- पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट - ५० ते ५५ कोटी

- शहरातील गळती काढण्यावर होणारा खर्च - ६० ते ७० लाख

- पाणीपुरवठा विभागाचे वीज बिल खर्च - २३ ते २८ कोटी वार्षिक