शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पाण्याची गळती नव्हे, राजरोस चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचा जमा-खर्चाच्या बाबतीत मेळ बसत नाही. त्यामुळे हा विभाग आर्थिकदृष्ट्या संकटात ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचा जमा-खर्चाच्या बाबतीत मेळ बसत नाही. त्यामुळे हा विभाग आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. पन्नास टक्के पाण्याची गळती आहे, असे भासविण्याचा प्रयत्न होतो. परंतु याला गळती हेच एकमेव कारण नाही तर पाण्याची होणारी राजरोस चोरी आणि त्याला खतपाणी घालणारे कर्मचारी हेच कारणीभूत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याकरिता बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर येथील उपसा केंद्राद्वारे पंचगंगा नदीतून प्रतिदिन १२० ते १३० द.ल.घ.मी. इतका पाणी उपसा केला जातो. परंतु, यापैकी ६५ द. ल. घ. मी. पाण्याचेच बिलिंग होते. मग बाकीचे पाणी जाते कोठे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

अधिकारी वर्ग शहरातील जुन्या जलवाहिन्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा आणि गळती हेच आर्थिक नुकसानीला प्रमुख कारण असल्याचा दावा करतात. जमिनीखाली पाणी कोठे मुरतंय हे फारसं कोणी पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु पाणीपुरवठा विभाग देत असलेली आकडेवारी पाहता गळतीचे प्रमाण कमी असावे आणि पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत असावी, असा संशय घेतला जात आहे.

शहरात किमान दहा हजार कनेक्शन ही बोगस आहेत तसेच काही हॉटेल्स, व्यवसायाच्या ठिकाणी दोन-दोन कनेक्शन घेतली असल्याचा संशय व्यक्त केला जातो. नागरी कृती समितीच्या सदस्यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. या पाणी चोरीत मीटर रिडर्स यांचा हातभार मोठा असल्याचा आक्षेप कृती समितीने नुकताच घेतला होता.

गळती असेल तर पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता आहे. पण येथे पाण्याची चोरी होते असल्याचे काही आकडे समोर येत आहेत. रोज १३० एमएलडी पाणी उपसा होते. त्यातील पन्नास टक्के म्हणजे ६५ एमएलडी पाणी गळती होत असेल आणि जमिनीत मुरत असेल मग जयंती नाल्यातून रोज ९३ ते ९५ द.ल.घ.मी. सांडपाणी कसे निर्माण होते हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

-गळती, चोरी रोखली तरच नुकसान कमी-

पाण्याची गळती, चोरी रोखली तरच पाणीपुरवठा विभागाचा खर्च कमी होणार आहे. १३० द.ल.घ.मी. पाण्याची किंमत, उपसा करण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्याकरिता येणारा विद्युत खर्च कमी होईल. नुकसान कमी झाल्यास हा विभाग सक्षम होणार आहे.

पॉईंटर -

- पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट - ५० ते ५५ कोटी

- शहरातील गळती काढण्यावर होणारा खर्च - ६० ते ७० लाख

- पाणीपुरवठा विभागाचे वीज बिल खर्च - २३ ते २८ कोटी वार्षिक