शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 15:29 IST

ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देसमितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच केला प्रश्न

कोल्हापूर : ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक आज मुख्य सचिव संजयकुमार यांनी बोलावली आहे. यावर गुरुवारी शेट्टी यांनी आक्षेप घेत मुख्य सचिवांना पत्र पाठवून बैठक रद्द करा, समिती सदस्य नियुक्तीनंतरच बैठक घ्या अशी विनंती केली. त्यानंतर यंत्रणा वेगाने हलली. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर या बैठकीबाबत चर्चा झाली.एफआरपी कायदा लागू झाल्यापासून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील साखर आयुक्तांसह शेतकरी, साखर कारखानदार प्रतिनिधी यांचा प्रमुख सहभाग असलेली ऊस दर नियंत्रण समितीच गळीत हंगामाचा निर्णय घेते.

गेल्या वर्षी स्थापन झालेली समिती मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आली आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या समितीची स्थापना होणे आवश्यक होते. तथापि, कोरोनामुळे ही समिती अजूनही स्थापन होऊ शकलेली नाही.या वर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन सरकारने चालविले आहे; पण अजून समितीही नाही आणि बैठकही नाही अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आज बैठकीचे नियोजन केले होते.

शेट्टी यांनी उपस्थित केलेले प्रश्न1. शेतकरी आणि साखर कारखानदार यांचे प्रतिनिधी नसल्याने चर्चा कुणाशी करणार2. थकीत एफआरपीवर निर्णय कोण घेणार3. ७०:३० च्या फॉर्म्युल्यावर काय निर्णय घेणार

अजून अशासकीय सदस्यांची नेमणूक झालेली नसताना केवळ शासकीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परस्पर निर्णय घेणे चुकीचे आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.- राजू शेट्टी, माजी खासदार

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर