शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

घातपात नव्हेच, अंबानींची सहानुभूती मिळविण्याची धडपड;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जिलेटिनच्या कांड्या सापडणे यामागे कोणताही घातपात नसून, सहानुभूती मिळविण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जिलेटिनच्या कांड्या सापडणे यामागे कोणताही घातपात नसून, सहानुभूती मिळविण्याचा अंबानी यांचाच प्रयत्न असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. तीन कृषी कायद्यांमुळे देशभरातील सामान्य जनतेत अंबानी व अदानी यांच्याविरोधात जो रोष तयार झाला आहे, त्यातून डॅमेज झालेली प्रतिमा सुधारली जावी, यासाठीच हा आटापिटा असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, या प्रकरणातील साऱ्याच घटना संशयास्पद आहेत. गाडी चोरीची आहे. तिथे गाडी लावून जिलेटिनच्या कांड्या ठेवेपर्यंत कुणालाच कसे माहीत झाले नाही, हे गौडबंगाल आहे. पोलीस यंत्रणेचेही हे अपयश म्हणायला हवे. काहीतरी स्टंट करून देशाची सहानुभूती कशी मिळवता येईल, असा प्रयत्न असल्याचे माझे मत आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांचे अंबानी व अदानी हेच सर्वाधिक लाभार्थी आहेत. या आंदोलनात आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी बलिदान दिले. गेले चार महिने हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे देशभरातील जनतेत या उद्योजकांबद्दल तीव्र संतापाची भावना आहे. ती कमी करण्यासाठी असे काही तरी घडवून आणावे लागते. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य उजेडात आणावे. अंबानी यांचे पाठीराखे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून या प्रकरणाचा छडा लावावा, म्हणजे नेमके सत्य जनतेसमोर येईल.