शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अठ्ठावन्न नाही, पन्नास-आठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 01:03 IST

मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसंख्यावाचनाच्या नव्या पद्धतीत गणिती कल्पकतेला वाव, भाषा सौंदर्य लोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे. भाषा सौंदर्यावर जसा हा परिणाम करणारा बदल आहे, तसा व्यावहारिकदृष्ट्याही प्रतिकुल ठरेल अशी खंतही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा नवा बदल घोकमपट्टीऐवजी समज वाढविणारा असल्याने स्वागतही झाले आहे. पारंपरिक संख्या वाचनाच्या पद्धतीतून अनेक पिढ्या शिकल्या आहेत. मग त्यांना जोडाक्षरे अन् गणिताची भीती नव्हती का? असा सवाल शिक्षकांचा आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे या पद्धतीमुळे नामशेष होतील. परिणामी, ही पद्धत भाषा सौंदर्यात कशी बसणार, अशी खंत काहींची असली तरी स्वागतही समपातळीवर आहे. नवी पद्धत दाक्षिणात्य असून इंग्रजीच्या धर्तीवर आहे. सुरुवातीला ही पद्धत प्रथमत: गोंधळाची वाटत आहे. परंतु, गणिती कल्पकतेला वाव देणारी आणि भाषा सौंदर्यावर शून्य परिणाम करणारी ठरेल, असा विश्वासही जिल्ह्यातील गणित विषय शिक्षकांनी व्यक्त केला आहे.नवीन बदल झालेच पाहिजेनवी पद्धत गणिती कल्पकतेला वाव देणारी आहे. सुरुवातीला गोंधळ वाटत असला ही पद्धत मुले सहजपणे आत्मसात करीत. चार वर्षांपूर्वी असा बदल करण्याची आवश्यकता मी विद्या प्राधिकरणाकडे सुचविला होता. अभ्यासक्रमात नवीन बदल झाले पाहिजे. हे बदल स्वीकारण्यास हरकत नसावी.-अनिल माटे, जि.प. शाळा कावडगोंदीयापूर्वी स्थानिक स्थळांचा वापर करून संख्यावाचन केले जात होते. आता संख्या वाचनाचे इंग्रजी भाषांतर आले आहे. नवीन अभ्यासक्रमातील बदल तांत्रिक आहे. ७२ म्हणणे अथवा सात दोन म्हणणे यात काही फरक पडत नाही. यातून मुलांच्या गुणात्मक विकासात कोणता बदल होणार हे कळायला मार्ग नाही.- अनिल शिंदे, प्राचार्य, कला, वाणिज्य महाविद्यालय बल्लारपूरवीस-दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना आत्मसात करणे कठीण जाणार आहे. हा बदल करताना शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले नाही. गणिती कल्पकतेला चालना मिळेल, असे यात काहीच नाही. या बदलांचा मुख्य हेतू काय, हेही अद्याप स्पष्ट न झाल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम वाढू शकतो. या बदलाचा पूनर्विचार व्हायला हवा.- सुनील शेरकी, राष्ट्रमाता विद्यालय पोंभुर्णाबालभारतीने गणितातील संख्येबाबत नवीन संकल्पनेचा विचार केला. त्यानुसार पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. येत्या २६ जून रोजी शाळा सुरू असल्याने संख्या वाचनाविषयी घाईने बोलण्यात अर्थ नाही, असे मला वाटते. शिक्षकांनी नवीन पद्धतीनुसार शिकविल्यानंतर विद्यार्थी स्वीकारू अथवा गोंधळू शकतात. मात्र, शिकविण्यापूर्वीच हे दोन्ही निष्कर्ष काढणे अनाठायी आहे.- मंजुषा डंभारे, जि. प. शाळा बोर्डा (बो.)पारंपरिक पद्धतीनुसार अनेक पिढ्यांनी अंकवाचन शिकले आहे. त्यामुळे ही नवी पद्धत आणण्याचे कारण कळले नाही. अभ्यासक्रमात बदल व्हायलाच पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार दुर्लक्षित होऊ नये. शास्त्रशुद्ध भूमिका असावी. शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना अंमलात येत आहे. यात विद्यार्थ्यांचे अहित होऊ नये.के. डब्लू. धोटे, मुख्याध्याक जि. प. शाळा बाखर्डीगणिताच्या निर्मितीमागे संस्कृती लपली आहे. त्यामुळे असे प्रयोग करताना या पैलुचाही विचार केला पाहिजे. मराठीतील अनेक म्हणी गणिती भाषेतून आल्या आहेत. त्यामुळे मुलांवर पाश्चिमात्त्य विचार लादणे कदापि योग्य नाही. संख्या वाचनाचा बदल केवळ दुसरीसाठी झाला. तिसरी, चौथी व पाचवीत हा प्रकार नाही. त्यामुळे मुलांच्या आकलन क्षमतेत अडचणी येतील. भाषेची रसिकता संपेल. त्यामुळे बालभारतीने केलेला बदल गरजेचा वाटत नाही.- प्रकाश कुमरे, जि.प. शाळा वरवट

टॅग्स :Educationशिक्षण