शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

हा कोरोनाचा नव्हे, पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST

धनंजय महाडिक यांचा आरोप : निवडणुकीपेक्षा ठरावधारकांचा जीव महत्त्वाचा : ५० हून अधिक ठरावधारक बाधित लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर ...

धनंजय महाडिक यांचा आरोप : निवडणुकीपेक्षा ठरावधारकांचा जीव महत्त्वाचा : ५० हून अधिक ठरावधारक बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : डोणोलीचे सुभाष पाटील यांंचा मृत्यू हा कोरोनाचा नव्हे, तर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हट्टाचा बळी असल्याचा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीनिमित्त उमेदवार ठरावधारकांना भेटत असतात, त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निवडणूक आज होईल किंवा उद्या होईल; पण ठरावधारकांचा जीव महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महाडिक म्हणाले, कोरोनामुळे ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. निवडणूक होण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या काही संस्था न्यायालयात पाठविल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक स्थगित करण्यात यावी, असा काही ठरावधारकांचा प्रयत्न होता. उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाला दिले होते. मात्र, मंत्री पाटील यांनी कोल्हापुरात कोरोनाची परिस्थिती कमी आहे, तसेच योग्य काळजी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडू, असा हट्ट केल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. राज्यातील ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे, मग ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्यासाठी पालकमंत्र्यांचा हट्ट का? सध्या ‘गोकुळ’चे ५० ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मनुष्य हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.