शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ठोस सुगावा नाही; तपास योग्य दिशेने

By admin | Updated: March 5, 2015 00:48 IST

पानसरे हत्या प्रकरण : पोलीस महासंचालकांची कबुली

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शोध सुरू आहे; परंतु आजअखेर याप्रकरणी पोलिसांना कोणताही ठोस सुगावा हाती लागलेला नाही, अशी कबुली राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही नक्कीच हल्लेखोरांपर्यंत पोहोचू, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यास सतरा दिवस झाले; परंतु पोलिसांना याप्रकरणी कोणतीच ठोस माहिती लागलेली नाही. या प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी महासंचालक दयाळ मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात त्यांनी दोन तासांहून अधिक काळ तपासकामासाठी नियुक्त केलेल्या पथकांच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली व त्यानंतर यासंबंधीची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, तपास अधिकारी अंकित गोयल व एम. एम. मकानदार, आदी उपस्थित होते.दयाळ म्हणाले, ‘कोणत्याही घटनेत तपासाच्या दृष्टीने प्रत्यक्षदर्शी पुरावा हा सगळ््यात महत्त्वाचा दुवा असतो. पानसरे हल्ला प्रकरणात आम्ही त्यासाठी जिथे हल्ला झाला त्या परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांकडून काहीतरी माहिती मिळविण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडून काहीच माहिती दिली जात नाही. ती का दिली जात नाही याचीही काही कारणे असू शकतील; परंतु ते लोक पोलिसांना माहिती देण्यास पुढे येण्यास तयार नाहीत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यावर हल्ला झाला त्या पानसरे यांचा जबाबही आमच्यादृष्टीने महत्त्वाचा होता. परंतु, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची जबाब घेण्यासारखी स्थिती नव्हती, नंतरही हा जबाब घेता आला नाही. हल्ला झाला तेव्हा त्यांच्यासोबत उमा पानसरे होत्या; परंतु त्यांना रुग्णालयातून कालच घरी जाऊ देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही हल्लेखोरासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यांचा अद्याप पुरेसा जबाबही घेता न आल्याने हल्लेखोरांसदर्भात एखादाही महत्त्वाचा सुगावा लागलेला नाही.’ याचा अर्थ आतापर्यंत तपासांत काहीच हाती लागलेले नाही, असे समजायचे का, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर महासंचालक दयाल म्हणाले, ‘आमचा तपास योग्य व ‘करेक्ट’ दिशेने सुरू आहे आणि आम्ही काही दिवसांत या प्रकरणाचा नक्कीच छडा लावू.’ सनातनी प्रवृत्तींबाबत...पानसरे यांच्यावरील हल्ला हा अन्य कोणत्याही कारणांपेक्षा तो सनातनी प्रवृत्तींकडूनच झाला असण्याची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त झाली आहे. त्याची पोलिसांनी काही दखल घेतली आहे का, असे विचारल्यावर दयाळ म्हणाले, ‘या हल्ल्याचा आम्ही सर्व अंगांनी तपास करीत आहोत. हल्ल्याचा कोणताही उद्देश (मोटिव्हेशन)आम्ही बेदखल केलेला नाही.’)महासंचालक का आले..?पानसरे यांच्यावरील हल्ल्यास तब्बल सोळा दिवस झाले तरी तपासात कोणतीच प्रगती नसल्याबध्दल मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. येत्या सोमवारपासून (दि.९) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. ११ मार्चला मुंबईत डाव्या पुरोगामी पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याने स्वत: पोलिस महासंचालक संजीव दयाल हेच घाईघाईने कोल्हापूरला आले.‘सीबीआय’ला तयारया हल्ल्याप्रकरणी तपासासाठी आम्ही आतापर्यंत २५ पथके स्थापन केली आहेत. पुणे व कोकण विभागातील अधिकाऱ्यांचीही मदत तर घेतली आहेच शिवाय परराज्यांतील पोलिसांचीही मदत आम्ही घेत आहोत. त्यामुळे खास तपास पथके(एसआयटी)आताही अस्तित्वात आहेत. याप्रकरणी कुणी सीबीआय चौकशीची मागणी केल्यास त्यासही आमचा विरोध नाही. कारण आम्हाला कोणतीच माहिती लपवायची नाही; परंतु यापूर्वीच्या दोन खूनप्रकरणात सीबीआय चौकशीचे पुढे काय झाले, हे आपल्या सगळ््यांना ज्ञात आहेच.