शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अशासकीय मंडळ जाणार !

By admin | Updated: November 4, 2014 00:24 IST

बाजार समितीचा ‘बाजार’ : मंडळाविरोधातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या अशासकीय मंडळाचा फैसला चार दिवसांत होणार आहे. याबाबत कृष्णात पोवार व भीमराव पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी, (दि. ७) सुनावणी होणार आहे. ‘नेर’ बाजार समितीबाबत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकाल पाहता नेमलेल्या अशासकीय मंडळाचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. पणन संचालकांनी ७ आॅगस्ट २०१४ ला बाजार समितीचे प्रशासक डॉ. महेश कदम यांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली. राजकीय मंडळींनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी अशासकीय मंडळ आणले, पण त्याला जनतेतूनच जोरदार विरोध झाला. कोल्हापूर बाजार समितीसाठी १५ जणांचे जम्बो मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर अशासकीय मंडळाची शेपूट दिवसेंदिवस वाढत जात १९ पर्यंत पोहोचली. त्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झाले. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पोवार व भीमराव पाटील यांनी पणन संचालक यांच्याकडे अशासकीय मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी केली. तोपर्यंत पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्या मागेच चौकशीचा ससेमिरा लागल्याने गेले दीड महिने या प्रक्रियेत गेले. परिणामी यावरील सुनावणी होऊ शकली नाही. ‘मॅट’चा निकाल व त्यानंतर न्यायालयीन लढाई लढत डॉ. माने हे पणन संचालक म्हणून पुन्हा कार्यरत झाले. पोवार व भीमराव पाटील यांच्या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मुळात डॉ. माने यांचा अशा प्रकारच्या अशासकीय मंडळ नियुक्तीला विरोध आहे. त्यामुळे ते या मंडळाला झटका देण्याची शक्यता दाट आहे. त्यात अशासकीय मंडळाविरोधात बाजार समितीचे माजी सभापती बाबगोंड पाटील यांची देखील उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. ‘नेर’ बाजार समिती मधील अशासकीय मंडळाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाची प्रत बाबगोंड पाटील यांनी याचिकेसोबत जोडल्याने अशासकीय मंडळाच्या डोक्यावर बरखास्तीची टांगती तलवार कायम आहे. याची सुनावणी ११ नोव्हेंबरला आहे.( प्रतिनिधी)रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत नरमाई..न्यायालयाने रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही अशासकीय मंडळाने कारवाई केलेली नाही. याविरोधात गेले महिनाभर याचिकाकर्ते अवमान याचिका दाखल करण्याची नुसती भाषाच करत असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका दाखल करू नये, यासाठी तडजोडी सुरू झाल्या असून, जिल्ह्यातील बड्या राजकीय मंडळींनी यात लक्ष घातल्याने याचिकाकर्तेही नरमल्याचे समजते. कोल्हापूर बाजार समितीच्या अशासकीय मंडळाबाबत आपल्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्याची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. -डॉ. सुभाष माने, (पणन संचालक,पुणे)