शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

हातकणंगलेत एकही गाव शेततळ्यास पात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 23:35 IST

जाचक अटींचा परिणाम : योजना फसवी असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रया

दत्ता बीडकर -- हातकणंगले -शेततळ्यासाठी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारीची अट शासनाने घातली आहे. ज्या गावांमध्ये मागील पाच वर्षांत टँकरने पाणीपुरवठा झाला आहे त्या गावांचा शेततळ्यामध्ये समावेश आणि ज्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली आहे त्यांना प्राधान्य अशा जाचक अटींमुळे हातकणंगले तालुक्यातील एकाही गावाचा समावेश शेततळ्यासाठी झाला नसल्याने शासनाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना फसवी असल्याची संतप्त प्रतिक्रया तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांमध्ये यावर्र्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. पाऊस नसल्याने खरीप आणि रब्बी पीक हंगामावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. ओढे विहिरी कोरड्या पडल्यामुळे यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कधी नव्हे ते यावर्षी प्रथमच पंचगंगा नदीवर पाणी उपसा बंदी लागू केल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा स्थितीमध्ये शासनाने तालुक्याला टंचाई अंतर्गत एक रुपयाचा निधी दिला नसल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्याची अवस्था दयनीय झाली आहे.शासनाने मागेल त्याला शेततळेची घोषणा केली आहे; मात्र याला तितक्याच जाचक अटी घातल्या आहेत. ज्या गावांची पीक आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. तसेच ज्या गावांमध्ये एखाद्या कुटुंबातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा शेतकऱ्याला शेततळे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा झाला आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. वरील एकाही नियमामध्ये हातकणंगले तालुका बसत नसल्याने तालुक्यातील ६२ गावांमध्ये एकही शेततळे मंजूर झाले नाही. मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना फसवणूक करणारी असल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.हातकणंगले तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही एकाही गावाची पीक आणेवारी महसूल विभागाने ५० पैसे पेक्षा कमी केलेली नाही. शासनाच्या कोणत्याही नियम व निकषाला तालुका पात्र ठरत नाही. शासनाने नुकतीच एक घोषणा केली आहे. मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकरी वर्गाच्या डोळ्यांत धूळ फेक करणारी आहे.