शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हातकणंगलेत एकही गाव शेततळ्यास पात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 23:35 IST

जाचक अटींचा परिणाम : योजना फसवी असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रया

दत्ता बीडकर -- हातकणंगले -शेततळ्यासाठी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारीची अट शासनाने घातली आहे. ज्या गावांमध्ये मागील पाच वर्षांत टँकरने पाणीपुरवठा झाला आहे त्या गावांचा शेततळ्यामध्ये समावेश आणि ज्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली आहे त्यांना प्राधान्य अशा जाचक अटींमुळे हातकणंगले तालुक्यातील एकाही गावाचा समावेश शेततळ्यासाठी झाला नसल्याने शासनाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना फसवी असल्याची संतप्त प्रतिक्रया तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांमध्ये यावर्र्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. पाऊस नसल्याने खरीप आणि रब्बी पीक हंगामावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. ओढे विहिरी कोरड्या पडल्यामुळे यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कधी नव्हे ते यावर्षी प्रथमच पंचगंगा नदीवर पाणी उपसा बंदी लागू केल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा स्थितीमध्ये शासनाने तालुक्याला टंचाई अंतर्गत एक रुपयाचा निधी दिला नसल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्याची अवस्था दयनीय झाली आहे.शासनाने मागेल त्याला शेततळेची घोषणा केली आहे; मात्र याला तितक्याच जाचक अटी घातल्या आहेत. ज्या गावांची पीक आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. तसेच ज्या गावांमध्ये एखाद्या कुटुंबातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा शेतकऱ्याला शेततळे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा झाला आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. वरील एकाही नियमामध्ये हातकणंगले तालुका बसत नसल्याने तालुक्यातील ६२ गावांमध्ये एकही शेततळे मंजूर झाले नाही. मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना फसवणूक करणारी असल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.हातकणंगले तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही एकाही गावाची पीक आणेवारी महसूल विभागाने ५० पैसे पेक्षा कमी केलेली नाही. शासनाच्या कोणत्याही नियम व निकषाला तालुका पात्र ठरत नाही. शासनाने नुकतीच एक घोषणा केली आहे. मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकरी वर्गाच्या डोळ्यांत धूळ फेक करणारी आहे.