शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची ‘कल’ नव्हे, तर ‘कळ’ चाचणी, शिक्षक, पालकांच्या प्रतिक्रिया ; विविध समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:22 IST

दहावीच्या विद्यार्थ्यांची यावर्षी मोबाईलद्वारे कलमापन चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, मिळत नसलेले नेटवर्क, अद्ययावत स्वरूपातील मोबाईल हॅँडसेटची कमतरता अशा समस्यांमुळे संबंधित कलचाचणी ही एक प्रकारे ‘कळ’ देणारी चाचणी ठरत असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शिक्षकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदहावीची ‘कल’ नव्हे, तर ‘कळ’ चाचणीशिक्षक, पालकांच्या प्रतिक्रिया ; विविध समस्या

संतोष मिठारीकोल्हापूर : दहावीच्या विद्यार्थ्यांची यावर्षी मोबाईलद्वारे कलमापन चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, मिळत नसलेले नेटवर्क, अद्ययावत स्वरूपातील मोबाईल हॅँडसेटची कमतरता अशा समस्यांमुळे संबंधित कलचाचणी ही एक प्रकारे ‘कळ’ देणारी चाचणी ठरत असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शिक्षकांतून व्यक्त होत आहे.शासनाने यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी अँड्रॉईड मोबाईलद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. चाचणी प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू झाली असून दि. २० जानेवारीपर्यंत ती चालणार आहे. पण, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मोबाईल उपलब्ध कसे करायचे असा प्रश्न भेडसावत आहे.

या चाचणीसाठी एका विद्यार्थ्यासाठी किमान ७५ मिनिटांचा वेळ लागत असल्याने वर्गशिक्षक, विषयशिक्षकांचा अधिक वेळ खर्च होत आहे. चाचणीसाठी ४.७ इंचांपेक्षा अधिक लांबीचा मोबाईल वापरणे आवश्यक असल्याने ते उपलब्ध करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

ग्रामीण भागामधील शिक्षक, विद्यार्थ्यांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात पहिले म्हणजे नेटवर्क मिळत नसल्याची समस्या आहे. त्यासह अत्याधुनिक आवृत्तीच्या मोबाईल हॅँडसेटची कमतरता, बॅटरी क्षमता यांचा समावेश आहे.

संगणकावर चाचणी घेणे योग्यया चाचणीमध्ये १५० प्रश्नांची उत्तरे देण्यासह अभिक्षमता चाचणीसाठी किमान ७५ मिनिटे लागतात. मोबाईल हॅँडसेटच्या माध्यमातून चाचणी देताना काळजी घ्यावी लागते. संगणकावर चाचणी घेण्याच्या तुलनेत या प्रक्रियेत अधिक वेळ खर्च होतो. त्यामुळे संगणकावर चाचणी घेणे योग्य असल्याचे मत शिक्षकांतून व्यक्त होत असल्याचे कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक यांनी सांगितले.

ते म्हणाले, काही शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून अद्ययावत आवृत्तीचा मोबाईल चाचणीसाठी आणण्याची सक्ती केली आहे. त्याबाबत पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही करताना ग्रामीण भागातील शिक्षकांना त्रास होत आहे. त्यामुळे ही कलचाचणी या शिक्षकांसाठी ‘कळ’देणारी चाचणी ठरत आहे. हा त्रास टाळण्यासाठी कलचाचणी पूर्वीप्रमाणे आॅफलाईन पद्धतीने पेपरच्या माध्यमातून अथवा संगणकावर घेण्यात यावी.

आॅफलाईनची सुविधा उपलब्धही चाचणी घेण्यात मोबाईलसाठी नेटवर्क उपलब्धतेची कोणतेही अडचण नाही. कारण, आॅफलाईन पद्धतीने चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोल्हापूर विभागात चाचणीची प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू आहे. त्याबाबत कोणतेही शिक्षक अथवा त्यांच्या संघटनांकडून लेखी स्वरूपात तक्रार शिक्षण मंडळाला प्राप्त झालेली नाही, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी सांगितले.

वर्गातील सर्व मुलांची एकाचवेळी कलचाचणी घेतल्यामुळे वर्गामध्ये गोंधळ निर्माण झाला. दोन शिक्षक कलचाचणीच्या कामात व्यस्त राहिल्यामुळे बाकीचे वर्ग रिकामे पडू लागले आहेत.-दत्तात्रय चौगुले, कला शिक्षक, वाय. बी. पाटील विद्यालय.

 

मोबाईलद्वारे कलचाचणीमध्ये उद्दिष्ट साध्य होत असले, तरी ही प्रक्रिया वेळखाऊ आणि शिक्षक, पालकांच्या आर्थिकतेशी निगडीत आहे. यासाठी शिक्षकांना त्या अटीशी सुसंगत मोबाईल घ्यावा लागला. पालकांनाही तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागली. शिवाय दिवसभर विद्यार्थ्यांच्या हाती असणारा मोबाईल आणि त्याची सुरक्षितता यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पूर्वीप्रमाणेच संगणकीय प्रणालीवर आधारित कलचाचणी झाल्यास पालकांचा नाहक त्रास वाचेल.-संजय सौंदलगे, पालक. 

मोबाईलद्वारे कलचाचणी घेताना अ‍ॅण्ड्राईड मोबाईल, चार्जिंग आणि नेटवर्क नाही अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. काही शिक्षक, कर्मचाऱ्यांनी स्वत:चे मोबाईल देऊ सहकार्य करून कलचाचणी कशी-बशी पार पाडली. काही विद्यार्थी चाचणी सुरू असतानाच सेल्फी टिपत होते.-आय. एम. गायकवाड, मुख्याध्यापक, पन्हाळा.

कलमापन चाचणी घेताना विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास देणे कितपत योग्य आहे हा एक प्रश्न आहे. राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे वाढवायचे, कलमापन करायचे हा काय गोंधळ? त्यापेक्षा अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्यात यावे.-दत्ता पाटील, सचिव, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर