शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

ना वर्गणी, ना थाटमाट, यंदाचा गणेशोत्सव आरोग्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST

कोल्हापूर : आधी महापूर आणि गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी सलग तिसऱ्या ...

कोल्हापूर : आधी महापूर आणि गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी सलग तिसऱ्या वर्षी आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी मागणार नाही, थाटमाट आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिर, लसीकरण, कोरोना योद्ध्यांचा सन्मान अशा आरोग्यदायी उपक्रमांवर भर देण्याचा निर्धार मंडळांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने मंगळवारी गणेशोत्सव साधेपणाने व कोरोना निर्बंधांचे पालन करत करण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गणेश मंडळांचे नियोजन काय असणार आहे हे ‘लोकमतच्या’वतीने जाणून घेण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या रूपातील आकर्षक गणेशमूर्ती, सजीव आणि तांत्रिक देखावे हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्ये. मात्र, २०१९ मध्ये महापूर आणि गेल्या वर्षी कोरोनामुळे कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालेला नाही. आता तिसऱ्या वर्षीही अजून जिल्ह्याला कोरोनाचा विळखा आहे. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे व्यवसाय, पर्यटन असे सगळे व्यवहार बंद असल्याने नागरिकांची क्रयशक्ती कमी होऊन आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

या सामाजिक आणि आर्थिक अडचणींच्या काळात तरुण मंडळांनी कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांकडे वर्गणी मागितली जाणार नाही. तसेच गणेशमूर्तीची उंची ४ फुटांच्या आत असणार असून, मांडवात केवळ धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत.

--

काेरोनामुळे आता सामाजिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे यावर्षी वर्गणी मागणार नाही. कार्यकर्त्यांच्यावतीनेच जो काही निधी गोळा होईल त्यातच उत्सव साजरा केला जाईल. मंडळाचा देखावा असणार नाही. लहान मांडवात देवाचे धार्मिक विधी पाडले जातील. गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.

-कपिल चव्हाण, राधाकृष्ण तरुण मंडळ

--

मंडळाकडून गेली तीन वर्षे गणेशोत्सव साजरा झालेला नाही. या वेळी कार्यकर्त्यांची इच्छा खूप होती. मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा; पण शासनाने घालून दिलेल्या निर्णयानुसार उत्सव होईल. शिवाय दोन महिन्यांनंतर शहरात कोरोनाची काय स्थिती असेल यावर सगळं अवलंबून असणार आहे.

-गजानन यादव, लेटेस्ट तरुण मंडळ

-

गणेशोत्सवासाठी आम्ही कधीच वर्गणी गोळा करत नाही. आता तर कोरोनाचे संकट आहे. गेल्यावर्षी आम्ही कोरोना योद्ध्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर असे उपक्रम घेतले होते. यंदा लसीकरणासाठी प्रयत्न करत आहाेत.

-गणेश पाटील, डांगे गल्ली तरुण मंडळ

--

सण, उत्सवांवर अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे शासनाने आता सगळे व्यवहार व मंदिरे सुरू करावीत. तसेच उत्सवांवर फार बंधने घालू नयेत. कोरोनाच्या धर्तीवर सगळ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहेच; पण त्याचा अतिरेक होऊ नये अशी अपेक्षा आहे.

-अजित सासणे, संभाजीनगर तरुण मंडळ

---