शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ना वर्गणी, ना थाटमाट, यंदाचा गणेशोत्सव आरोग्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST

कोल्हापूर : आधी महापूर आणि गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी सलग तिसऱ्या ...

कोल्हापूर : आधी महापूर आणि गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी सलग तिसऱ्या वर्षी आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी मागणार नाही, थाटमाट आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिर, लसीकरण, कोरोना योद्ध्यांचा सन्मान अशा आरोग्यदायी उपक्रमांवर भर देण्याचा निर्धार मंडळांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने मंगळवारी गणेशोत्सव साधेपणाने व कोरोना निर्बंधांचे पालन करत करण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गणेश मंडळांचे नियोजन काय असणार आहे हे ‘लोकमतच्या’वतीने जाणून घेण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या रूपातील आकर्षक गणेशमूर्ती, सजीव आणि तांत्रिक देखावे हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्ये. मात्र, २०१९ मध्ये महापूर आणि गेल्या वर्षी कोरोनामुळे कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालेला नाही. आता तिसऱ्या वर्षीही अजून जिल्ह्याला कोरोनाचा विळखा आहे. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे व्यवसाय, पर्यटन असे सगळे व्यवहार बंद असल्याने नागरिकांची क्रयशक्ती कमी होऊन आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

या सामाजिक आणि आर्थिक अडचणींच्या काळात तरुण मंडळांनी कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांकडे वर्गणी मागितली जाणार नाही. तसेच गणेशमूर्तीची उंची ४ फुटांच्या आत असणार असून, मांडवात केवळ धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत.

--

काेरोनामुळे आता सामाजिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे यावर्षी वर्गणी मागणार नाही. कार्यकर्त्यांच्यावतीनेच जो काही निधी गोळा होईल त्यातच उत्सव साजरा केला जाईल. मंडळाचा देखावा असणार नाही. लहान मांडवात देवाचे धार्मिक विधी पाडले जातील. गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.

-कपिल चव्हाण, राधाकृष्ण तरुण मंडळ

--

मंडळाकडून गेली तीन वर्षे गणेशोत्सव साजरा झालेला नाही. या वेळी कार्यकर्त्यांची इच्छा खूप होती. मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा; पण शासनाने घालून दिलेल्या निर्णयानुसार उत्सव होईल. शिवाय दोन महिन्यांनंतर शहरात कोरोनाची काय स्थिती असेल यावर सगळं अवलंबून असणार आहे.

-गजानन यादव, लेटेस्ट तरुण मंडळ

-

गणेशोत्सवासाठी आम्ही कधीच वर्गणी गोळा करत नाही. आता तर कोरोनाचे संकट आहे. गेल्यावर्षी आम्ही कोरोना योद्ध्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर असे उपक्रम घेतले होते. यंदा लसीकरणासाठी प्रयत्न करत आहाेत.

-गणेश पाटील, डांगे गल्ली तरुण मंडळ

--

सण, उत्सवांवर अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे शासनाने आता सगळे व्यवहार व मंदिरे सुरू करावीत. तसेच उत्सवांवर फार बंधने घालू नयेत. कोरोनाच्या धर्तीवर सगळ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहेच; पण त्याचा अतिरेक होऊ नये अशी अपेक्षा आहे.

-अजित सासणे, संभाजीनगर तरुण मंडळ

---