शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या कारभाराशी संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराशिवडे : ‘भोगावती’मध्ये पुढीलवर्षी एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मागील वर्षीच्या कारभाराशी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातील एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी पुन्हा कर्ज काढले, तर भोगावती पुन्हा आर्थिक डबघाईला जाईल, अशी भीती ‘भोगावती’चे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कराशिवडे : ‘भोगावती’मध्ये पुढीलवर्षी एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मागील वर्षीच्या कारभाराशी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातील एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी पुन्हा कर्ज काढले, तर भोगावती पुन्हा आर्थिक डबघाईला जाईल, अशी भीती ‘भोगावती’चे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी ६१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.आपल्या प्रास्ताविक भाषणात ते म्हणाले, कारखान्यावर २११ कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज आहे. आमचा कारभार पारदर्शक व काटकसरीने चालू आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत आम्ही ५५ ते ६० टक्के कमी दराने खरेदी केली आहे. सध्या आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कारखान्यावर एक रुपयांचा खर्च न टाकता सहवीज प्रकल्प ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर उभारणार आहोत. यावर्षी ऊस विकासाला चालना देणारा असून संचालक मंडळाचे ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सभासद व परिसरातील सर्व शेतकºयांनी आपल्या शेतातील संपूर्ण ऊस भोगावतीस पाठवावा तरच आम्हाला जास्तीत जास्त ऊस दर देणे शक्य होईल, असे स्पष्ट केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील यांनी गत हंगामातील उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत आणखी ३०० रुपये जादा दर देण्याची मागणी केली. तीच मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, आण्णाप्पा चौगले, टी आर पाटील, बाबूराव कोथळकर यांनी लावून धरली. त्यांचा हाच धागा पकडून कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) यांनीही ३०० रुपयांच्या मागणीचा पुनरुच्चारर केला. प्रशासकांच्या १३ महिन्यांच्या काळातील निर्णयांना जबाबदार कोण? असा जाब त्यांनी विचारला. त्यावर बोलताना माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांनी कारखान्यावर कर्ज नव्हते म्हणणाºयांनी श्वेतपत्रिका काढावी कर्जाचा आकडा २५० कोटींच्या खाली आला तर जाहीर माफी मागतो, असे जाहीर आव्हान माजी चेअरमन यांना दिले. त्यानंतर विद्यमान चेअरमन यांनीच श्वेतपत्रिका काढण्याची सूचना माजी चेअरमन यांनी मांडली. त्याबाबत बोलताना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी त्या कारभाराला प्रशासकाबरोबरच माजी चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले.विषयपत्रिका वाचन कार्यकारी संचालक अनंत निकम व मागील सभेचा इतिवृतांत वाचन कार्यालयीन प्रमुख बळीराम पाटील यांनी केले. सभेतील चर्चेत माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील, माजी संचालक विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, संतोष पोर्लेकर, सुरेश कुसाळे, निवास डकरे, भिवाजी पाटील, लहुजी कुसाळे, एकनाथ भोसले, बी. जी. खांडेकर, सदाशिव खडके आदींनी सहभाग घेतला. सभेला उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, सर्व आजी माजी संचालक मंडळ, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे व उदय पाटील सडोलीकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील सडोलीकर, कारखान्याचे माजी चेअरमन संभाजीराव पाटील-सडोलीकर, माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, रघुनाथ जाधव, नामदेव पाटील, हंबिरराव पाटील, एम. आर. पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, राधानगरीचे उपसभापती रविश पाटील- कौलवकर, करवीरचे उपसभापती विजय भोसले, आदी उपस्थित होते.मिशी आणि खरकटे !‘भोगावती’च्या वाताहतीला विस्तारवाढीपासून सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कारभाºयांनी कारखान्यातील भ्रष्टाचाराचे खरकटे मिशीला लागले नसल्याचे जाहीर करावे, असे आव्हान स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील दिले. त्यावर बोलताना आजपर्यंतच्या काळात माझ्या मिशीला खरकटे लागू दिले नसून, पाच वर्षांच्या काळात ही खरकटे लागू देणार नसल्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले.