शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या कारभाराशी संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराशिवडे : ‘भोगावती’मध्ये पुढीलवर्षी एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मागील वर्षीच्या कारभाराशी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातील एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी पुन्हा कर्ज काढले, तर भोगावती पुन्हा आर्थिक डबघाईला जाईल, अशी भीती ‘भोगावती’चे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कराशिवडे : ‘भोगावती’मध्ये पुढीलवर्षी एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मागील वर्षीच्या कारभाराशी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातील एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी पुन्हा कर्ज काढले, तर भोगावती पुन्हा आर्थिक डबघाईला जाईल, अशी भीती ‘भोगावती’चे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी ६१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.आपल्या प्रास्ताविक भाषणात ते म्हणाले, कारखान्यावर २११ कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज आहे. आमचा कारभार पारदर्शक व काटकसरीने चालू आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत आम्ही ५५ ते ६० टक्के कमी दराने खरेदी केली आहे. सध्या आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कारखान्यावर एक रुपयांचा खर्च न टाकता सहवीज प्रकल्प ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर उभारणार आहोत. यावर्षी ऊस विकासाला चालना देणारा असून संचालक मंडळाचे ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सभासद व परिसरातील सर्व शेतकºयांनी आपल्या शेतातील संपूर्ण ऊस भोगावतीस पाठवावा तरच आम्हाला जास्तीत जास्त ऊस दर देणे शक्य होईल, असे स्पष्ट केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील यांनी गत हंगामातील उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत आणखी ३०० रुपये जादा दर देण्याची मागणी केली. तीच मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, आण्णाप्पा चौगले, टी आर पाटील, बाबूराव कोथळकर यांनी लावून धरली. त्यांचा हाच धागा पकडून कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) यांनीही ३०० रुपयांच्या मागणीचा पुनरुच्चारर केला. प्रशासकांच्या १३ महिन्यांच्या काळातील निर्णयांना जबाबदार कोण? असा जाब त्यांनी विचारला. त्यावर बोलताना माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांनी कारखान्यावर कर्ज नव्हते म्हणणाºयांनी श्वेतपत्रिका काढावी कर्जाचा आकडा २५० कोटींच्या खाली आला तर जाहीर माफी मागतो, असे जाहीर आव्हान माजी चेअरमन यांना दिले. त्यानंतर विद्यमान चेअरमन यांनीच श्वेतपत्रिका काढण्याची सूचना माजी चेअरमन यांनी मांडली. त्याबाबत बोलताना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी त्या कारभाराला प्रशासकाबरोबरच माजी चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले.विषयपत्रिका वाचन कार्यकारी संचालक अनंत निकम व मागील सभेचा इतिवृतांत वाचन कार्यालयीन प्रमुख बळीराम पाटील यांनी केले. सभेतील चर्चेत माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील, माजी संचालक विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, संतोष पोर्लेकर, सुरेश कुसाळे, निवास डकरे, भिवाजी पाटील, लहुजी कुसाळे, एकनाथ भोसले, बी. जी. खांडेकर, सदाशिव खडके आदींनी सहभाग घेतला. सभेला उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, सर्व आजी माजी संचालक मंडळ, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे व उदय पाटील सडोलीकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील सडोलीकर, कारखान्याचे माजी चेअरमन संभाजीराव पाटील-सडोलीकर, माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, रघुनाथ जाधव, नामदेव पाटील, हंबिरराव पाटील, एम. आर. पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, राधानगरीचे उपसभापती रविश पाटील- कौलवकर, करवीरचे उपसभापती विजय भोसले, आदी उपस्थित होते.मिशी आणि खरकटे !‘भोगावती’च्या वाताहतीला विस्तारवाढीपासून सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कारभाºयांनी कारखान्यातील भ्रष्टाचाराचे खरकटे मिशीला लागले नसल्याचे जाहीर करावे, असे आव्हान स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील दिले. त्यावर बोलताना आजपर्यंतच्या काळात माझ्या मिशीला खरकटे लागू दिले नसून, पाच वर्षांच्या काळात ही खरकटे लागू देणार नसल्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले.