शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

निधीच नाही, बालसंगोपन कसे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST

कोल्हापूर : अनाथ निराधार, एकच पालक किंवा दुर्धर आजारग्रस्त किंवा कैदी असलेल्या पालकांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेतील गेल्या ...

कोल्हापूर : अनाथ निराधार, एकच पालक किंवा दुर्धर आजारग्रस्त किंवा कैदी असलेल्या पालकांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेतील गेल्या सहा महिन्यांचे अनुदान बालकांना मिळालेले नाही. आधीच्याच लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नसताना या योजनेत आता कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या बालकांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पालकांचे निधन झालेल्या बालकांसाठीच ही तरतूद असल्याने एक पालक आणि ती आई असेल तर मुलांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न यात अनुत्तरीतच आहे.

कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या बालकांसाठी राज्य शासनाने बालसंगोपन योजनेतून ५ लाख रुपये ठेव ठेवण्याचा व त्यांच्या संगोपनाचा खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेतील या पूर्वीच्याच लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मुलांची वाताहत होवू नये म्हणून शासनाने बालसंगोपन योजना सुरू केली होती. त्याची व्याप्ती वाढवत यात अनाथ, निराधार बालके, एकच पालक असलेली बालके, किंवा पालक दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत अशा कुटुंबातील लहान मुलांचाही या योजनेत समावेश करण्यात आला. या योजनेतील लाभार्थी बालकांनाच सहा सहा महिने अनुदानाची रक्कम मिळत नाही, त्यात आता कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या बालकांचा समावेश केला आहे.

---

योजनेतील लाभार्थी बालके

२०२०-२१ : १२२ अर्ज : ३ लाख २० हजार अनुदान मंजूर

२०२१-२२ : १४० अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित

---

योजनेतील त्रुटी

-उत्पन्नाचा नियमच नाही : उत्पन्नाचा निकष नसल्याने अत्यंत सधन कुटुंबातील बालकांसाठीदेखील योजनेत प्रस्ताव आले आहेत. खऱ्या गरजू बालकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवायचा असेल तर उत्पन्नाची मर्यादा घालून देणे गरजेचे आहे.

-लाभ वेळेवर न मिळणे : या योजनेचे अनुदान सहा-सहा महिने मिळत नाही, शासनाकडून निधी येईल त्याप्रमाणे वाटप होते.

--

कोणाला मिळणार लाभ?

एखाद्या बालकाच्या एका पालकाचे निधन अन्य कोणत्याही आजाराने झाले असेल व आता कोरोनाने दुसऱ्याही पालकाचे निधन झाले असेल, किंवा दोन्ही पालकांचे कोरोनाने निधन झाले असेल अशा बालकांना या योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.

---

आईने काय करायचे?

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार एका पालकाचा मृत्यू झालेल्या मुलांची संख्या १७५ इतकी असून त्यापैकी १४३ मुलांच्या वडिलांचे निधन झाले आहे. यात दोन महिन्यांच्या बालकापासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. कुटूंबाची जबाबदारी एकट्या महिलेवर आली आहे, अशा कुटुंबांचा या योजनेत विचार झालेला नाही.

---

कोरोनामुळे बालसंगोपनचा सहा महिन्यांचा निधी आलेला नव्हता आता तो मिळाला असून तो खात्यावर वर्ग करणे बाकी आहे. या वर्षाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

आशिष पुंडपळ ( विधी सल्लागार)

---