शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

भीती मोडलीच..ना सॅनिटायझेशन, ना दारावर स्टीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर गेल्या वर्षी एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेची यंत्रणा त्या भागात ...

कोल्हापूर गेल्या वर्षी एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेची यंत्रणा त्या भागात दाखल होत होती. सॅनिटायझेशन केले जात होते. काठ्या लावून तो परिसर बंदिस्त केला जात होता. संबंधिताच्या घरावर स्टीकर लावले जात होते. पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार केली जात होती. पीपीई किटमधून आलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी ही माहिती गोळा करून तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला सुरुवात होत होती; परंतु आता यातील फारसे काही होतच नाही. प्रशासन आणि आरोग्य विभाग शिथिल झाल्यामुळे नागरिकही बेताल झाल्याचे चित्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. पुन्हा पूर्वीसारखी कडक अंमलबजावणी केली नाही आणि घरात रुग्ण ठेवण्यावर बंधने आणली नाही तर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही स्थिती नियंत्रणात आहे; परंतु त्याआड जे काही चाललं आहे त्यामध्ये सुधारणा झाली नाही तर मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात कशा पद्धतीने सध्या ‘आवो जावो घर तुम्हारा’ चालले आहे, याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे....

१. हे आहेत प्रशासनातील एका महत्त्वाच्या खात्यातील अधिकारी. त्यांनी बुधवारी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब चाचणी केली. गुरुवारी त्यांचा स्वॅब पाॅझिटिव्ह आला. त्यांनी याबाबत अपार्टमेंटमधील कुणालाही कल्पना दिली नाही. ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. घरातून त्यांना डबा जातो. त्यांच्या घरात धुण्या, भांड्यासाठी येणारी कामवाली बाई इतर घरातही जाते. इकडे ना महापालिकेचे कुणी आले, ना कुणी दारावर स्टीकर लावले.

२. या महिला आहेत निमशासकीय कर्मचारी. पन्हाळा तालुक्यातील खेडेगावात त्या राहतात. रविवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘अहवाल पॉझिटिव्ह येवू दे; परंतु तुम्ही या चाचण्या करून या.’’ त्या पॉझिटिव्ह आलेल्या महिला कर्मचारी चाचण्या करण्यासाठी खेडेगावातून कोल्हापुरात लॅबमध्ये येवून बसल्या.

३. नृसिंहवाडीत एकाच घरातील ११ जण पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच सांगितले. पहिल्या आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णानंतर तेथील यंत्रणा सक्रिय झाली नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

चौकट

भीती दाखवू नका, पण

गेल्यावर्षीसारखा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर सायरन वाजवत रुग्णवाहिका येत होत्या. त्याला घेऊन जात होत्या. यातील आता काहीच होत नाही. एवढी भीती दाखवायची गरज नाही; परंतु एखाद्या घरातील, अपार्टमेंटमधील नागरिक पॉझिटिव्ह आला असेल तर ते किमान कळत होते. नागरिक काळजी घेत होते. आता यातील काहीच होत नाही. भीती दाखवू नका; पण कुठे कोण पॉझिटिव्ह आले ते कळले तर किमान इतर लोक दक्षता घेतील.

चौकट

पुण्याची पुनरावृत्ती कोल्हापुरात नको

पुण्यात लक्षणे नसलेला रुग्ण घरातच ठेवण्यास परवानगी दिली गेली आणि शिस्त कोणीच पाळली नाही. परिणामी, आख्खेच्या आख्खे अपार्टमेंट पॉझिटिव्ह आल्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर शहरामध्ये इतके आणि उर्वरित बारा तालुक्यात इतके पॉझिटिव्ह नागरिक घरामध्ये वास्तव्यास आहेत. घरी वास्तव्यास असताना सगळीकडेच आवश्यक काळजी घेतलीच जाते असे नाही. त्यामुळे या पर्यायाबाबत फेरविचार करण्याची गरज आहे.