शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोल्हापूर जिल्ह्यात बिल नाही तर वीज नाही ‘महावितरण’चा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:24 IST

कोल्हापूर : मार्च महिन्यात एक कोटी ३४ लाखांवर आलेली थकबाकी सात महिन्यांत साडेबारा कोटींवर पोहोचल्याने महावितरण वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआदेशानुसार कर्मचाºयांना एकत्र करून त्यांचे मनोधैर्य उंचावून थकबाकी वसुलीचा निर्धार करण्यात वसुली करताना कोणाचीही गय होणार नाही. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांचे कनेक्शन तोडण्याचे आदेश

कोल्हापूर : मार्च महिन्यात एक कोटी ३४ लाखांवर आलेली थकबाकी सात महिन्यांत साडेबारा कोटींवर पोहोचल्याने महावितरण वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो कर्मचाºयांनी विद्युत भवन येथे एकत्र येऊन १५ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीतले साडेबारा कोटी रुपये वसूल करण्याचा निर्धार केला व ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश थकबाकीदारांना दिला.

मार्च २०१७ अखेर कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वर्गवारीतले २३ हजार ३७० ग्राहक थकबाकीत होते. त्यांच्याकडे १ कोटी ३४ लाख इतकी बाकी होती. मात्र, सात महिन्यांत थकबाकी व थकबाकीदार ग्राहकांची संख्या वाढली आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतले १ लाख ७५ हजार ३७९ ग्राहकांकडे १२ कोटी ५१ लाख ३३ हजार रुपये थकबाकी आहे. वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या आदेशानुसार कर्मचाºयांना एकत्र करून त्यांचे मनोधैर्य उंचावून थकबाकी वसुलीचा निर्धार करण्यात येत आहे.

अधिकारी-कर्मचाºयांची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. मंगळवारी मुख्य अभियंता किशोर परदेशी व अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांनी कर्मचाºयांना वसुलीसाठी मार्गदर्शन केले. वसुली करताना कोणाचीही गय होणार नाही. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांचे कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकार