शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नको कोरोना, लॉकडाऊन ... मुकाबला करा मास्क लावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनासारख्या जागतिक महामारीचा थरारक अनुभव घेतल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता कोरोनाची दुसरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनासारख्या जागतिक महामारीचा थरारक अनुभव घेतल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता कोरोनाची दुसरी लाट येईल का?, असा भीतीयुक्त प्रश्न उपस्थित झाला आहे. येणारे संकट कितीही मोठे असले तरी, सामूहिक प्रयत्नाद्वारे त्यावर मात करता येऊ शकते, हे मागच्या काही महिन्यात कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. म्हणूनच पुढील काळातही संभाव्य लाटेला परतवून लावण्यासाठी मास्क आणि शारीरिक अंतर राखून मात करण्यासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही.

संपूर्ण जगभर उच्छाद मांडलेल्या कोरोनाच्या विषाणूंनी कोल्हापूकरांवरदेखील अवकृपा केली. डोळ्यांनी न दिसणाऱ्या एका अज्ञात विषाणूने येथील जनतेला हैराण करून सोडले होते. एप्रिल २०२० मध्ये पहिली लाट आली, तेव्हा सगळेच अनभिज्ञ होते. काय करायचे, कारोनाचा कसा मुकाबला करायचा, हे ठरवेपर्यंत त्याने कोल्हापूरकरांना आपल्या कवेत घेतले. त्यामुळे सगळी यंत्रणा कोलमडून पडली.

पहिल्या थरारक अनुभवाला सामोरे गेल्यामुळे आता आपला शत्रू कोण आणि त्याच्याशी मुकाबला कसा करायचा, हे ज्ञात आहे. त्यामुळे बेफिकीर वागणे सोडून देऊन केवळ मास्क आणि शारीरिक अंतराने ही दुसरी लाट थोपवू शकतो. औषधापेक्षा किती तरी पटीने या दोन छोट्या गोष्टीत सामर्थ्य आहे. त्यामुळे कोरोना, लॉकडाऊन नको असेल, तर या दोन साध्या गोष्टींचा जबाबदारीने वापर केला, तर आपल्या जवळपासही कोरोना येणार नाही. तेव्हा मास्कसारखे शस्त्र छोटे असले तरी कोरोनाला भारी आहे, हे लक्षात असू द्या.

- कोरोनाचे एकूण रुग्ण - ५० हजार २०६

- बरे झालेले एकूण रुग्ण - ४८ हजार ३०९

- कोरोनाचे बळी - १७३७ व्यक्ती

कोरोनाचा धोका वाढतोय.....

कोल्हापूर शहरात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून लक्षात येत आहे. त्यामुळे जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसात रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. आठ दिवसात कसेबसे ४५ ते ५० कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते, तेथे आता मागच्या आठवड्यात (दि. १५ ते २२ फेब्रुवारी) १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ७३ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागापेक्षा शहराला धोका जास्त आहे.

प्रतिक्रिया -

१. मागच्या सहा महिन्यात प्रचंड हाल झाले, आता पुन्हा व्हायला नकोत. संसर्ग पुन्हा सुरू झाला तर अर्थचक्र थांबणार आहे. म्हणूनच धोका पत्करायला नको. मास्क हाच उपाय आहे.

- विद्याधर कुलकर्णी, कापूर उत्पादक.

२. संसर्ग रोखण्याकरिता लाॅकडाऊन करणे हा उपाय नाही, तर मास्क व शारीरिक अंतर राखणे हाच खरा उपाय आहे. नागरिकांनी पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे.

- नितीन पोवार, हॉटेल व्यावसायिक.

३. कोरोना गरीब - श्रीमंत भेदभाव करत नाही. कॉकडाऊन काळात गोरगरीब, कष्टकऱ्यांचे हाल होते. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल, तर सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे.

- लाडजी राऊळ, टायपिंग सेंटर चालक.