शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नको कोरोना, लॉकडाऊन ... मुकाबला करा मास्क लावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनासारख्या जागतिक महामारीचा थरारक अनुभव घेतल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता कोरोनाची दुसरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनासारख्या जागतिक महामारीचा थरारक अनुभव घेतल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता कोरोनाची दुसरी लाट येईल का?, असा भीतीयुक्त प्रश्न उपस्थित झाला आहे. येणारे संकट कितीही मोठे असले तरी, सामूहिक प्रयत्नाद्वारे त्यावर मात करता येऊ शकते, हे मागच्या काही महिन्यात कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. म्हणूनच पुढील काळातही संभाव्य लाटेला परतवून लावण्यासाठी मास्क आणि शारीरिक अंतर राखून मात करण्यासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही.

संपूर्ण जगभर उच्छाद मांडलेल्या कोरोनाच्या विषाणूंनी कोल्हापूकरांवरदेखील अवकृपा केली. डोळ्यांनी न दिसणाऱ्या एका अज्ञात विषाणूने येथील जनतेला हैराण करून सोडले होते. एप्रिल २०२० मध्ये पहिली लाट आली, तेव्हा सगळेच अनभिज्ञ होते. काय करायचे, कारोनाचा कसा मुकाबला करायचा, हे ठरवेपर्यंत त्याने कोल्हापूरकरांना आपल्या कवेत घेतले. त्यामुळे सगळी यंत्रणा कोलमडून पडली.

पहिल्या थरारक अनुभवाला सामोरे गेल्यामुळे आता आपला शत्रू कोण आणि त्याच्याशी मुकाबला कसा करायचा, हे ज्ञात आहे. त्यामुळे बेफिकीर वागणे सोडून देऊन केवळ मास्क आणि शारीरिक अंतराने ही दुसरी लाट थोपवू शकतो. औषधापेक्षा किती तरी पटीने या दोन छोट्या गोष्टीत सामर्थ्य आहे. त्यामुळे कोरोना, लॉकडाऊन नको असेल, तर या दोन साध्या गोष्टींचा जबाबदारीने वापर केला, तर आपल्या जवळपासही कोरोना येणार नाही. तेव्हा मास्कसारखे शस्त्र छोटे असले तरी कोरोनाला भारी आहे, हे लक्षात असू द्या.

- कोरोनाचे एकूण रुग्ण - ५० हजार २०६

- बरे झालेले एकूण रुग्ण - ४८ हजार ३०९

- कोरोनाचे बळी - १७३७ व्यक्ती

कोरोनाचा धोका वाढतोय.....

कोल्हापूर शहरात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून लक्षात येत आहे. त्यामुळे जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसात रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. आठ दिवसात कसेबसे ४५ ते ५० कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते, तेथे आता मागच्या आठवड्यात (दि. १५ ते २२ फेब्रुवारी) १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ७३ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागापेक्षा शहराला धोका जास्त आहे.

प्रतिक्रिया -

१. मागच्या सहा महिन्यात प्रचंड हाल झाले, आता पुन्हा व्हायला नकोत. संसर्ग पुन्हा सुरू झाला तर अर्थचक्र थांबणार आहे. म्हणूनच धोका पत्करायला नको. मास्क हाच उपाय आहे.

- विद्याधर कुलकर्णी, कापूर उत्पादक.

२. संसर्ग रोखण्याकरिता लाॅकडाऊन करणे हा उपाय नाही, तर मास्क व शारीरिक अंतर राखणे हाच खरा उपाय आहे. नागरिकांनी पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे.

- नितीन पोवार, हॉटेल व्यावसायिक.

३. कोरोना गरीब - श्रीमंत भेदभाव करत नाही. कॉकडाऊन काळात गोरगरीब, कष्टकऱ्यांचे हाल होते. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल, तर सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे.

- लाडजी राऊळ, टायपिंग सेंटर चालक.