शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

नितीन माने मोकळेच !

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

भ्रष्टाचार प्रकरण : चौकशी अहवाल बस्त्यात; शासनाकडून पुढे कारवाईच नाही

विश्वास पाटील - कोल्हापूर -ग्रामपंचायतींची कामे अन् ग्रामसेवकांच्या बदल्यांच्या टक्केवारीने हात ओले केल्याशिवाय कामच करीत नाहीत, असा सर्वसाधारण सभेत गंभीर आरोप झालेले जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नितीन माने यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही; कारण या प्रकरणाचा चौकशी अहवालच शासनाकडे धूळ खात पडला आहे. माने यांच्याकडे कोल्हापुरात बारा तालुक्यांचा कारभार होता. आता ते पुणे जिल्ह्णात याच पदावर असून, चौदा तालुक्यांचे ‘साहेब’ आहेत. त्यामुळे सदस्यांनी भरसभेत गैरव्यवहाराचे आरोप केले, चौकशी समिती नेमली, तिचा अहवालही आला; परंतु शासनानेच तो बेदखल केला असल्याचे या प्रकरणात दिसत आहे. ग्रामपंचायत विभागाशी संलग्न असलेल्या ‘जलस्वराज्य’ व ‘स्वच्छ भारत मिशन’ विभागांतील काही कर्मचाऱ्यांची चौकशी आता जिल्हा परिषदेने सुरू केली आहे; परंतु माने यांच्यावर आरोप होऊन तब्बल नऊ महिने होत आले तरी त्याचे काहीच झालेले नाही. ज्यांच्यावर आरोप झाले ते निवांत व कंत्राटी कर्मचारी मात्र चौकशीच्या फेऱ्यात, असा अनुभव सध्या येत आहे. जिल्हा परिषदेच्या गतवर्षी २७ मे रोजी झालेल्या सभेत सदस्य शशिकांत खोत, विलास पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी माने यांच्या गैरव्यवहारास तोंड फोडले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांची एकसदस्यीय चौकशी समिती जूनमध्ये नियुक्त केली. त्यांनी जूनअखेरीस चौकशी अहवाल दिला. तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह जुलैच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे पाठविण्यात आला; परंतु त्याच्या अगोदरच माने यांची पुण्यास नियमित बदली झाली. या प्रकरणात विस्तार अधिकारी (पंचायत) शिवानंद कोचरी यांची पूर्ववत पन्हाळ्यास बदली झाली. सागर पाटील व कळेकर हे ग्रामसेवक व लिपिक अजिंक्य गायकवाड यांच्या बदल्या झाल्या. याव्यतिरिक्त फारसे काही घडलेले नाही.माने हे प्रथम वर्ग दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईचे अधिकार सामान्य प्रशासन विभागास आहेत. त्या विभागाकडूनच या आरोपाबद्दल त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन ‘कारणे दाखवा नोटीस’ व चार्जशीट निश्चित व्हायला हवी. पी. बी.पाटील समितीने दिलेल्या अहवालात माने यांनी कामात अनियमितता व दप्तरदिरंगाई केल्याचा ठपका ठेवला आहे; परंतु शवदाहिनीच्या कामात ठेकेदाराकडून पैसे व बदल्यांमध्ये ग्रामसेवकांकडून पैसे घेतल्याचे सिद्ध झालेले नाही; कारण चौकशीत तसे लेखी म्हणणे कुणीच दिलेले नाही. सदस्यांनी तसे आरोप केले; परंतु ते आरोप कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध करण्यास त्यांना जमले नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही धूसरच आहे; तथापि भ्रष्टाचाराच्या एखाद्या गाजलेल्या प्रकरणाचे पुढे काय होते, यावर मात्र त्यामुळे प्रकाशझोत पडला आहे.असे झाले होते आरोप... ३८ हजारांची शवदाहिनी ५४ हजारांना खरेदीस्वत:ची गाडी जिल्हा परिषदेकडे भाड्याने लावून भाडे उकळलेचिंचवडे येथील कामासाठी माने यांनी ६० हजार रुपये घेतलेनिर्मलग्राम अंतर्गत शौचालय अनुदानाचे धनादेश टक्केवारीसाठी रोखले.