शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

सातवीसह नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: January 9, 2017 23:29 IST

पुढील वर्षापासून कार्यवाही : २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार

भरत शास्त्री -- बाहुबली---आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) राज्यातील सातवी व नववीची सर्व पुस्तके बदलणार असून, त्याबद्दलची आवश्यक पूर्तता करण्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिर्ती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार आहेत. तसे आदेश ‘बालभारती’ने दिले आहेत.स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि विज्ञान व भाषा या विषयांतील बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालता यावी, यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या नव्या रचनेत रचनावादावर भर देण्यात आला आहे.राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० व प्राथमिक शिक्षण आराखडा २०१२ सुधारित निकषांनुसार या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत.शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या चालू वर्षात सहावीच्या पुस्तकापर्यंत बदल करण्यात आले होते. मात्र, यंदा इयत्ता सातवी त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार आहे. नववीच्या पुस्तकातील महत्त्वाचा बदल म्हणजे यात स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा समावेश असणार आहे. तर भाषा विषयाकरिता प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका तयार करण्यात आली आहे. यामागे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न आहे.सातवी ते दहावी : अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर१ गेल्या काही वर्षांत अनेक इयत्तांची पुस्तके बदलली आहेत. बदललेली पुस्तके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला योग्य वेळेत मिळत नसल्याबाबत नेहमी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. शाळा सुरू होऊनसुद्धा पुस्तके न मिळण्याची परंपरा यंदा तरी खंडित होईल का, हे जूनमध्येच कळेल.२ नव्या रचनेत इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी सामान्य, तर नववी व दहावीची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आरोप होत होता. यामध्ये सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न या रचनेत करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते ज्युनिअर कॉलेजस्तरांवरील अभ्यासक्रमांच्या निर्मिर्तीसाठी यापूर्वी दोन संस्थांकडे जबाबदारी विभागून देण्यात आली होती.३ यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्यात येत होता. प्रत्यक्षात निर्मिर्तीचे काम बालभारतीकडून होत होते. आता मात्र इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत निर्मिर्तीसाठी एकाच अभ्यास मंडळाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.