शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सातवीसह नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: January 9, 2017 23:29 IST

पुढील वर्षापासून कार्यवाही : २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार

भरत शास्त्री -- बाहुबली---आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) राज्यातील सातवी व नववीची सर्व पुस्तके बदलणार असून, त्याबद्दलची आवश्यक पूर्तता करण्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिर्ती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार आहेत. तसे आदेश ‘बालभारती’ने दिले आहेत.स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि विज्ञान व भाषा या विषयांतील बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालता यावी, यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या नव्या रचनेत रचनावादावर भर देण्यात आला आहे.राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० व प्राथमिक शिक्षण आराखडा २०१२ सुधारित निकषांनुसार या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत.शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या चालू वर्षात सहावीच्या पुस्तकापर्यंत बदल करण्यात आले होते. मात्र, यंदा इयत्ता सातवी त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार आहे. नववीच्या पुस्तकातील महत्त्वाचा बदल म्हणजे यात स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा समावेश असणार आहे. तर भाषा विषयाकरिता प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका तयार करण्यात आली आहे. यामागे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न आहे.सातवी ते दहावी : अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर१ गेल्या काही वर्षांत अनेक इयत्तांची पुस्तके बदलली आहेत. बदललेली पुस्तके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला योग्य वेळेत मिळत नसल्याबाबत नेहमी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. शाळा सुरू होऊनसुद्धा पुस्तके न मिळण्याची परंपरा यंदा तरी खंडित होईल का, हे जूनमध्येच कळेल.२ नव्या रचनेत इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी सामान्य, तर नववी व दहावीची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आरोप होत होता. यामध्ये सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न या रचनेत करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते ज्युनिअर कॉलेजस्तरांवरील अभ्यासक्रमांच्या निर्मिर्तीसाठी यापूर्वी दोन संस्थांकडे जबाबदारी विभागून देण्यात आली होती.३ यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्यात येत होता. प्रत्यक्षात निर्मिर्तीचे काम बालभारतीकडून होत होते. आता मात्र इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत निर्मिर्तीसाठी एकाच अभ्यास मंडळाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.