शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सातवीसह नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: January 9, 2017 23:29 IST

पुढील वर्षापासून कार्यवाही : २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार

भरत शास्त्री -- बाहुबली---आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) राज्यातील सातवी व नववीची सर्व पुस्तके बदलणार असून, त्याबद्दलची आवश्यक पूर्तता करण्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिर्ती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ३ री, ४ थी व ५ वीची काही पुस्तके बदलणार आहेत. तसे आदेश ‘बालभारती’ने दिले आहेत.स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि विज्ञान व भाषा या विषयांतील बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालता यावी, यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या नव्या रचनेत रचनावादावर भर देण्यात आला आहे.राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० व प्राथमिक शिक्षण आराखडा २०१२ सुधारित निकषांनुसार या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत.शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या चालू वर्षात सहावीच्या पुस्तकापर्यंत बदल करण्यात आले होते. मात्र, यंदा इयत्ता सातवी त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार आहे. नववीच्या पुस्तकातील महत्त्वाचा बदल म्हणजे यात स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा समावेश असणार आहे. तर भाषा विषयाकरिता प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका तयार करण्यात आली आहे. यामागे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न आहे.सातवी ते दहावी : अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर१ गेल्या काही वर्षांत अनेक इयत्तांची पुस्तके बदलली आहेत. बदललेली पुस्तके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला योग्य वेळेत मिळत नसल्याबाबत नेहमी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. शाळा सुरू होऊनसुद्धा पुस्तके न मिळण्याची परंपरा यंदा तरी खंडित होईल का, हे जूनमध्येच कळेल.२ नव्या रचनेत इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी सामान्य, तर नववी व दहावीची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आरोप होत होता. यामध्ये सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न या रचनेत करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते ज्युनिअर कॉलेजस्तरांवरील अभ्यासक्रमांच्या निर्मिर्तीसाठी यापूर्वी दोन संस्थांकडे जबाबदारी विभागून देण्यात आली होती.३ यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्यात येत होता. प्रत्यक्षात निर्मिर्तीचे काम बालभारतीकडून होत होते. आता मात्र इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत निर्मिर्तीसाठी एकाच अभ्यास मंडळाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.