शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रात्रनिवाऱ्यांचीच ससेहोलपट...स्वयंसेवी संस्थांना साहाय्याची आवश्यकता;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:06 IST

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : मनोरुग्ण, कौटुंबिक छळाने त्रस्त तसेच वयोवृद्ध महिला यांच्यासह ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा फिरस्त्यांसाठी विशेषत: महिलांसाठी सुरू असलेली रात्रनिवारे चालवायची कशी, हा प्रश्न ‘एकटी’सारख्या स्वयंसेवी संस्थेपुढे निर्माण झाला आहे. अशा संस्थांना केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने अर्थसाहाय्य केले जात नसल्याने दानशूरांच्या सहकार्यावर हे सुरू आहे.शहरातील ...

ठळक मुद्देमहिलांचे प्रमाण जास्त : आर्थिक विवंचनेमुळे सेवा प्रभावित

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : मनोरुग्ण, कौटुंबिक छळाने त्रस्त तसेच वयोवृद्ध महिला यांच्यासह ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा फिरस्त्यांसाठी विशेषत: महिलांसाठी सुरू असलेली रात्रनिवारे चालवायची कशी, हा प्रश्न ‘एकटी’सारख्या स्वयंसेवी संस्थेपुढे निर्माण झाला आहे. अशा संस्थांना केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने अर्थसाहाय्य केले जात नसल्याने दानशूरांच्या सहकार्यावर हे सुरू आहे.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात फिरस्ते राहतात. बेघरांसाठी महापालिकेने चार रात्रनिवारे दिले आहेत. ‘एकटी’साठी अडीच वर्षांपूर्वी रिलायन्स मॉलमागे रात्र निवारा केंद्र सुरू झाले. तसेट संस्थेला जेम्स स्टोन इमारतीतही जागा दिली आहे. हे दोन्ही रात्रनिवारे महिलांसाठी चालविले जातात. सध्या येथे १९ महिला असून पुरुषांसाठीही शिरोली जकात नाका व शाहू नाका येथे रात्रनिवाºयासाठी जागा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २०१५मधील निकालपत्रानुसार ५० हजार लोकसंख्येमागे बेघरांसाठी एक रात्रनिवारा हवा. अर्बन लायबलीहूड मिशन योजनेअंतर्गत या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे. मनपाने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या करारानुसार दहा टक्के रक्कम संस्थेला देण्यात येणार आहे; पण अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.संस्थेच्या वतीने आठवड्यातून तीन दिवस मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठांचा सर्व्हे केला जातो. दुकानांबाहेर, रस्त्यावर झोपलेल्या, फिरत असलेल्या महिलांना संस्थेत आणले जाते. महिन्याकाठी जवळपास २० जण दाखल होतात. त्यांची मानसिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्यांचा अहवाल बनवून त्यांचा प्रवेश निश्चित केला जातो. दुर्धर आजार झालेल्या वयोवृद्ध तसेच मनोरुग्ण महिलांचा सांभाळ करणे जिकिरीचे असते. डॉ. मंजुळा पिशवीकर या उपचार, तर समुपदेशक डॉ. कावेरी चौगुले या मनोरुग्णांसाठी काम करतात. अशाच तज्ज्ञ, दानशूरांच्या सहकार्याची संस्थेला गरज आहे.४२ महिलांचे पुनर्वसनवर्षांत संस्थेत ८५ महिलांची सोय करण्यात आली. त्यातील ४२ जणींचे पुनर्वसन झाले आहे. त्यात कौटुंबिक छळ झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांचे समुपदेशन, मानसिक स्वास्थ्य सुधारणे, बरे होऊ न शकणाºया मनोरुग्णांची नगरमधील ‘माउली’ संस्थेत रवानगी, अशा गोष्टींचा समावेश आहे.रात्रनिवारे कोणत्याही अनुदानाशिवाय चालविले जातात. आम्हाला मोठी अडचण असते ती अन्नधान्याची. एवढ्या व्यक्तींचा सांभाळ करायचा म्हणजे खर्चही तितकाच जास्त. दानशूर व्यक्तींनी सहकार्यासाठी पुढे यावे. - अनुराधा भोसले, ‘एकटी’ संस्था