शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी अवकाळीचा दणका

By admin | Updated: February 29, 2016 01:14 IST

आटपाडीत गारपीट : जतला वादळी वाऱ्याने नुकसान; कवठेमहांकाळातही वादळी पाऊस

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांतील काही भागांत रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे शेतीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ऐन बहरात असलेल्या बेदाणा हंगामाला याचा मोठा फटका बसणार आहे. हवामान खात्याने अजून दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचे वर्तवल्याने बेदाणा व भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडले आहेत.शनिवारी जिल्ह्याच्या पूर्व भागात विशेषत: दुष्काळी पट्ट्यात पावसाने हजेरी लावली होती. पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळी वाऱ्यामुळे व गारपिटीमुळे अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या आटपाडीकरांना पावसाच्या सरींनी दिलासा दिला. रविवारी सायंकाळी जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तब्बल साडेचार महिन्यांनी पावसाने तोंड दाखविले; पण पावसापेक्षा जोरदार वाऱ्याने अनेक दुकानांचे फलक, शेतातील कडबा, कडब्याच्या गंजीवरील पत्रे उडून गेले. आटपाडी परिसरात शिडकावाआटपाडी : आटपाडीसह दिघंची, विठलापूर, खरसुंडी, करगणी, शेटफळे, हिवतड परिसरात पावसाने शिडकावा केला. दिघंची आणि खरसुंडी येथे रविवारी आठवडा बाजार भरतो. दोन्हीही गावांत सायंकाळीच बाजारात गर्दी होते. नेमक्या याचवेळी वादळी वारे आणि पावसाचे आगमन झाल्यामुळे बाजारातील नागरिकांसह व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. अजून गंजी न लावलेल्या शेतकऱ्यांच्या कडब्याचेही नुकसान झाले. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वारे व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शाळू, हरभरा, हळद काढणी व हळद शिजवून शेतात वाळवण्यासाठी टाकण्यात आली आहे. तसेच द्राक्षबागांचा हंगाम सुरू असल्याने व बेदाणा तयार करण्यासाठी बागायतदारांची धावपळ सुरू असताना आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अजून दोन दिवस वादळी पावसाची शक्यतासलग दोन दिवस होत असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असतानाच, हवामान खात्याने अजून दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. २ व ३ मार्चलाही ढगाळ वातावरण राहून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अवकाळी पावसाने बेदाणा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे.