शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

नवीन ‘अभियांत्रिकी’ला परवानगी नको

By admin | Updated: December 2, 2014 00:48 IST

धनंजय महाडिक यांची केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्रात गेले दहा वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढली असून त्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यासाठी आगामी काळात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी देऊ नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली. राज्यात १९९५ ला ९४ अभियांत्रिकी महाविद्यालये होती, त्यामध्ये २२ हजार ७४० प्रवेश क्षमता होती. पण गेल्या पंधरा वर्षांत ३०९ महाविद्यालये कार्यरत झाली आहेत. या महाविद्यालयांत १ लाख १४ हजार २६८ प्रवेश क्षमता आहे. या महाविद्यालयांतून प्रत्येक वर्षी पाच हजार जागा रिक्त राहतात. ए.आय.सी.टी.ई.च्या नियमांचे पालन करून १२ ते १५ कोटी रुपये खर्च करून अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या पण विद्यार्थ्यांअभावी अनेक संस्था, महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत शिवाय प्राध्यापकांचे पगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एकूणच या क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय-धोरणांनुसार तांत्रिक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांची या देशाला मोठी गरज आहे पण शिक्षणाचा दर्जा व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अस्तित्व टिकविण्यासाठी केंद्र सरकारच्या एच.आर.डी. विभागाने नवे धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांना काही सवलती द्याव्यात, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली.