शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

नवीन ‘अभियांत्रिकी’ला परवानगी नको

By admin | Updated: December 2, 2014 00:48 IST

धनंजय महाडिक यांची केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्रात गेले दहा वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढली असून त्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यासाठी आगामी काळात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी देऊ नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली. राज्यात १९९५ ला ९४ अभियांत्रिकी महाविद्यालये होती, त्यामध्ये २२ हजार ७४० प्रवेश क्षमता होती. पण गेल्या पंधरा वर्षांत ३०९ महाविद्यालये कार्यरत झाली आहेत. या महाविद्यालयांत १ लाख १४ हजार २६८ प्रवेश क्षमता आहे. या महाविद्यालयांतून प्रत्येक वर्षी पाच हजार जागा रिक्त राहतात. ए.आय.सी.टी.ई.च्या नियमांचे पालन करून १२ ते १५ कोटी रुपये खर्च करून अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या पण विद्यार्थ्यांअभावी अनेक संस्था, महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत शिवाय प्राध्यापकांचे पगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एकूणच या क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय-धोरणांनुसार तांत्रिक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांची या देशाला मोठी गरज आहे पण शिक्षणाचा दर्जा व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अस्तित्व टिकविण्यासाठी केंद्र सरकारच्या एच.आर.डी. विभागाने नवे धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांना काही सवलती द्याव्यात, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली.